शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

CoronaVirus : पुर्ण पगार मिळेल की नाही; मोलमजूरी करणाऱ्या महिलाही आर्थिक विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 6:58 PM

६५ ते ७० टक्के घरांमध्ये मोलकरणींना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसक्तीची सुटी कष्टकरी महिलांना नकोशी झाली आहे.

औरंगाबाद : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम तळागाळातील लोकांपर्यंत प्रत्येकावरच झाला आहे. घराघरांमध्ये मोलमजूरी करून पोट भरणाऱ्या मोलकरणींनाही आता आर्थिक चिंतेने घेरले आहे. कारण लॉकडाऊनची घोषणा होताच जवळपास ६५ ते ७० टक्के घरांमध्ये मोलकरणींना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

ही सक्तीची सुटी कष्टकरी महिलांना नकोशी झाली आहे. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु झाला, दि. २३ रोजी सायंकाळी मुख्यमंंत्र्यांनी संचारबंदीची आणि २४ रोजी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हापासूनच बहुतांश घराचे दरवाजे मोलकरणींसाठी बंद झाले. घरकाम करायला येणारी एक महिला आणखी दोन- चार घरची कामे करून येते. त्यामुळे या महिलांपासूनही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच धास्तीने अनेक घरांमध्ये महिलांनी कामाला येणाऱ्या महिलांना सुटी देऊन घरातली सगळी कामे स्वत:च करायला सुरूवात केली आहे. अशीच परिस्थिती पुढील काही महिने कायम राहिली तर येणाºया आर्थिक संकटाला कसे तोंड द्यायचे, हा प्रश्न आता या महिलांना पडला आहे.

पगार देऊ, पण किती महिनेघरोघरी जाऊन मोलमजूरी करणाऱ्या महिलांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी घरी थांबणेच योग्य आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून सुट्या गृहित न धरता या महिन्याचा पगार तर बहुतांश घरांमधून त्यांना दिला जाणार आहेच. पण सध्या दि. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची परिस्थिती आहे. मग अर्धा महिना सुटी झाली तरी एप्रिल महिन्याचा पगारही पुर्ण द्यायचा का, असा प्रश्न आहे. याशिवाय पुढील २ ते ३ महिने अशीच परिस्थिती राहिली आणि त्या महिलांना कामावर येता आले नाही, तर आम्हालाही विचार करावा लागेल. कारण या लॉकडाऊनचा परिणाम आमच्याही उत्पन्नावर नक्कीच होणार आहे, असे काही गृहिणींनी सांगितले.

घरखर्च भागवणे कठीण होत आहेघरात आम्ही ८ ते १० लोक आहोत. प्रत्येकाच्याच कामावर परिणाम झाला आहे त्यामुळे घरखर्च भागविणे कठीण होत आहे. काही घरांमध्ये आमचा पगार कापणार नाही, असे सांगितले आहे. पण पुढे काही महिने असेच चालू राहिले, तर आम्हाला तरी बिना कामाचा पगार लोक किती महिने देतील. त्यामुळे आम्हालाही चिंता पडली आहे, असे घरकाम करणाऱ्या अलका खंडागळे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद