शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

टीका, टोला अन् निशाणा; पीटलाईनच्या समारंभात जलील-दानवे-कराडांनी साधली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 15:26 IST

पीटलाइनच्या समारंभात नेत्यांनी साधली संधी, रेल्वे स्टेशनवर घसरले राजकारणाचे ‘इंजिन’

औरंगाबाद : रेल्वे स्टेशनवर सोमवारी पीटलाइनच्या पायाभरणी समारंभाच्या निमित्ताने एकमेकांवर टीका करण्याची, टोला लगावण्याची आणि निशाणा साधण्याची संधी राजकीय नेत्यांनी साधली. राजकारणाचे ‘इंजिन’च यानिमित्ताने घसरल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.

खा. इम्तियाज जलील यांनी मनोगत व्यक्त करताना प्रारंभीच ‘बहोत देर से दरपे आँख लगी थी, हुजूर, आते आते बहोत दूर कर दी...,’ या ओळी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाहत म्हटल्या. ‘अच्छे दिन आने वाले है...,’ असा नारा ऐकला होता. केंद्रीय रेल्वेमंत्री आल्याने औरंगाबाद रेल्वेचे ‘अच्छे दिन’ येतील, अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी मराठवाड्यातील रेल्वेच्या स्थितीवर, रेल्वेचे नेटवर्क नसल्याविषयी खंत व्यक्त करणारे मनोगत व्यक्त केले.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणाला सुरुवात करताच खा. इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला. ‘मराठवाड्यात रेल्वेचे नेटवर्क नाही, याचे कारण म्हणजे आपण ब्रिटिश नव्हे तर निजाम स्टेटमध्ये होतो. निजाम स्टेटमध्ये होतो म्हणून मागास आहे. कारण निजामाला रेल्वेची गरज नव्हती; परंतु आता मोदींचे सरकार आले असून, मराठवाड्यातील रेल्वेचे नेटवर्क वाढेल.’ ‘आदमी तो एमआयएम का है, लेकिन लगता है की ये बीजेपी है क्या...’ असे म्हणत ‘छत्रपती संभाजीनगरसाठी मागणी केली पाहिजे होती; पण तुम्ही औरंगाबादसाठी मागत आहात,’ असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी खा. इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला.

दुहेरीकरण, विद्युतीकरण मार्गी लागले आहे. नांदेड विभाग मध्य रेल्वेत जोडण्याची मागणी राजकीय मुद्दा आहे. हा मार्गी लागला तर पुढच्या निवडणुकीत तुम्ही लोकांना काय म्हणणार, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. अंबादास दानवे हेदेखील आजकाल टोकतात, असेही रावसाहेब दानवे म्हणाले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार आल्याचे डाॅ. भागवत कराड म्हणाल्याचा उल्लेख अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणात केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ‘साऊथ स्टाइल’मध्ये नेत्यांचा नावाचा उल्लेख करतानाही समारंभस्थळी हास्याचे फवारे उडत होते.

‘दानवे माझ्याकडे पाहताय, मी जास्त बोलणार नाही’समारंभात डाॅ. भागवत कराड यांनी मार्गदर्शन करीत विविध मागण्या मांडत होते. ‘खूप मागण्या आहेत; पण दानवे साहेब माझ्याकडे पाहत आहेत, मी जास्त बोलणार नाही,’ असे डाॅ. कराड म्हणाले. त्यानंतर एका मिनिटात डाॅ. कराड यांनी आपले भाषण आटोपते घेतले. औरंगाबादेत पहिल्यांदा रेल्वे मंत्री आल्याचेही वक्तव्य डाॅ. कराड यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर खा. जलील यांनी हे साफ खोटे असल्याचे म्हटले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादraosaheb danveरावसाहेब दानवेImtiaz Jalilइम्तियाज जलीलBhagwat Karadडॉ. भागवत