शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

चिकलठाण्यात जालना रोड ओलांडणे धोक्याचेच; अपघाताची नेहमी भीती, वेगावर नियंत्रणाची मागणी

By साहेबराव हिवराळे | Updated: August 5, 2023 20:16 IST

एक दिवस एक वसाहत; वाढत्या वाहतुकीमुळे वेगावर नियंत्रण असावे, हीच स्थानिक नागरिकांची मुख्य मागणी आहे.

छत्रपती संभाजीनगर : मनपा कार्यक्षेत्राच्या विस्तारामुळे आजूबाजूच्या खेड्यांचे रुपांतर आता हळूहळू स्मार्ट शहरात होत आहे. चिकलठाणाही असेच बदलले आहे. स्मार्ट मनपा शाळेत तर डिजिटल एलईडी बोर्डवर शाळकरी मुले धडे गिरवत आहेत. फक्त वाढत्या वाहतुकीमुळे वेगावर नियंत्रण असावे, हीच स्थानिक नागरिकांची मुख्य मागणी आहे.

जालना रोडवर असलेल्या या चिकलठाणा गावात शेतकरी कुटुंबे मोठ्या प्रमाणात असून, औद्योगिक क्षेत्रामुळे कामगारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने व्यवसाय तसेच शेतीतील उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर असतो. ज्यांनी पिके घेण्यावर भर दिलेला आहे, अशी बहुतांश कुटुंबे नागपूर, नाशिक, मुंबई आदी बाजारपेठांत कोबी, टोमॅटो, भाजीपाला पाठवतात. या गावातील एक मोठी उणीव म्हणजे खेळाचे मैदान व उद्यान नाही. वृद्धांना तर शतपावली करणे वाहतुकीमुळे शक्य होत नाही.

स्मार्ट वर्कसाठी हातभार...कचरू नवपुते, साहेबराव कावडे मामा, रवी कावडे, ज्योती नाडे यांनी या वॉर्डाचे नगरसेवकपद भूषविले. त्यांच्या काळात त्यांनी विकासात्मक बदल आणले. शाळांचा विकास झाला. पेव्हर ब्लॉकचा रस्ता बदलून सिमेंटच्या रस्त्याचे काम नव्याने सुरू होणार आहे.- ज्योती नाडे, माजी नगरसेविका

दवाखान्यात फक्त ओपीडीच सुरू...आरोग्य सेवेसाठी मनपाचे ५० खाटांचे आरोग्य केंद्र तयार करण्यात आले. पण पुरेशा मनुष्यबळाअभावी सध्या केवळ ओपीडीच चालविली जात आहे. स्थानिक नागरिकांना जिल्हा रुग्णालयात जावे लागते. अंतर्गत रस्त्याची स्थिती सुधारण्याची गरज आहे.- नीलेश कावडे

पाणी कमी दाबाने...पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा सुधारावा.- लक्ष्मण गुरुखेल

पायी रस्ता ओलांडणे धोक्याचे..जालना रोड हायवे असल्याने वाहतुकीची वर्दळ खूप असते. शिफ्टप्रमाणे कामगारांची ने- आण केली जाते. त्यात स्कूलबसचीही भर पडते. प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने रस्त्यावर अडथळा करून उभी राहतात.- माजी नगरसेवक रवि कावडे

गतिरोधक टाकण्यास टाळाटाळ?बाजारतळासमोर आणि इतर ठिकाणी गतिरोधक टाकण्यास टाळाटाळ केली जात आहे. वाहतूक पोलिसांना टाळण्यासाठी निवासी वसाहतीतून वाहने पळविली जातात. यातून अपघात होण्याची भीती आहे.- अमोल गिरी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका