शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

मराठवाड्यातील ३.५ लाख हेक्टर पिकांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:39 IST

मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी लोकमतला रविवारी औरंगाबाद येथे दिली

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांवर अस्मानी संकट ओढावले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार विभागातील ३० तालुक्यात १, ८९८  गावांतील सुमारे ६ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ३० हजार  हेक्टरवरील खरीप हंगामातील  पीक  हातातून गेले आहे.

पंचनामे आणि पीकपाहणी सुरू असून यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत  ही स्थिती आहे. मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे  यांनी लोकमतला रविवारी औरंगाबाद येथे दिली. भुसे यांनी ४ जिल्ह्यांतील अतिवृष्टी झालेल्या भागातील खरीप हंगामातील पिकांची  पाहणी करून आढावा घेतला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९५ हजार हेक्टर जिरायत, १३ हजार २५६ हेक्टर बागायत, १२  हजार ५८६  हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार दिसते आहे.

ऑक्टोबर- नोव्हेंबर - २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील खरीप हंगामातील पीक वाया गेले होते. विभागातील  ४४ लाख ३३  हजार ५४९ शेतकऱ्यांच्या ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा