शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Coronavirus : औरंगाबादकरांना मोठा धक्का ! तब्बल ६१ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या सहाशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 13:04 IST

जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ६१९ झाली आहे

ठळक मुद्देशहरात कोरोनाचा १४ वा बळीदोन दिवसात १११ रुग्णांची भर

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ५० रुग्ण वाढल्यावर सोमवारी सकाळीच तब्बल ६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६१९ झाली आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.

रामनगर 22, एस आरपीएफ जवान १, सदानंदनगर 8, किलेअर्क ८, न्यायनगर २, दत्त नगर कैलास नगर ५ , भवानी नगर जुना मोंढा 3, पुंडलिक नगर गल्ली 1 , एन 4 सिडको, बायजीपुरा,  संजयनगर, कैलासनगर, बीड बायपास, कोतवालपुरा, सातारा गाव  येथील प्रत्येकी एक फुलशिवरा गंगापूर येथील 4 रुग्णांचा समावेश असल्याचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी सांगितले

चार दिवसात २४१ रुग्णांची भरशहरात रविवारी सकाळच्या सत्रात सात भागातील ३७ रुग्ण आढळल्यावर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांची भर पडत दिवसभरात रुग्णसंख्या ५० तर एकुण बाधितांची संख्या ५५८ झाली होती. मागील चार दिवसात शहरात शुक्रवारी १०० , शनिवारी ३० आणि रविवारी ५० , सोमवारी सकाळी ६१ अशा तब्बल २४१ रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.

शहरात कोरोनाचा १४ वा बळीऔरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी गेला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना रामनगर- मुकुंदवाडी येथील ८० वर्षीय रुग्णाचा रात्री १.१० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. सदर रुग्णावर घाटीत ८ मे पासून उपचार सुरू होते. ९ मे रोजी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने १० मे पासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहरातील हा कोरोनाचा १४ मृत्यु आहे.

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२ वरऔरंगाबादमध्ये शनिवारी एकाच दिवशी ३५ जण कोरोनामुक्त झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी आणखी २७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. यातील आठ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.  तर मनपाच्या केंद्रात दाखल १९ जणही कोरोनामुक्त झाले. यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२ वर गेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद