शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

औरंगाबाद जिल्हा परिषदेत बदल्यांवरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:49 IST

जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने मागितलेले तालुके न दिल्यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

ठळक मुद्दे‘सीईओं’ची माहिती : पहिल्या दिवशी झाली ३८ जणांची बदली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने मागितलेले तालुके न दिल्यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी सांगितले की, ‘एलसीडी’वर तालुकानिहाय रिक्त जागा दाखविण्यात आल्या. कर्मचाºयांच्या पसंतीनुसार बदल्यांना प्राधान्य देण्यात आले; परंतु काही ठिकाणी रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी कर्मचाºयांनी मागितलेल्या जागांवर त्यांची बदली करता आली नाही. यामध्ये औरंगाबाद, गंगापूर तालुक्यांना जास्त पसंतीक्रम होता. अन्य तालुक्यांच्या तुलनेत नेमक्या याच ठिकाणी अत्यल्प रिक्त जागा असल्यामुळे त्या जागांवर बदलीने पदस्थापना देण्याचे टाळले.आज शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत समुपदेशन पद्धतीने कर्मचाºयांची बदली करण्यात आली. यंदा विविध विभागांत कार्यरत १०२ कर्मचाºयांच्या प्रशासकीय, तर विनंतीवरून १६४ बदल्या प्रस्तावित आहेत़ बदलीची ही प्रक्रिया १५ मेपर्यंत पूर्ण होणार असून, आज सकाळपासून जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशनची प्रक्रिया राबविण्यात आली.सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सामान्य प्रशासन, दुपारी १ ते ४.३० वाजेपर्यंत महिला व बालविकास विभाग, तर ४.३० वाजेपासून पुढे वित्त विभागाच्या बदल्या करण्यात आल्या.सोमवारी १४ मे रोजी शिक्षण विभाग, पशुसंवर्धन आणि कृषी विभाग, तर १५ मे रोजी बांधकाम, पाणीपुरवठा, सिंचन विभाग तसेच आरोग्य, पंचायत विभागांतील बदलीपात्र कर्मचाºयांची समुपदेशन पद्धतीने बदली केली जाणारआहे.संवर्गनिहाय झालेल्या बदल्याआज सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहायक प्रशासन अधिकारी- १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी-४, वरिष्ठ सहायक- ५ आणि कनिष्ठ सहायकांच्या- १८, एकात्मिक बालविकास विभागातील पर्यवेक्षिकांच्या ७, वित्त विभागातील कनिष्ठ लेखाधिकार- २ आणि कनिष्ठ सहायक (लेखा)- १, अशी एकूण ३८ कर्मचाºयांची बदली करण्यात आली.आंतरजिल्हा बदलीने ३४४ शिक्षकांपैकी लातूर जिल्ह्यात जाणारे १३ शिक्षक सोडले, तर ३३१ शिक्षकांना काल कार्यमुक्त करण्यात आले. उद्या शनिवारी राज्यस्तरावरून जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश येण्याची शक्यता मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी वर्तवली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEmployeeकर्मचारीTransferबदली