शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

धरण तुडुंब, क्षमतेच्या अभावामुळे पाच दिवसांआड पाणीपुरवठा

By | Updated: November 29, 2020 04:05 IST

औरंगाबाद : निसर्गाच्या कृपेने दोन वर्षांपासून जायकवाडी धरण तुडुंब भरत आहे. औरंगाबाद महापालिकेकडे जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याची क्षमता नाही. ...

औरंगाबाद : निसर्गाच्या कृपेने दोन वर्षांपासून जायकवाडी धरण तुडुंब भरत आहे. औरंगाबाद महापालिकेकडे जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याची क्षमता नाही. त्यामुळे शहरातील ६० टक्के नागरिकांची तहान भागविण्यात प्रशासनाला यश येत आहे. शहरातील ४० टक्के नागरिक पंधरा वर्षांपासून निव्वळ समांतर जलवाहिनीची वाट बघत आहेत. शहराची तहान मोठी आणि पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पाच दिवसांआड नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात परिस्थिती आणीबाणीची होते.

१९७० पर्यंत शहराला हर्सूल तलावाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. शहर झपाट्याने वाढू लागल्याने तातडीने जायकवाडी येथून पाणी आणण्यात आले. हे पाणी कमी पडू लागल्यामुळे आणखी एक मोठी जलवाहिनी टाकून पाणी आणण्यास सुरुवात करण्यात आली. आता या दोन्ही जलवाहिन्यांचे आयुष्य जवळपास पंधरा वर्षांपूर्वी संपले आहे. शहराची आजची लोकसंख्या जवळपास अठरा लाखांपर्यंत पोहोचली आहे. शहराला दररोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज असताना महापालिका अवघ्या १२० एमएलडीवर बोळवण करीत आहे. शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहतींमध्ये महापालिकेने जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत. त्यामुळे या वसाहतींना मागील सात वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. वर्षभरापूर्वी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. योजना आजपर्यंत सुरू झालेली नाही. भविष्यात ती कधी सुरू होईल हेसुद्धा निश्चित नाही. काम सुरू झाल्यानंतर किमान तीन वर्षे शहरात पाणी आणण्यासाठी लागतील. तोपर्यंत शहराची अवस्था आणखी बकाल होणार, हे निश्चित.

६० कि. मी. अंतरापर्यंत नाममात्र गळती

जायकवाडीपासून शहरापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे. त्यात चार ते पाच ठिकाणी पाण्याची गळती आहे. जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाण्याचा प्रकार अजिबात होत नाही. महापालिकेकडून अधून-मधून जलवाहिन्यांची डागडुजी करण्यात येते.

समांतर जलवाहिनीची प्रतीक्षा

महाराष्ट्र शासनाने नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदा अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होईल.

किरण धांडे, प्रभारी कार्यकारी अभियंता महापालिका.

उन्हाळ्यात परिस्थिती आणीबाणीची

दरवर्षी महापालिकेला पाणीपुरवठा करताना चार महिने प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यंदा उन्हाळ्यात कोरोनामुळे एकही आंदोलन झाले नाही. एकाही वॉर्डात पाणीपुरवठ्याची ओरड झाली नाही. मागील अनेक वर्षांमध्ये महापालिकेसाठी हे वर्ष अत्यंत चांगले गेले असे म्हणता येईल.

शहराची लोकसंख्या

११ लाख ७५ हजार

०५ दिवसाआड पाणीपुरवठा

१०० लिटर प्रतिव्यक्ती