शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

By सुमित डोळे | Updated: June 12, 2024 11:39 IST

आकाशवाणी चौकात 'सिग्नलच्या गोंधळामुळे पुन्हा मृत्यू', शेकडो नागरिकांना जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो रस्ता

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक झालेला आकाशवाणी चौक ओलांडताना सुसाट गॅस टँकरच्या धडकेत अनिता यतीराज बाहेती (६५, रा. डोंबिवली) या जागीच ठार झाल्या. मंगळवारी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अनिता पती यतीराज यांच्यासह महेशनगरकडून आकाशवाणीच्या दिशेने रस्ता ओलांडत होत्या. त्याच वेळी मोंढ्याकडून सेव्हनहिलकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात यतीराज यात गंभीर जखमी झाले.

मूळ धुळ्याचे असलेले बाहेती कुटुंब नोकरीनिमित्त मुंबईच्या डोंबिवलीत स्थायिक झाले होते. बाहेती यांचे बहुतांश नातेवाईक शहरात वास्तव्यास आहेत. महेशनगर येथील एका नातेवाइकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी बाहेती दाम्पत्य मंगळवारी पहाटे रेल्वेने शहरात आले होते. दुपारपर्यंत साडूकडे थांबून ते महेशनगरच्या नातेवाइकाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. दिवसभर नातेवाईक, मित्र परिवारासोबत वेळ घालवला. रात्री ९ वाजेची परतीची रेल्वे असल्याने बाहेती ७.३० वाजता महेशनगरमधून आकाशवाणी चौकात आले. रिक्षासाठी रस्ता ओलांडत असताना गॅस सिलिंडर ट्रक (एम एच २६ - एच -५९८३) चालकाने त्यांना उडवले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक चालकाने अनिता यांना अक्षरश: १५ ते २० फूट फरपटत नेले. त्यानंतर ट्रक सोडून चालक पसार झाला.

मूळ धुळ्याचे, मुली पुण्यालामूळ धुळ्याचे असलेले यतीराज बाहेती नोकरीनिमित्त मुंबईला स्थायिक झाले होते. नाबार्डमधून ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दोन विवाहित मुली पुण्याला स्थायिक झाल्या. त्यानंतर कधी मुंबई तर कधी मुलींकडे दोघे राहायला जात होते. अपघातानंतर खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही यतीराज पत्नीविषयी विचारपूस करत हाेते.

पोलिसांना गांभीर्य कधी येणार?पाच वर्षांपूर्वी आकाशवाणी व अमरप्रीत चौकात सरळ वाहतूक ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. चौक बॅरिकेड्सने बंद करण्यात आला. मात्र, उपाययोजना न राबवताच चौक बंद केल्याने अपघातांची मालिका सुरू झाली. पादचाऱ्यांना ओलांडण्यासाठी ठराविक वेळेला सिग्नल सुरू करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांचाही गोंधळ उडतो. बॅरिकेड असल्याने वाहनचालक थांबत नाहीत. परिणामी, नागरिक जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात. यातून अपघात होतात. वाहनांचा वेग अधिक असल्याने मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पोलिसांना गांभीर्य येणार कधी, असा संतप्त प्रश्न नागरिक करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू