शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 07:31 IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आगळा योगायोग. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान आहे. शनिवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये बुधवारी रात्री मुक्कामी होते. या तिघांनी एकमेकांच्या भेटी घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु तिघांनीही गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना एकमेकांच्या भेटीचा इन्कार केला.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान आहे. शनिवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मुक्काम शहरात वाढले आहेत.

मी त्यांना कधीच भेटू शकत नाही...माजी गृहमंत्री देशमुख म्हणाले, फडणवीस यांना मी कधीच भेटू शकत नाही. माझी भेटण्याची इच्छाही नाही. ४ जूनला महाराष्ट्रात चमत्कार दिसेल. आमचा मोठा विजय होईल.

सामंतांनी उत्तर देणे टाळले... उद्योगमंत्री सामंत यांनीही भेटीप्रकरणी थेट उत्तर देणे टाळले. सामंत ११ मेपर्यंत शहरात मुक्कामी आहेत. ते महायुतीच्या उमेदवारासाठी उद्योजकांच्या विविध संघटनांच्या भेटी घेणार आहेत. 

फडणवीसांनीही नाकारली भेटमाझी व देशमुख यांची भेट झाली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आता डॉक्टरची गरज आहे. ते रोज काही तरी बरळत असून त्यांना शिव्या देण्याशिवाय सध्या काहीही सुचत नाही. जनतेने त्यांना रिजेक्ट केलेले आहे. ठाकरेंचे गाइड हे शरद पवार असून ते बोलतील तसेच ठाकरे करतील, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसaurangabad-pcऔरंगाबादmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४