शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

बोंडअळीने कापूस फस्त; औरंगाबादची १ लाख ८० हजार शेतकरी मदतीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 17:43 IST

कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने सरकारने मदतीची घोषणा केली खरी; परंतु बियाणे कंपन्यांनी सरकारच्या घोषणेविरुद्ध सूर आळवला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ८६ टक्के शेतकर्‍यांनी विमा भरलेला नसल्याने जाहीर केलेली मदत देण्यास सरकार मोठ्या अडचणीत आले आहे. त्यामुळे बळीराजाचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

- श्रीकांत पोफळे 

औरंगाबाद : कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने सरकारने मदतीची घोषणा केली खरी; परंतु बियाणे कंपन्यांनी सरकारच्या घोषणेविरुद्ध सूर आळवला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ८६ टक्के शेतकर्‍यांनी विमा भरलेला नसल्याने जाहीर केलेली मदत देण्यास सरकार मोठ्या अडचणीत आले आहे. त्यामुळे बळीराजाचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.                                                

हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारची कोंडी केल्याने २२ डिसेंबरला कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मदत जाहीर केली. विमा कंपन्यांचे ८ हजार, बियाणे कंपन्यांकडून १६ हजार आणि राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून ६,८०० व १३,६०० म्हणजे कोरडवाहूसाठी हेक्टरी ३० हजार ८०० रुपये, तर बागायतीसाठी ३७ हजार ५०० रुपये अशी आर्थिक मदत देण्याची घोषणा आहे, दोन हेक्टरपर्यंत ही मदत मिळणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

महासुनावणीत आशा धूसरमहाराष्ट्र कापूस बी-बियाणे कायदा २००९ ‘अ ’नुसार  नुकसानभरपाई मिळावी म्हणून  जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हास्तरीय तक्रार समितीने पंचनामे केल्याशिवाय नुकसानभरपाई निश्चित करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात पंचनामे सुरूअसून महासुनावणीत निर्णय होणार आहे. त्यात चूक झाल्यास बियाणे कंपन्या किंवा शेतकरीदेखील न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.  महासुनावणीची ही प्रक्रिया सरकार रोखू शकत नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत फक्त सरकारच्या निर्णयावर अवलंबून नाही. सध्या परिस्थितीत घोषित मदत मिळण्यास अडचणी वाढल्या आहेत.

विमा कंपन्या न्यायालयात जाणार...कृषी विभागाने जिल्ह्यात सरासरी दोन हेक्टरचे नुकसान व कापसाचा ठराविक भाव गृहीत धरून कंपन्यांनी नुकसानभरपाई देण्याचा आकडा निश्चित केला; परंतु काही छोट्या कंपन्यांची मालमत्तादेखील तेवढी नसल्याने त्या कंपन्या महासुनावणीनंतर न्यायालयात जाणार हे नक्कीच. त्यामुळे बियाणे कंपन्या हेक्टरी १६ हजारांची नुकसानभरपाई देणार नाही, या मतावर ठाम आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कपाशी पिकाचे क्षेत्र ४ लाख ७ हजार हेक्टर असून, त्यापैकी ६५ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा भरलेला आहे. म्हणजे फक्त १६ % शेतकर्‍यांनी पीकविमा भरलेला असून, उर्वरित ८४ टक्के  शेतकर्‍यांनासुद्धा विम्याचे ८ हजार मिळणार नाही. शिवाय जिल्ह्यात सरसकट हे ८ हजारसुद्धा मिळणार नाही. ज्यांनी विमा भरलेला आहे त्यांनासुद्धा सरसकट ८ हजार मिळण्यास महसूल मंडळात १०० टक्के नुकसान झाल्याचे सिद्ध झाले पाहिजे. औरंगाबादसह राज्यातील १३ लाख ६० हजार शेतकरी बोंडअळीच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद