शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

यंदा बंधाऱ्यांच्या गेट खरेदीला ‘कोरोना’चे कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 19:59 IST

अजूनही जिल्ह्यातील १०५ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे गेटविना 

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचा चुराडा दुरुस्तीसाठीही निधीची अडचण

- विजय सरवदे

औरंगाबाद : दरवर्षी पाऊस सुरू झाला की, कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटचा विषय चर्चेला येतो. पावसाळ्याचे चार महिने सरल्यानंतर हा विषय पुन्हा अडगळीत पडतो. अलीकडे गेट खरेदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, तरी अजूनही गेटविना १०५ बंधारे सताड उघडेच आहेत. त्यामुळे यंदा या बंधाऱ्यांत टिपूसभरही पाणी अडणार नाही. दुसरीकडे, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्व निधीमध्ये कपात करण्यात आल्यामुळे यंदाही गेट खरेदी करणे प्रशासनाला शक्य होणार नाही. 

जिल्ह्यामध्ये ५८५ कोल्हापुरी बंधारे असून, मागील अनेक वर्षांपासून १५० बंधाऱ्यांना गेटच नव्हते. गेट खरेदीसाठी दोन वर्षांपूर्वी जि.प. उपकरातून पावणेदोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते; परंतु राजकीय हित आणि वेळोवेळी ठराव बदलण्यात आल्यामुळे निविदा प्रक्रियेला विलंब होत गेला. गेल्या अनेक वर्षापासून गेट खरेदीचा जिल्हा परिषदेमध्ये घोळ चालू असल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी पुढाकार घेऊन ६२ बंधाऱ्यांना १७७७ गेट खरेदी करण्याची प्रक्रिया मार्गी लावली. त्यापैकी प्रत्यक्ष १३९८ गेट बसविण्यात आले असून, उर्वरित ३७९ गेट खरेदीसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेतूनही २२०० गेट बसविण्यात आले आहेत. यावर्षी (सन २०२०-२१) ६५ लाखांचे ६०० दरवाजे खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. १८ बंधाऱ्यांना हे दरवाजे बसविण्यात येणार आहेत. तरीही आणखी १०५ बंधाऱ्यांना गेटची गरज आहे. त्यासाठी ३,१०५ खरेदी करण्याकरिता ३ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, यंदा गेट खरेदीला ‘कोरोना’चा अडसर ठरला आहे. शासनाने सर्व योजना व खरेदीवर निर्बंध घातले आहेत. गेट खरेदी न झाल्यास यंदाही अनेक बंधाऱ्यांमधील पाणी वाहून जाणार आहे. 

दुरुस्तीसाठीही निधीची अडचणगेल्या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ५८ बंधारे वाहून गेले, तर यंदा ४ बंधाऱ्यांना क्षती पोहोचली आहे. या एकूण ६२ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ४५ लाख ३२ हजार रुपयांचा निधी लागणार आहे. मात्र, यंदा ‘कोरोना’मुळे ‘डीपीसी’कडून निधी मिळणे शक्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

४८७ को.प. बंधाऱ्यांमध्ये यंदा पाणीसाठा होऊ शकेलगेल्या वर्षी जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांवर जलयुक्त शिवार आणि उपकरातून ३ हजार ५९८ गेट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे चालू वर्षामध्ये साधारणपणे ४८७ बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊ शकेल. तसे झाल्यास भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होऊन सुमारे ६००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. - एस. जी. राठोड, प्रभारी कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, जिल्हा परिषद 

टॅग्स :WaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी