शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ऑक्सिजन मास्क काढून फेकत रुग्णालयातून कोरोनाबाधित पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 7:01 PM

सकाळी त्यांची पत्नी विचारपूस करण्यासाठी घाटीत गेली. तेव्हा तुमच्या रुग्णाने घाटीतून पलायन केल्याचे त्यांना सांगण्यात आले.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या मेडिसीन इमारतीमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित ४५ वर्षीय रुग्णाने पलायन केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली.

चितेगाव येथील ४५ वर्षीय कामगाराला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन लावला. मात्र, ऑक्सिजन मास्क ते सतत काढून फेकत. यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांचे हातपाय बांधून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवले. ही बाब डॉक्टरांनी नातेवाइकांना फोन करून कळविली. 

गुरुवारी सकाळी त्यांची पत्नी विचारपूस करण्यासाठी घाटीत गेली. तेव्हा तुमच्या रुग्णाने घाटीतून पलायन केल्याचे त्यांना सांगण्यात आले. ही बाब पोलिसांना कळविण्यासही सांगितले. यामुळे रुग्णाच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, रुग्ण घाटीतून थेट चितेगाव येथील घरी गेल्याचे समोर आले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गावात आल्याचे कळताच गावकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचे नातेवाइकांना सांगितले. मात्र सायंकाळपर्यंत रुग्ण घाटीत परतला नव्हता. याप्रकरणी घाटी प्रशासनाने बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. जागोजागी सुरक्षारक्षक असताना कोविड पॉझिटिव्ह रुग्ण वॉर्डातून पळून जातो कसा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद