शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

CoronaVirus : कुटुंबाच्या ओढीने १९ परप्रांतीय मजूर कॅम्पमधून पळाले, १५ जणांना परत आणण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:37 IST

१४ दिवसांचा कालावधी होऊन गेला तरीही  सोडण्याबाबत प्रशासनाकडून कसल्याही हालचाली दिसून येत नसल्यामुळे १९ परप्रांतीय तरुण गुपचूप निघून गेले.

ठळक मुद्देभालगाव येथील कॅम्पमध्ये स्थलांतरितांची व्यवस्था करण्यात आली आहे

औरंगाबाद : कुटुंबाला भेटण्यासाठी आतूर झालेले क्वारंटाइन मजुरांच्या कँपमधून  पळून गेलेल्या १९ पैकी १५ तरुणांना परत आणण्यात पोलिसांना यश आले.

औरंगाबादपासून दोन- तीन किलोमीटर अंतरावर भालगाव आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. बाळासाहेब पवार यांचे शरदचंद्र पवार आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार तेथील वसतिगृहात दुसऱ्या जिल्ह्यातील तसेच परप्रांतीय मजुरांची निवास, भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर परप्रांतीय मजूर गावाकडे परतण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी जळगाव येथे मार्केटिंगचे काम करणारे सातारा, सांगली जिल्ह्याचे १८-२० तरुण गावाकडे निघाले व ते औरंगाबादेत अडकले. त्या स्थलांतरित मजुरासह या तरुणांना महापालिका प्रशासनाने गारखेडा परिसरातील एका शाळेत ठेवले होते; परंतु तेथे या लोकांची गैरसोय होत असल्याची ओरड झाल्यामुळे त्या सर्वांची व्यवस्था मग  भालगाव येथे वसतिगृहातकरण्यात आली. 

१४ दिवसांचा कालावधी होऊन गेला तरीही त्यांना सोडण्याबाबत प्रशासनाकडून कसल्याही हालचाली दिसून येत नसल्यामुळे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तेथून ते १९ तरुण गुपचूप निघून गेले. ही बाब सकाळी निदर्शनास आल्यानंतर चिकलठाणा ठाण्याचे निरीक्षक महेश आंधळे व सहकारी कर्मचाऱ्यांनी पैठण, शेवगाव, नेवासा, कर्जत आदी ठिकाहून परत आणले व त्याच वसतिगृहात नेऊन ठेवले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस