शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बाबा माफ करा! आंतरजातीय प्रेमविवाहानंतर मुलीची आत्महत्या,अंत्यसंस्काराकडे जन्मदात्यांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:50 IST

अल्पवयीन असताना मुलासोबत पळून गेली, पुन्हा घरी न जाता बालिक झाल्यास त्याचा मुलासोबत केला विवाह

औरंगाबाद : प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमाखातर तिने चार वर्षांपूर्वी आई-वडिलांनाही नाकारल्याची जखम जन्मदात्यांच्या मनात रुजली. तिने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी कळवूनही तिच्या आई-वडिलांनी तिच्या प्रेताकडे पाठ फिरवल्याचा प्रकार मंगळवारी शहर पोलिसांनी अनुभवला.

पूजा आकाश खेडकर (२१, रा. विष्णूनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. याविषयी जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, पूजा ही वयाच्या १७ व्या वर्षी आकाशसोबत पळून गेली होती. ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी युगुलाला पकडून आणले, तिचे आई-वडील तिला घरी नेण्यासाठी आले. तेव्हा तिने आई-वडिलांकडे नाही, तर आकाशसोबत राहायचे असल्याचे सांगितले होते. ती अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळाच्या आदेशाने पूजाला एक वर्ष सुधारगृहात ठेवले होते. ती १८ वर्षांची झाल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये प्रेमविवाह केला. आई-वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले. लग्नानंतर दोघे विष्णूनगर येथे राहत होते.

आकाश बॅनर लावण्याचे काम करीत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी तो कामानिमित्त घराबाहेर पडला. रात्री ३ वाजेच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा पूजाने घराचे दार आतून लावून घेतले होते. आवाज देऊनही ती प्रतिसाद देत नसल्याने जवाहरनगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी दार तोडून पाहिले असता, पूजाने गळफास घेतल्याचे दिसले. तिला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत.

रक्ताच्या नात्याने फिरवली पाठपूजाच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी जाफराबाद तालुक्यात राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांना कळविली. सायंकाळी तिचे मामा औरंगाबादला आले. पूजाचे आई-वडील येणार नसल्याचे आणि शव तिच्या पतीच्या ताब्यात देण्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांना सांगितले.

सुसाईड नोटमध्ये आई, वडील आणि पतीलाही सॉरीपूजाने लिहिलेली सुसाईड नोट पाेलिसांना घटनास्थळी मिळाली. यात तिने आई-वडिलांची आणि पतीची माफी मागितली. ज्याच्यासाठी तुम्हाला सोडले, तोही आता पूर्वीसारखा राहिला नाही, अशी खंत तिने व्यक्त केली. तो त्याच्या नातेवाइकांसोबत राहतो. तुम्हीही नाते तोडल्याने एकटे वाटत असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले. मृत्यूची घटना आई-वडिलांना कळवावी, मात्र ते येणार नाहीत, यामुळे आकाशनेच अग्निडाग द्यावा, अशी इच्छा तिने व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद