शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

धरण तुडुंब, क्षमतेच्या अभावामुळे पाच दिवसांआड पाणीपुरवठा

By | Updated: November 29, 2020 04:05 IST

औरंगाबाद : निसर्गाच्या कृपेने दोन वर्षांपासून जायकवाडी धरण तुडुंब भरत आहे. औरंगाबाद महापालिकेकडे जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याची क्षमता नाही. ...

औरंगाबाद : निसर्गाच्या कृपेने दोन वर्षांपासून जायकवाडी धरण तुडुंब भरत आहे. औरंगाबाद महापालिकेकडे जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याची क्षमता नाही. त्यामुळे शहरातील ६० टक्के नागरिकांची तहान भागविण्यात प्रशासनाला यश येत आहे. शहरातील ४० टक्के नागरिक पंधरा वर्षांपासून निव्वळ समांतर जलवाहिनीची वाट बघत आहेत. शहराची तहान मोठी आणि पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पाच दिवसांआड नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात परिस्थिती आणीबाणीची होते.

१९७० पर्यंत शहराला हर्सूल तलावाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. शहर झपाट्याने वाढू लागल्याने तातडीने जायकवाडी येथून पाणी आणण्यात आले. हे पाणी कमी पडू लागल्यामुळे आणखी एक मोठी जलवाहिनी टाकून पाणी आणण्यास सुरुवात करण्यात आली. आता या दोन्ही जलवाहिन्यांचे आयुष्य जवळपास पंधरा वर्षांपूर्वी संपले आहे. शहराची आजची लोकसंख्या जवळपास अठरा लाखांपर्यंत पोहोचली आहे. शहराला दररोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज असताना महापालिका अवघ्या १२० एमएलडीवर बोळवण करीत आहे. शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहतींमध्ये महापालिकेने जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत. त्यामुळे या वसाहतींना मागील सात वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. वर्षभरापूर्वी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. योजना आजपर्यंत सुरू झालेली नाही. भविष्यात ती कधी सुरू होईल हेसुद्धा निश्चित नाही. काम सुरू झाल्यानंतर किमान तीन वर्षे शहरात पाणी आणण्यासाठी लागतील. तोपर्यंत शहराची अवस्था आणखी बकाल होणार, हे निश्चित.

६० कि. मी. अंतरापर्यंत नाममात्र गळती

जायकवाडीपासून शहरापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे. त्यात चार ते पाच ठिकाणी पाण्याची गळती आहे. जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाण्याचा प्रकार अजिबात होत नाही. महापालिकेकडून अधून-मधून जलवाहिन्यांची डागडुजी करण्यात येते.

समांतर जलवाहिनीची प्रतीक्षा

महाराष्ट्र शासनाने नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदा अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होईल.

किरण धांडे, प्रभारी कार्यकारी अभियंता महापालिका.

उन्हाळ्यात परिस्थिती आणीबाणीची

दरवर्षी महापालिकेला पाणीपुरवठा करताना चार महिने प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यंदा उन्हाळ्यात कोरोनामुळे एकही आंदोलन झाले नाही. एकाही वॉर्डात पाणीपुरवठ्याची ओरड झाली नाही. मागील अनेक वर्षांमध्ये महापालिकेसाठी हे वर्ष अत्यंत चांगले गेले असे म्हणता येईल.

शहराची लोकसंख्या

११ लाख ७५ हजार

०५ दिवसाआड पाणीपुरवठा

१०० लिटर प्रतिव्यक्ती