शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

मराठवाड्यातील ३.५ लाख हेक्टर पिकांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:39 IST

मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी लोकमतला रविवारी औरंगाबाद येथे दिली

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांवर अस्मानी संकट ओढावले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार विभागातील ३० तालुक्यात १, ८९८  गावांतील सुमारे ६ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ३० हजार  हेक्टरवरील खरीप हंगामातील  पीक  हातातून गेले आहे.

पंचनामे आणि पीकपाहणी सुरू असून यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत  ही स्थिती आहे. मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे  यांनी लोकमतला रविवारी औरंगाबाद येथे दिली. भुसे यांनी ४ जिल्ह्यांतील अतिवृष्टी झालेल्या भागातील खरीप हंगामातील पिकांची  पाहणी करून आढावा घेतला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९५ हजार हेक्टर जिरायत, १३ हजार २५६ हेक्टर बागायत, १२  हजार ५८६  हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार दिसते आहे.

ऑक्टोबर- नोव्हेंबर - २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील खरीप हंगामातील पीक वाया गेले होते. विभागातील  ४४ लाख ३३  हजार ५४९ शेतकऱ्यांच्या ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा