शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी कोर्ट मॉनिटरिंग सेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 15:03 IST

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गतवर्षी दोषसिद्धीचा दर ३२ टक्के होता.

ठळक मुद्देसाक्षीदार फितूर होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. तांत्रिक पुराव्यावर पोलिसांचा भर 

औरंगाबाद : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी ज्या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध सबळ पुरावे आहेत, अशाच गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविणे, न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर साक्षीदार आणि पंच फितूर होणार नाही आणि त्यांचे संरक्षण होईल यावर भर दिला जात आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गतवर्षी दोषसिद्धीचा दर ३२ टक्के होता. दोषसिद्धीचे प्रमाण वाढावे आणि जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यावर पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित केले. याविषयी बोलताना पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी सांगितले की, गुन्हा दाखल झाल्यापासून ते न्यायालयात दोषारोपपत्र जाईपर्यंत आणि खटल्याची सुनावणी सुरू झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत पोलीस अधिकारी मॉनिटरिंग करीत असतात. खून, खुनाचा प्रयत्न, महिला अत्याचार, अशा गुन्ह्यांतील घटनेचे जीपीएस मॅपिंग केले जाते. आरोपी कसा आणि कुठून घटनास्थळी आला आणि गुन्हा केल्यानंतर तो कोणत्या मार्गाने गेला, याविषयीचा नकाशा तयार केला जातो. यासोबत त्याने वापरलेले वाहन आणि त्याचा सरासरी वेग हेसुद्धा गृहीत धरले जाते. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर तयार दोषारोपपत्र  पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त आणि सहायक सरकारी वकील यांच्या  समितीसमोर जाते. दोषारोपपत्रातील त्रुटी दूर करण्यास सांगितल्या जातात. यानंतर ते दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यात येते. शिवाय गंभीर गुन्ह्यात सरकारी पंच आणि साक्षीदार घेण्यात येतात. ते पंचनामा करतानाचे छायाचित्र काढून संकेतस्थळावर टाकले जाते. यामुळे साक्षीदार फितूर होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. 

तांत्रिक गुन्हे केले जातात फायनल बऱ्याचदा खोटे गुन्हे दाखल होतात; अथवा तक्रारीत आरोपी म्हणून उल्लेख असलेल्या व्यक्तीचा गुन्ह्यात समावेश नसल्याचे समोर येते तेव्हा खोटी तक्रार म्हणून गुन्ह्याचा अंतिम अहवाल न्यायालयात पाठविला जातो. अशा गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले जात नाही.

तांत्रिक पुराव्यावर पोलिसांचा भर तपास अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यापासून ते घटनास्थळाचे जीपीएस मॅपिंग करणे आणि न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेच्या तज्ज्ञ आणि ठस्सेतज्ज्ञांना  घटनास्थळी पाचारण करणे, सायबरतज्ज्ञांच्या मदतीने कॉल रेकॉर्डिंगसह तांत्रिक पुरावे गोळा करण्यास तपास अधिकाऱ्यांचा भर असतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादCourtन्यायालय