शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

१०० कोटींचा श्रेयवाद पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 1:04 AM

शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा २८ जून रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांनी निधी माझ्यामुळेच आल्याचे जाहीर करून राजकीय श्रेयवादाला खतपाणी घातले.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा २८ जून रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांनी निधी माझ्यामुळेच आल्याचे जाहीर करून राजकीय श्रेयवादाला खतपाणी घातले.रस्त्यांची यादी अजून अंतिम होण्यात अनेक राजकीय अडथळे आहेत. महापालिका, जिल्हाधिकारी प्रशासन आणि पालिकेतील राजकारणाच्या कोंडीतून जेव्हा यादी अंतिम होईल. तेव्हा रस्त्यांच्या निविदांचा मार्ग मोकळा होईल; परंतु सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये १०० कोटींवरून जोरदार ‘राजकीय मंथन’ सुरू आहे. ५० दिवसांपासून त्या अनुदानातून किती रस्ते करायचे, कोणते रस्ते करायचे, याचा निर्णय होत नाहीये; परंतु मनपा सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई जोरदारपणे पेटली आहे.रस्त्यांसाठी अनुदान मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर भाजपने शहरातील चौका-चौकात होर्डिंग्ज लावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. शिवाय अनुदान जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या एकाही पदाधिकाºयाला बोलाविले नव्हते. या सगळ्या प्रकरणाची ‘सल’ शिवसेनेच्या मनात होती. त्यामुळे पालकमंत्र्यांनी भाजपच्या होर्डिंग्जबाजीचा समाचार घेत पालिकेला निधी देण्यासाठी आजवर मीच प्रयत्न करीत आलो आहे. यापुढेही प्रयत्न करीत असल्याचे बालाजीनगरमधील एका कार्यक्रमात जाहीर केले. दरम्यान महापौर भगवान घडमोडे म्हणाले, रस्त्यांबाबत शासन निर्णय घेणार आहे. श्रेयवादावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.