शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केळगाव : केळगाव हा डोंगराळ व जलयुक्त परिसर आहे. त्यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांचा संचार मोठ्या प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

केळगाव : केळगाव हा डोंगराळ व जलयुक्त परिसर आहे. त्यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांचा संचार मोठ्या प्रमाणात असतो. गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांकडून सातत्याने शेतपिकाचे नुकसान होत असल्याने येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांची आणि पाळीव प्राण्यांची भरपाई शासनाकडून शेतकऱ्यांना मिळते. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे वन विभागाच्या कार्यालयात याबाबत शेतकऱ्यांनी पाठपुरावादेखील केलेला नाही.

अजिंठा डोंगर रांगेत असलेले मुडैश्वर, केळगाव, कोल्हाळा तांडा, आधरवाडी, गोकुळवाडी जंगलात बिबट्या, तडस, लांडगे यासह अनेक वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. हे वन्यप्राणी जंगलाला लागून असलेल्या गावातील शेतशिवारात मुक्त संचार करत असतात. हे प्राणी बैल, गाय, शेळ्या, मेंढ्या, म्हशी यांच्यावरही हल्ले करतात.

केळगाव परिसरातील जंगलात नीलगाई, हरिणी, काळवीट, कोल्हे यासह अन्य प्राण्यांच्या कळपांनी शेकडो एकर जमिनीवरील मका, कपाशी, मिरची, तूर, उडीद, मूग, सोयाबीन पिकांचे नुकसान केले आहे. यासाठी शासनाकडून पिकांची नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, ही मदत गत नऊ महिन्यांपासून मिळालेली नाही. त्यात जीवाचे रान करून शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री वन्यप्राण्यांचा सामना करत शेतात पहारा करावा लागतो. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता, शेतकरी आपल्या पिकांची राखण करतात.

काय म्हणतात शेतकरी...!

रात्रंदिवस बॅटरी घेऊन शेतात थांबावे लागते

माझ्या शेतात लागवड केलेल्या मका पिकाचे वन्यप्राणी कुरतडून मोठे नुकसान करत आहेत. गतवर्षी पावसामुळे आम्हा शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते. त्यात आणखी समस्या वाढली असून, वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन विभागाकडून या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे. गेल्यावेळी झालेल्या नुकसानाची भरपाई अजूनही मिळालेली नाही,

- ज्ञानेश्वर शेळके, शेतकरी, केळगाव

-------------

अजिंठा परिसरातील वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व पशुधनाचे नुकसान होते. या नुकसानापोटी वन विभागाकडून मदत मिळ‌ते. संबंधित घटनास्थळांचे पंचनामे करून त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविलेला आहे. वारंवार पाठपुरावा सुरू आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांना मिळेल.

- एस. पी. मांगदरे, वन परिक्षेत्र अधिकारी, अजिंठा.