शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

औरंगाबादमध्ये कोरोनाचा मृत्यूदर २.५२ वरून ४.६३ वर; १५ दिवसांपासून रोज मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:41 IST

यादरम्यान २५ मे रोजी सर्वाधिक म्हणजे ६ रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे रोज मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. ५१ ते ८० वयोगटातील सर्वाधिक मृत्यू

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : शहरात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनामुळे शहरात रोज रुग्णांचा मृत्यू होत आहे. या १५ दिवसांत तब्बल ४६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. धक्कादायक म्हणजे या कालावधीत मृत्यूदर २.५२ वरून ४.६३ टक्के झाला. परिणामीे, चिंता व्यक्त होत आहे.

शहरात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६३ झाली आहे. शहरात ५ एप्रिल ते १२ मेदरम्यान कोरोनामुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झालेला होता. या तारखेपर्यंत शहरात मृत्यूदर २.५२ टक्के होता. मात्र, १३ मेपासूनचा प्रत्येक दिवस शहराची चिंता वाढविणारा ठरत आहे. कारण या दिवसापासून शहरात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसत आहे.  यादरम्यान २५ मे रोजी सर्वाधिक म्हणजे ६ रुग्णांचा मृत्यू झाला. रोज मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. 

५१ ते ८० वयोगटातील सर्वाधिक मृत्यूशहरात आतापर्यंत ३२ ते ९४ या वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यात एकूण ६३ मृत्यंूपैकी  ५१ ते ८० या वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ४९ मृत्यू झालेले आहेत. बहुतांश रुग्णांना मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आदी गंभीर आजार होते. या आजारांमुळे रुग्णांनी उपचारास प्रतिसाद दिला नसल्याने मृत्यू ओढवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मृत्यू रोखण्याचे आव्हानशहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अतिगंभीर रुग्णांना फायदेशीर ठरणारे ३५ हजारांचे इंजेक्शन देण्यासह अनेक उपाय केले जात आहेत; परंतु मृत्यूचे सत्र थांबविण्यात अपयश येत आहे. आरोग्य यंत्रणेसमोर कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्याचे आव्हान उभे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू