शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाण्यात जालना रोड ओलांडणे धोक्याचेच; अपघाताची नेहमी भीती, वेगावर नियंत्रणाची मागणी

By साहेबराव हिवराळे | Updated: August 5, 2023 20:16 IST

एक दिवस एक वसाहत; वाढत्या वाहतुकीमुळे वेगावर नियंत्रण असावे, हीच स्थानिक नागरिकांची मुख्य मागणी आहे.

छत्रपती संभाजीनगर : मनपा कार्यक्षेत्राच्या विस्तारामुळे आजूबाजूच्या खेड्यांचे रुपांतर आता हळूहळू स्मार्ट शहरात होत आहे. चिकलठाणाही असेच बदलले आहे. स्मार्ट मनपा शाळेत तर डिजिटल एलईडी बोर्डवर शाळकरी मुले धडे गिरवत आहेत. फक्त वाढत्या वाहतुकीमुळे वेगावर नियंत्रण असावे, हीच स्थानिक नागरिकांची मुख्य मागणी आहे.

जालना रोडवर असलेल्या या चिकलठाणा गावात शेतकरी कुटुंबे मोठ्या प्रमाणात असून, औद्योगिक क्षेत्रामुळे कामगारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने व्यवसाय तसेच शेतीतील उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर असतो. ज्यांनी पिके घेण्यावर भर दिलेला आहे, अशी बहुतांश कुटुंबे नागपूर, नाशिक, मुंबई आदी बाजारपेठांत कोबी, टोमॅटो, भाजीपाला पाठवतात. या गावातील एक मोठी उणीव म्हणजे खेळाचे मैदान व उद्यान नाही. वृद्धांना तर शतपावली करणे वाहतुकीमुळे शक्य होत नाही.

स्मार्ट वर्कसाठी हातभार...कचरू नवपुते, साहेबराव कावडे मामा, रवी कावडे, ज्योती नाडे यांनी या वॉर्डाचे नगरसेवकपद भूषविले. त्यांच्या काळात त्यांनी विकासात्मक बदल आणले. शाळांचा विकास झाला. पेव्हर ब्लॉकचा रस्ता बदलून सिमेंटच्या रस्त्याचे काम नव्याने सुरू होणार आहे.- ज्योती नाडे, माजी नगरसेविका

दवाखान्यात फक्त ओपीडीच सुरू...आरोग्य सेवेसाठी मनपाचे ५० खाटांचे आरोग्य केंद्र तयार करण्यात आले. पण पुरेशा मनुष्यबळाअभावी सध्या केवळ ओपीडीच चालविली जात आहे. स्थानिक नागरिकांना जिल्हा रुग्णालयात जावे लागते. अंतर्गत रस्त्याची स्थिती सुधारण्याची गरज आहे.- नीलेश कावडे

पाणी कमी दाबाने...पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा सुधारावा.- लक्ष्मण गुरुखेल

पायी रस्ता ओलांडणे धोक्याचे..जालना रोड हायवे असल्याने वाहतुकीची वर्दळ खूप असते. शिफ्टप्रमाणे कामगारांची ने- आण केली जाते. त्यात स्कूलबसचीही भर पडते. प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने रस्त्यावर अडथळा करून उभी राहतात.- माजी नगरसेवक रवि कावडे

गतिरोधक टाकण्यास टाळाटाळ?बाजारतळासमोर आणि इतर ठिकाणी गतिरोधक टाकण्यास टाळाटाळ केली जात आहे. वाहतूक पोलिसांना टाळण्यासाठी निवासी वसाहतीतून वाहने पळविली जातात. यातून अपघात होण्याची भीती आहे.- अमोल गिरी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका