शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

स्मार्ट सिटीच्या खर्चाची नागपूरच्या महालेखाकारांकडून होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 13:03 IST

शहराला ४२६ कोटींचे अनुदान आतापर्यंत प्राप्त झाले असून यातील ३०० कोटी खर्च  झाले आहेत

ठळक मुद्देस्मार्ट सिटीमधून होत असलेल्या खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट नेमला आहे. नियमांच्या बाहेर आणि संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येत नाही.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा २०१४-१५ मध्ये समावेश करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी कार्पोरेशन लि. ला ४२६ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यातील तब्बल ३०० कोटी रुपये खर्चही झाले. या खर्चाचे लेखापरीक्षणच आजपर्यंत झालेले नाही. त्यामुळे नागपूरच्या महालेखाकार कार्यालयाकडून लेखा परीक्षण केले जाईल, अशी माहिती नवनियुक्त सीईओ बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.

स्मार्ट सिटीमधून होत असलेल्या खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट नेमला आहे. त्याच्याकडे सर्व खर्चाच्या हिशेबाची माहिती आहे. परंतु दरवर्षी शासकीय कार्यालयांमध्ये जसे लेखा परीक्षण करण्यात येते त्या पद्धतीने स्मार्ट सिटीचे लेखापरीक्षण आजपर्यंत झालेले नाही. स्मार्ट सिटी खाजगी कंपनी असली तरी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच कामाची पद्धत आहे. नियमांच्या बाहेर आणि संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येत नाही. मी या ठिकाणी येण्यापूर्वी नागपूरच्या महालेखाकार कार्यालयाने लेखापरीक्षण करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. आता पुन्हा मागणी करून महालेखाकार यांच्याकडून अधिकारी आणि कर्मचारी मागविण्यात येतील. त्यांच्याकडून मागील चार वर्षांमध्ये झालेल्या खर्चाचे लेखा परीक्षण करून घेतले जाईल, असे मनोहरे यांनी नमूद केले.

२५० कोटींची मनपाकडे मागणी करणारस्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद महापालिकेने २५० कोटी रुपयांचा वाटा टाकल्याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून उर्वरित अनुदान प्राप्त होणार नाही. महापालिकेने आर्थिक तरतूद करून स्मार्ट सिटीचा वाटा द्यावा अशी विनंती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांना भेटून आपण करणार असल्याचे मनोहरे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी