शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केळगाव : केळगाव हा डोंगराळ व जलयुक्त परिसर आहे. त्यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांचा संचार मोठ्या प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

केळगाव : केळगाव हा डोंगराळ व जलयुक्त परिसर आहे. त्यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांचा संचार मोठ्या प्रमाणात असतो. गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांकडून सातत्याने शेतपिकाचे नुकसान होत असल्याने येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांची आणि पाळीव प्राण्यांची भरपाई शासनाकडून शेतकऱ्यांना मिळते. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे वन विभागाच्या कार्यालयात याबाबत शेतकऱ्यांनी पाठपुरावादेखील केलेला नाही.

अजिंठा डोंगर रांगेत असलेले मुडैश्वर, केळगाव, कोल्हाळा तांडा, आधरवाडी, गोकुळवाडी जंगलात बिबट्या, तडस, लांडगे यासह अनेक वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. हे वन्यप्राणी जंगलाला लागून असलेल्या गावातील शेतशिवारात मुक्त संचार करत असतात. हे प्राणी बैल, गाय, शेळ्या, मेंढ्या, म्हशी यांच्यावरही हल्ले करतात.

केळगाव परिसरातील जंगलात नीलगाई, हरिणी, काळवीट, कोल्हे यासह अन्य प्राण्यांच्या कळपांनी शेकडो एकर जमिनीवरील मका, कपाशी, मिरची, तूर, उडीद, मूग, सोयाबीन पिकांचे नुकसान केले आहे. यासाठी शासनाकडून पिकांची नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, ही मदत गत नऊ महिन्यांपासून मिळालेली नाही. त्यात जीवाचे रान करून शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री वन्यप्राण्यांचा सामना करत शेतात पहारा करावा लागतो. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता, शेतकरी आपल्या पिकांची राखण करतात.

काय म्हणतात शेतकरी...!

रात्रंदिवस बॅटरी घेऊन शेतात थांबावे लागते

माझ्या शेतात लागवड केलेल्या मका पिकाचे वन्यप्राणी कुरतडून मोठे नुकसान करत आहेत. गतवर्षी पावसामुळे आम्हा शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते. त्यात आणखी समस्या वाढली असून, वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन विभागाकडून या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे. गेल्यावेळी झालेल्या नुकसानाची भरपाई अजूनही मिळालेली नाही,

- ज्ञानेश्वर शेळके, शेतकरी, केळगाव

-------------

अजिंठा परिसरातील वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व पशुधनाचे नुकसान होते. या नुकसानापोटी वन विभागाकडून मदत मिळ‌ते. संबंधित घटनास्थळांचे पंचनामे करून त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविलेला आहे. वारंवार पाठपुरावा सुरू आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांना मिळेल.

- एस. पी. मांगदरे, वन परिक्षेत्र अधिकारी, अजिंठा.