शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

चिकलठाण्यात जालना रोड ओलांडणे धोक्याचेच; अपघाताची नेहमी भीती, वेगावर नियंत्रणाची मागणी

By साहेबराव हिवराळे | Updated: August 5, 2023 20:16 IST

एक दिवस एक वसाहत; वाढत्या वाहतुकीमुळे वेगावर नियंत्रण असावे, हीच स्थानिक नागरिकांची मुख्य मागणी आहे.

छत्रपती संभाजीनगर : मनपा कार्यक्षेत्राच्या विस्तारामुळे आजूबाजूच्या खेड्यांचे रुपांतर आता हळूहळू स्मार्ट शहरात होत आहे. चिकलठाणाही असेच बदलले आहे. स्मार्ट मनपा शाळेत तर डिजिटल एलईडी बोर्डवर शाळकरी मुले धडे गिरवत आहेत. फक्त वाढत्या वाहतुकीमुळे वेगावर नियंत्रण असावे, हीच स्थानिक नागरिकांची मुख्य मागणी आहे.

जालना रोडवर असलेल्या या चिकलठाणा गावात शेतकरी कुटुंबे मोठ्या प्रमाणात असून, औद्योगिक क्षेत्रामुळे कामगारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने व्यवसाय तसेच शेतीतील उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर असतो. ज्यांनी पिके घेण्यावर भर दिलेला आहे, अशी बहुतांश कुटुंबे नागपूर, नाशिक, मुंबई आदी बाजारपेठांत कोबी, टोमॅटो, भाजीपाला पाठवतात. या गावातील एक मोठी उणीव म्हणजे खेळाचे मैदान व उद्यान नाही. वृद्धांना तर शतपावली करणे वाहतुकीमुळे शक्य होत नाही.

स्मार्ट वर्कसाठी हातभार...कचरू नवपुते, साहेबराव कावडे मामा, रवी कावडे, ज्योती नाडे यांनी या वॉर्डाचे नगरसेवकपद भूषविले. त्यांच्या काळात त्यांनी विकासात्मक बदल आणले. शाळांचा विकास झाला. पेव्हर ब्लॉकचा रस्ता बदलून सिमेंटच्या रस्त्याचे काम नव्याने सुरू होणार आहे.- ज्योती नाडे, माजी नगरसेविका

दवाखान्यात फक्त ओपीडीच सुरू...आरोग्य सेवेसाठी मनपाचे ५० खाटांचे आरोग्य केंद्र तयार करण्यात आले. पण पुरेशा मनुष्यबळाअभावी सध्या केवळ ओपीडीच चालविली जात आहे. स्थानिक नागरिकांना जिल्हा रुग्णालयात जावे लागते. अंतर्गत रस्त्याची स्थिती सुधारण्याची गरज आहे.- नीलेश कावडे

पाणी कमी दाबाने...पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा सुधारावा.- लक्ष्मण गुरुखेल

पायी रस्ता ओलांडणे धोक्याचे..जालना रोड हायवे असल्याने वाहतुकीची वर्दळ खूप असते. शिफ्टप्रमाणे कामगारांची ने- आण केली जाते. त्यात स्कूलबसचीही भर पडते. प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने रस्त्यावर अडथळा करून उभी राहतात.- माजी नगरसेवक रवि कावडे

गतिरोधक टाकण्यास टाळाटाळ?बाजारतळासमोर आणि इतर ठिकाणी गतिरोधक टाकण्यास टाळाटाळ केली जात आहे. वाहतूक पोलिसांना टाळण्यासाठी निवासी वसाहतीतून वाहने पळविली जातात. यातून अपघात होण्याची भीती आहे.- अमोल गिरी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका