शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी अलोट गर्दी; पहिल्या दिवशी ३९० पालकांनी घेतले प्रवेश अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 11:41 IST

मागील काही वर्षांपासून पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे अधिक वाढला आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने मागील वर्षी दोन सीबीएसई शाळा सुरू केल्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आणखी ३ शाळा सुरू करण्याचा निर्णय मागील आठवड्यात झाला. सोमवारी प्रवेशासाठी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू केली. पहिल्याच दिवशी ३९० पालकांनी अर्ज घेतले. मंगळवारीही अर्ज वाटप सुरू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे.

मागील काही वर्षांपासून पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे अधिक वाढला आहे. खासगी शाळांमध्ये हजारो रुपये भरून पाल्यांना प्रवेश द्यावा लागतोय. गोरगरीब विद्यार्थ्यांनाही सीबीएसईच्या दर्जाचे शिक्षण मिळावे, म्हणून मनपाने पुढाकार घेतला. प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रायोगिक तत्त्वावर मागील वर्षी दोन शाळा सुरू केल्या. दोन्ही शाळांना पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. पालकांचा उत्साह लक्षात घेऊन यंदा पुन्हा तीन शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ज्यु. केजी आणि सिनिअर केजीसाठी अर्ज वाटप करण्यात आले. एकूण पाच शाळांत ३९० अर्ज वाटप करण्यात आले.

३० कोटींचा खर्च

शहरात महापालिकेच्या ७० शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थी संख्या दरवर्षी झपाट्याने खालावत आहे. शैक्षणिक गुणवत्ता नसल्याने आणि सोयी सुविधांचा अभाव असल्याने अनेक गरीब पालकही ‘मनपा शाळा नको’ म्हणतात. त्यामुळे मनपाने स्मार्ट सिटीमार्फत सर्व शाळांचे अद्ययावतीकरण, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ३० कोटींची तरतूद केली. काही शाळांमध्ये डागडुजी सुरू करण्यात आली.दिल्लीसारख्या शाळा

आम आदमी पक्षाने दिल्लीत शाळांचा दर्जा उंचावला. मनपा अधिकाऱ्यांच्या पथकाने अलीकडेच दिल्ली येथील शाळांची पाहणी करून प्रशासनाला अहवाल सादर केला. दिल्ली मॉडेल आत्मसात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.कोणत्या शाळेत किती अर्ज वाटप ?

शाळा- अर्ज वितरण संख्याप्रियदर्शनी विद्यालय - ८५

गारखेडा शाळा - ६०उस्मानपुरा शाळा - ६१

चेलीपुरा शाळा - ६५सिडको एन-७ - ११९

एकूण - ३९०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका