शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये कोरोनाचा मृत्यूदर २.५२ वरून ४.६३ वर; १५ दिवसांपासून रोज मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:41 IST

यादरम्यान २५ मे रोजी सर्वाधिक म्हणजे ६ रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे रोज मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. ५१ ते ८० वयोगटातील सर्वाधिक मृत्यू

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : शहरात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनामुळे शहरात रोज रुग्णांचा मृत्यू होत आहे. या १५ दिवसांत तब्बल ४६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. धक्कादायक म्हणजे या कालावधीत मृत्यूदर २.५२ वरून ४.६३ टक्के झाला. परिणामीे, चिंता व्यक्त होत आहे.

शहरात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६३ झाली आहे. शहरात ५ एप्रिल ते १२ मेदरम्यान कोरोनामुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झालेला होता. या तारखेपर्यंत शहरात मृत्यूदर २.५२ टक्के होता. मात्र, १३ मेपासूनचा प्रत्येक दिवस शहराची चिंता वाढविणारा ठरत आहे. कारण या दिवसापासून शहरात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसत आहे.  यादरम्यान २५ मे रोजी सर्वाधिक म्हणजे ६ रुग्णांचा मृत्यू झाला. रोज मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. 

५१ ते ८० वयोगटातील सर्वाधिक मृत्यूशहरात आतापर्यंत ३२ ते ९४ या वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यात एकूण ६३ मृत्यंूपैकी  ५१ ते ८० या वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ४९ मृत्यू झालेले आहेत. बहुतांश रुग्णांना मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आदी गंभीर आजार होते. या आजारांमुळे रुग्णांनी उपचारास प्रतिसाद दिला नसल्याने मृत्यू ओढवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मृत्यू रोखण्याचे आव्हानशहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अतिगंभीर रुग्णांना फायदेशीर ठरणारे ३५ हजारांचे इंजेक्शन देण्यासह अनेक उपाय केले जात आहेत; परंतु मृत्यूचे सत्र थांबविण्यात अपयश येत आहे. आरोग्य यंत्रणेसमोर कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्याचे आव्हान उभे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू