शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

औरंगाबादेत सायबर क्राईम सेलचे झाले ठाण्यात रुपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 19:36 IST

राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा नुसती कागदावरच असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राज्य पातळीवर हालचाली झाल्या आणि पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम सेलचे सायबर क्राईम पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा नुसती कागदावरच असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राज्य पातळीवर हालचाली झाल्या आणि पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम सेलचे सायबर क्राईम पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले. औरंगाबादेतील पहिल्या सायबर ठाण्याच्या निरीक्षकपदी सुरेश वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्यातील सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस आयुक्तालयात २०१६ साली १५३ गुन्ह्यांची नोंद झाली. तर गतवर्षी (२०१७) गुन्ह्यांचा आकडा वाढून १६९ झाला होता. यावर्षी जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत सायबर कायद्याच्या विविध कलमान्वये ६० हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. मोबाईल, संगणकाच्या साह्याने आॅनलाईन फसवणूक करणे, वेबसाईट हॅक करणे, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियावरून महिला, मुलींची बदनामी करणे, अशा प्रकारचे हे गुन्हे असतात. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या संख्येचा विचार करता पाच वर्षांपूर्वी शहर पोलीस दलासाठी स्वतंत्र सायबर लॅब स्थापन करण्यात आली. सायबर लॅबकरिता कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले. 

शासनाने काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे उभारण्यासंदर्भात स्वतंत्र निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. यावर लोकमतने प्रकाश टाकला. यानंतर औरंगाबादेतील सायबर लॅबचे रुपांतर सायबर ठाण्यात करण्याचे निर्देश सायबर क्राईम सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिले. तसेच सायबर ठाण्याच्या निरीक्षकपदी सुरेश वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. वानखेडे यांनी सोमवारी सकाळी सायबर ठाण्याचे पहिले निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

कार्यपद्धती अस्पष्टसायबर ठाण्यात रुपांतर झाले तरी या ठाण्याचे कामकाज कसे चालेल. त्यासाठी स्वतंत्र आस्थापना, मनुष्यबळाची आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर यापुढे आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व सायबर गुन्हे पूर्वीप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यात दाखल होतील अथवा सायबर ठाण्यात, याबाबत संभ्रम आहे. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसcyber crimeसायबर क्राइमState Governmentराज्य सरकार