शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

धरण तुडुंब, क्षमतेच्या अभावामुळे पाच दिवसांआड पाणीपुरवठा

By | Updated: November 29, 2020 04:05 IST

औरंगाबाद : निसर्गाच्या कृपेने दोन वर्षांपासून जायकवाडी धरण तुडुंब भरत आहे. औरंगाबाद महापालिकेकडे जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याची क्षमता नाही. ...

औरंगाबाद : निसर्गाच्या कृपेने दोन वर्षांपासून जायकवाडी धरण तुडुंब भरत आहे. औरंगाबाद महापालिकेकडे जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याची क्षमता नाही. त्यामुळे शहरातील ६० टक्के नागरिकांची तहान भागविण्यात प्रशासनाला यश येत आहे. शहरातील ४० टक्के नागरिक पंधरा वर्षांपासून निव्वळ समांतर जलवाहिनीची वाट बघत आहेत. शहराची तहान मोठी आणि पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पाच दिवसांआड नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात परिस्थिती आणीबाणीची होते.

१९७० पर्यंत शहराला हर्सूल तलावाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. शहर झपाट्याने वाढू लागल्याने तातडीने जायकवाडी येथून पाणी आणण्यात आले. हे पाणी कमी पडू लागल्यामुळे आणखी एक मोठी जलवाहिनी टाकून पाणी आणण्यास सुरुवात करण्यात आली. आता या दोन्ही जलवाहिन्यांचे आयुष्य जवळपास पंधरा वर्षांपूर्वी संपले आहे. शहराची आजची लोकसंख्या जवळपास अठरा लाखांपर्यंत पोहोचली आहे. शहराला दररोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज असताना महापालिका अवघ्या १२० एमएलडीवर बोळवण करीत आहे. शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहतींमध्ये महापालिकेने जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत. त्यामुळे या वसाहतींना मागील सात वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. वर्षभरापूर्वी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. योजना आजपर्यंत सुरू झालेली नाही. भविष्यात ती कधी सुरू होईल हेसुद्धा निश्चित नाही. काम सुरू झाल्यानंतर किमान तीन वर्षे शहरात पाणी आणण्यासाठी लागतील. तोपर्यंत शहराची अवस्था आणखी बकाल होणार, हे निश्चित.

६० कि. मी. अंतरापर्यंत नाममात्र गळती

जायकवाडीपासून शहरापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे. त्यात चार ते पाच ठिकाणी पाण्याची गळती आहे. जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाण्याचा प्रकार अजिबात होत नाही. महापालिकेकडून अधून-मधून जलवाहिन्यांची डागडुजी करण्यात येते.

समांतर जलवाहिनीची प्रतीक्षा

महाराष्ट्र शासनाने नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदा अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होईल.

किरण धांडे, प्रभारी कार्यकारी अभियंता महापालिका.

उन्हाळ्यात परिस्थिती आणीबाणीची

दरवर्षी महापालिकेला पाणीपुरवठा करताना चार महिने प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यंदा उन्हाळ्यात कोरोनामुळे एकही आंदोलन झाले नाही. एकाही वॉर्डात पाणीपुरवठ्याची ओरड झाली नाही. मागील अनेक वर्षांमध्ये महापालिकेसाठी हे वर्ष अत्यंत चांगले गेले असे म्हणता येईल.

शहराची लोकसंख्या

११ लाख ७५ हजार

०५ दिवसाआड पाणीपुरवठा

१०० लिटर प्रतिव्यक्ती