शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

By सुमित डोळे | Updated: June 12, 2024 11:39 IST

आकाशवाणी चौकात 'सिग्नलच्या गोंधळामुळे पुन्हा मृत्यू', शेकडो नागरिकांना जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो रस्ता

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक झालेला आकाशवाणी चौक ओलांडताना सुसाट गॅस टँकरच्या धडकेत अनिता यतीराज बाहेती (६५, रा. डोंबिवली) या जागीच ठार झाल्या. मंगळवारी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अनिता पती यतीराज यांच्यासह महेशनगरकडून आकाशवाणीच्या दिशेने रस्ता ओलांडत होत्या. त्याच वेळी मोंढ्याकडून सेव्हनहिलकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात यतीराज यात गंभीर जखमी झाले.

मूळ धुळ्याचे असलेले बाहेती कुटुंब नोकरीनिमित्त मुंबईच्या डोंबिवलीत स्थायिक झाले होते. बाहेती यांचे बहुतांश नातेवाईक शहरात वास्तव्यास आहेत. महेशनगर येथील एका नातेवाइकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी बाहेती दाम्पत्य मंगळवारी पहाटे रेल्वेने शहरात आले होते. दुपारपर्यंत साडूकडे थांबून ते महेशनगरच्या नातेवाइकाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. दिवसभर नातेवाईक, मित्र परिवारासोबत वेळ घालवला. रात्री ९ वाजेची परतीची रेल्वे असल्याने बाहेती ७.३० वाजता महेशनगरमधून आकाशवाणी चौकात आले. रिक्षासाठी रस्ता ओलांडत असताना गॅस सिलिंडर ट्रक (एम एच २६ - एच -५९८३) चालकाने त्यांना उडवले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक चालकाने अनिता यांना अक्षरश: १५ ते २० फूट फरपटत नेले. त्यानंतर ट्रक सोडून चालक पसार झाला.

मूळ धुळ्याचे, मुली पुण्यालामूळ धुळ्याचे असलेले यतीराज बाहेती नोकरीनिमित्त मुंबईला स्थायिक झाले होते. नाबार्डमधून ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दोन विवाहित मुली पुण्याला स्थायिक झाल्या. त्यानंतर कधी मुंबई तर कधी मुलींकडे दोघे राहायला जात होते. अपघातानंतर खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही यतीराज पत्नीविषयी विचारपूस करत हाेते.

पोलिसांना गांभीर्य कधी येणार?पाच वर्षांपूर्वी आकाशवाणी व अमरप्रीत चौकात सरळ वाहतूक ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. चौक बॅरिकेड्सने बंद करण्यात आला. मात्र, उपाययोजना न राबवताच चौक बंद केल्याने अपघातांची मालिका सुरू झाली. पादचाऱ्यांना ओलांडण्यासाठी ठराविक वेळेला सिग्नल सुरू करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांचाही गोंधळ उडतो. बॅरिकेड असल्याने वाहनचालक थांबत नाहीत. परिणामी, नागरिक जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात. यातून अपघात होतात. वाहनांचा वेग अधिक असल्याने मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पोलिसांना गांभीर्य येणार कधी, असा संतप्त प्रश्न नागरिक करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू