शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
3
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
4
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
5
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
6
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
7
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
8
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
9
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
10
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
11
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
12
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
13
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
14
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
15
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
16
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
17
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
18
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
19
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
20
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
Daily Top 2Weekly Top 5

नियतीचा खेळ, जिवंतपणी पायी चालण्याची नामुष्की, मृत्युनंतर रेल्वेने गावी मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 20:27 IST

रेल्वे एकच; १२00 जणांचा आनंदी; १६ देहांचा इहलोकीचा अंतिम प्रवास 

- संतोष हिरेमठ  

औरंगाबाद : एकीकडे १२०० लोकांच्या चेहऱ्यावर रेल्वेने गावी जाण्याचे समाधान झळकत होते. दुसरीकडे निपचित होऊन पडलेले १६ देह रेल्वेतून रवाना होत होते. प्रवास  दोघेही करीत होते. फरक फक्त एवढाच की १२०० लोकांचा आनंदी प्रवास सुरू झाला आणि १६ जणांचा जगाला सोडून जाण्याचा अखेरचा प्रवास होता.

जिवंतपणी वाहतूक सुविधेअभावी पायीच गावी जाताना रेल्वेखाली सापडून मृत्यूने झडप घातली आणि मृत्यूनंतर रेल्वेने मृतदेह गावी पाठविण्याची वेळ आली. बदनापूर- करमाडदरम्यान मालगाडीखाली सापडून मृत्यू पावलेल्या मजुरांसोबत नियतीने हा अजब खेळ खेळला. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन आहे. या परिस्थितीत शहरात अडकलेल्या नागरिकांना, कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याची तयारी महसूल प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने केली. औरंगाबादहून १२०० लोकांना घेऊन शुक्रवारी जबलपूरला रेल्वे रवाना झाली. याच रेल्वेने मालगाडीच्या अपघातात मृत्यू पावलेल्या १६ जणांचे शव पाठविण्यात आले.

घाटी रुग्णालयातून रवाना झालेल्या तीन रुग्णवाहिका सायंकाळी ७.३० वाजता रेल्वेस्टेशनवर दाखल झाल्या. यातून आधी ८ मृतदेह आणण्यात आले. रेल्वेस्टेशनच्या पार्किंगच्या परिसरातील प्रवेशद्वारापर्यंत या तिन्ही रुग्णवाहिका पोहोचल्या. त्यानंतर जवळपास अधार्तास मृतदेह रुग्णवाहिकेतच होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिकेतून पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह रेल्वेच्या सामानच्या बोगीत ठेवण्यात आला. त्यानंतर एक-एक मृहदेह याठिकाणी ठेवण्यात आले.  घाटीतील अन्य मृतदेह नेण्यासाठी याच रुग्णवाहिका रवाना झाल्या. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास आणखी ८ मृतदेह घेऊन या तिन्ही रुग्णवाहिका दाखल झाल्या. रात्री १० वाजेच्या सुमारास शेवटचा मृतदेह बोगीत ठेवण्यात आला. रेल्वेच्या सामानाच्या बोगीत हे मृतदेह ठेवतानाचे हे दृश्य पाहून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता. रेल्वेस्टेशन व्यवस्थापक अशोक निकम, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा, लोहमार्ग पोलीस निरीक्षक दिलीप साबळे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त होता.

जखमी आणि बचावलेले चौघे रवानाशुक्रवारी पहाटेच्या अपघातात जखमी झालेला एक जण आणि अपघातातून बचावलेले चौघेही रात्रीच्या रेल्वेने मध्यप्रदेशकडे रवाना झाले. रेल्वेत बसण्यापूर्वी या चौघांना पोलिसांनी जेवणाची पाकिटे दिली. चौघांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नव्हते. त्यांचे चेहरे थकल्यासारखे दिसत होते. नि:शब्द भावनेने ते रेल्वेत बसले. रात्रभर सोबत करणाऱ्या  १६ सहकाऱ्यांचे मृतदेहही याच रेल्वेतून सोबत करीत  असल्याच्या दु:खाची सल मात्र होती.  

सामानाच्या बोगीत मृतदेहमृतदेह ठेवण्याची व्यवस्था ही रेल्वेच्या सामानाच्या बोगीत करण्यात आली होती. याठिकाणी एक - एक मृतदेह ठेवण्यात आला. मृत्यूनंतर ह्यपार्सलह्ण बोगीत ठेवताना अनेकांचे मन हळहळले. जबलपूर  येथून सर्व मृतदेह त्यांच्या गावी नेण्याचे नियोजन करण्यात आले. 

हे धावले मदतीलामृतदेह घाटीतून रेल्वेस्टेशनला आणण्यासाठी आणि मृतदेह रेल्वेत ठेवण्यासाठी  चाचू अ‍ॅम्ब्युलन्स ग्रुपचे किरण रावल, शेख इम्रान, प्रदीप शिंदे आणि केके ग्रुपचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे,  इजहार शेख, लखन भिंगारे आदींनी मदत केली.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थितीमृतदेह रवाना करताना ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती होती. या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह गावी पाठविण्यात आले आहेत. नातेवाईकांना किमान अंत्यविधी करता येईल, असे त्या म्हणाल्या.

रेल्वेतील अन्य प्रवासी झाले भावुक या रेल्वेने १२०० प्रवासी रवाना झाले. अनेकांना या रेल्वेत दुदैर्वी अपघातात मयत झालेल्या मजुरांचे मृतदेह नेण्यात येत असल्याची कल्पना नव्हती. मात्र, पोलीस, रुग्णवाहिक आणि त्यातून उतरणारे मृतदेह पाहून ही बाब लक्षात आली. तेव्हा अनेक प्रवासी भावुक झाले. 

दुदैर्वी घटनेची साक्षीदार होणे दुर्दैवचआम्ही दीड महिन्यापासून गावी जाण्याची प्रतीक्षा करीत होतो. तो क्षण आला; परंतु आम्ही ज्या रेल्वेने जात आहोत, त्याच रेल्वेने आमच्या येथील काहींचे मृतदेह रवाना होतील, असे कधीही वाटले नव्हते. ही खूपच दुदैर्वी घटना घडली.- रोहिणी परिहार, प्रवासी

मृत्यूनंतर प्रवास क्लेशदायक पाच महिन्यांपूर्वी गावी गेलो होतो. त्यानंतर पुन्हा आलो होतो. चालक म्हणून काम करीत होतो; पण गेली काही दिवस खूप अडचणी आल्या. त्यामुळे गावी जात आहे. आमच्यासोबत मृत्यू पावलेल्या लोकांचाही प्रवास घडत आहे. त्यांची आधीच सुविधा झाली पाहिजे होती.- प्रकाश यादव, प्रवासी 

टॅग्स :Aurangabad Railway Tragedyऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद