शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत सायबर क्राईम सेलचे झाले ठाण्यात रुपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 19:36 IST

राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा नुसती कागदावरच असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राज्य पातळीवर हालचाली झाल्या आणि पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम सेलचे सायबर क्राईम पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा नुसती कागदावरच असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राज्य पातळीवर हालचाली झाल्या आणि पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम सेलचे सायबर क्राईम पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले. औरंगाबादेतील पहिल्या सायबर ठाण्याच्या निरीक्षकपदी सुरेश वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्यातील सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस आयुक्तालयात २०१६ साली १५३ गुन्ह्यांची नोंद झाली. तर गतवर्षी (२०१७) गुन्ह्यांचा आकडा वाढून १६९ झाला होता. यावर्षी जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत सायबर कायद्याच्या विविध कलमान्वये ६० हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. मोबाईल, संगणकाच्या साह्याने आॅनलाईन फसवणूक करणे, वेबसाईट हॅक करणे, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियावरून महिला, मुलींची बदनामी करणे, अशा प्रकारचे हे गुन्हे असतात. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या संख्येचा विचार करता पाच वर्षांपूर्वी शहर पोलीस दलासाठी स्वतंत्र सायबर लॅब स्थापन करण्यात आली. सायबर लॅबकरिता कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले. 

शासनाने काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे उभारण्यासंदर्भात स्वतंत्र निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. यावर लोकमतने प्रकाश टाकला. यानंतर औरंगाबादेतील सायबर लॅबचे रुपांतर सायबर ठाण्यात करण्याचे निर्देश सायबर क्राईम सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिले. तसेच सायबर ठाण्याच्या निरीक्षकपदी सुरेश वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. वानखेडे यांनी सोमवारी सकाळी सायबर ठाण्याचे पहिले निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

कार्यपद्धती अस्पष्टसायबर ठाण्यात रुपांतर झाले तरी या ठाण्याचे कामकाज कसे चालेल. त्यासाठी स्वतंत्र आस्थापना, मनुष्यबळाची आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर यापुढे आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व सायबर गुन्हे पूर्वीप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यात दाखल होतील अथवा सायबर ठाण्यात, याबाबत संभ्रम आहे. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसcyber crimeसायबर क्राइमState Governmentराज्य सरकार