शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

औरंगाबादेत सायबर क्राईम सेलचे झाले ठाण्यात रुपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 19:36 IST

राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा नुसती कागदावरच असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राज्य पातळीवर हालचाली झाल्या आणि पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम सेलचे सायबर क्राईम पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा नुसती कागदावरच असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राज्य पातळीवर हालचाली झाल्या आणि पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम सेलचे सायबर क्राईम पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले. औरंगाबादेतील पहिल्या सायबर ठाण्याच्या निरीक्षकपदी सुरेश वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्यातील सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस आयुक्तालयात २०१६ साली १५३ गुन्ह्यांची नोंद झाली. तर गतवर्षी (२०१७) गुन्ह्यांचा आकडा वाढून १६९ झाला होता. यावर्षी जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत सायबर कायद्याच्या विविध कलमान्वये ६० हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. मोबाईल, संगणकाच्या साह्याने आॅनलाईन फसवणूक करणे, वेबसाईट हॅक करणे, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियावरून महिला, मुलींची बदनामी करणे, अशा प्रकारचे हे गुन्हे असतात. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या संख्येचा विचार करता पाच वर्षांपूर्वी शहर पोलीस दलासाठी स्वतंत्र सायबर लॅब स्थापन करण्यात आली. सायबर लॅबकरिता कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले. 

शासनाने काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे उभारण्यासंदर्भात स्वतंत्र निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. यावर लोकमतने प्रकाश टाकला. यानंतर औरंगाबादेतील सायबर लॅबचे रुपांतर सायबर ठाण्यात करण्याचे निर्देश सायबर क्राईम सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिले. तसेच सायबर ठाण्याच्या निरीक्षकपदी सुरेश वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. वानखेडे यांनी सोमवारी सकाळी सायबर ठाण्याचे पहिले निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

कार्यपद्धती अस्पष्टसायबर ठाण्यात रुपांतर झाले तरी या ठाण्याचे कामकाज कसे चालेल. त्यासाठी स्वतंत्र आस्थापना, मनुष्यबळाची आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर यापुढे आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व सायबर गुन्हे पूर्वीप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यात दाखल होतील अथवा सायबर ठाण्यात, याबाबत संभ्रम आहे. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसcyber crimeसायबर क्राइमState Governmentराज्य सरकार