शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मराठवाड्यातील ३.५ लाख हेक्टर पिकांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:39 IST

मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी लोकमतला रविवारी औरंगाबाद येथे दिली

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांवर अस्मानी संकट ओढावले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार विभागातील ३० तालुक्यात १, ८९८  गावांतील सुमारे ६ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ३० हजार  हेक्टरवरील खरीप हंगामातील  पीक  हातातून गेले आहे.

पंचनामे आणि पीकपाहणी सुरू असून यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत  ही स्थिती आहे. मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे  यांनी लोकमतला रविवारी औरंगाबाद येथे दिली. भुसे यांनी ४ जिल्ह्यांतील अतिवृष्टी झालेल्या भागातील खरीप हंगामातील पिकांची  पाहणी करून आढावा घेतला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९५ हजार हेक्टर जिरायत, १३ हजार २५६ हेक्टर बागायत, १२  हजार ५८६  हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार दिसते आहे.

ऑक्टोबर- नोव्हेंबर - २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील खरीप हंगामातील पीक वाया गेले होते. विभागातील  ४४ लाख ३३  हजार ५४९ शेतकऱ्यांच्या ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा