शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पिकांना जीवदान मिळणार; जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून खरीप संरक्षित पाळी सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 20:12 IST

लाभक्षेत्रातील ३८६ गावातील शेतकऱ्यांना दिलासा! 

पैठण: पावसाने गेल्या  अनेक दिवसापासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी ( दि. १) दुपारी १०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग सोडण्यात आला. हळूहळू विसर्गात वाढ करण्यात येणार असून २५ दिवस खरीप संरक्षित आवर्तन सुरू राहणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. खरीपासाठी पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जायकवाडी धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत असल्याने लाभक्षेत्रातील  शेतकऱ्यांनी खरीप पिके वाचवण्यासाठी जायकवाडी धरणाच्या कालव्यातून पाणी सोडा अशी मागणी केली होती. दरम्यान पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खरीप हंगामासाठी पाणीपाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

या निर्णयानुसार शुक्रवारी डाव्या कालव्यातून दुपारी दोन वाजता १०० क्युसेक्सने विसर्ग प्रारंभ करण्यात आला. विसर्ग हळूहळू वाढवून १००० क्युसेक्स पर्यंत करण्यात येणार आहे.  पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावातील १८३३२२ हेक्टर क्षेत्रातील खरिप पिकांना पाण्याची  गरज होती, धरणातून आवर्तन मिळालज नसते तर पिके हातातून जाण्याची धोकादायक परिस्थिती उदभवली होती.

धरणात सध्या ३३%  जलसाठा उपलब्ध असल्याने खरिप पिका साठी एक आवर्तन सोडण्यात यावे अशी जोरदार  मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती.  डावा कालव्यावर १४१६४० हे. सिंचन जायकवाडी धरणाच्या २०८ कि मी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १४१६४० हे. क्षेत्र सिंचना खाली येते यात औरंगाबाद - ७६२० हे,  जालना - ३६५८० हे,  परभणी - ९७४४० हेक्टर क्षेत्र येते या क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली असून पावसाने दडी मारल्याने पाण्या अभावी पिके धोक्यात आली आहेत. 

उजव्या कालव्यातूनही पाणी सोडाउजव्या कालव्यावर ४१६८२ हे क्षेत्र सिंचनाखाली येते. जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि मी लांबीचा  आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यात औरंगाबाद - १४३२ हे,  बीड - ३७९६० हे, व अहमदनगर - २२९० हे क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे या पिकांनाही  पाण्याची गरज आहे यामुळे उजव्या कालव्यातून पाणी सोडा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

पैठण तालुक्यातील ९०५२ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांना फायदा....पैठण तालुक्यात डाव्या कालव्यावर ७६२० हे क्षेत्र व उजव्या कालव्यावर १४३२ हे. क्षेत्रातील २८  गावात खरिपाची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे पावसाने दडी मारल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खेर्डा प्रकल्पासहीत आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडा. तालुक्यातील खेर्डा प्रकल्प कोरडा पडला आहे. ब्रम्हगव्हान सिंचन योजनेतून खेर्डा प्रकल्पात पाणी सोडावे तसेच आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण