शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

शेतकऱ्यांसमोर संकट; आता कपाशी पिकांची पानगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 13:22 IST

हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांवर पहिल्याच वेचणीदरम्यान पानगळ सुरु झाल्याने कपाशीच्या झाडांना गळ लागून पाने झडत असल्याचा चिंताजनक प्रकार मंगळवार दि. ६ रोजी उघडकीस आला असून सोयगाव तालुक्यातील कपाशीचा हंगाम संकटात सापडला आहे.

सोयगाव : हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांवर पहिल्याच वेचणीदरम्यान पानगळ सुरु झाल्याने कपाशीच्या झाडांना गळ लागून पाने झडत असल्याचा चिंताजनक प्रकार मंगळवार दि. ६ रोजी उघडकीस आला असून सोयगाव तालुक्यातील कपाशीचा हंगाम संकटात सापडला आहे.

कपाशी पिकांच्या पहिल्या वेचण्या तालुक्यात सुरू झाल्या असून शेतकऱ्यांना कपाशीचे उत्पन्न हातात पाडून घेण्यासाठी नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. नुकतीच झालेली अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे काही मंडळात कपाशी पिके वाहून गेली तर काही मंडळात पाण्याच्या पुरात बुडाली. परंतु पावसाच्या उसंतीनंतर मात्र अचानक वाढते उन आणि पहाटेचे धुके यामुळे कपाशी पिकांवर परिणाम होवून कपाशीच्या पानांना गळ लागली आहे. त्यामुळे सोयगाव शिवारातील अनेक ठिकाणी कपाशी शेतीचे शिवार बोडखे झाल्याचे पहावयास मिळत आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखली जाणारी कपाशी गळून जात असल्याने एकेका शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान होत आहे. याशिवाय पहिल्याच वेचनीत कापसाच्या बोंडातील वजनात मोठी तफावत आढळत आहे. तब्बल तीन ते पाच ग्रॅम वजनाची तफावत निर्माण झालेली असल्याने दिसायला डेरेदार परंतु वजनाला हलके अशी बोंडे झाडावर आढळत आहे. एकरी उतारा घसरला असून एकरी अकरा ते बारा उतारा देणाऱ्या सोयगाव तालुक्याला यंदाच्या हंगामात तीन ते पाच क्विंटल उतारा शेतकऱ्यांच्या हातात मिळत असल्याचे पहिल्याच वेचणीमध्ये आढळून आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी