शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

coronavirus : औरंगाबादेत आणखी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 7:07 PM

सध्या २११२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गोंदी, अंबड ( जि. जालना) येथील एका रुग्णाचा आणि औरंगाबादेतील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मयत पावलेल्या रुग्णांची संख्या ३३८ झाली आहे.

भोईवाडा येथील ६६ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, संजयनगर- बायजीपुरा येथील २७ वर्षीय महिला आणि संजयनगर- बायजीपुरा येथीलच ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच गोंदी, अंबड ( जि. जालना) येथील ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. संजयनगर- बायजीपुरा एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. 

सलग चौथ्या दिवशी २०० बाधितांची वाढ 

औरंगाबाद जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने द्विशतक पार केले. जिल्ह्यात सकाळी तब्बल २०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात १२५ रुग्ण मनपा हद्दीतील आणि ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७२३ कोरोनाबाधित आढळले असून, यातील २३७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २३८ रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २११२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद