शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोना असो किंवा नसो अंत्यसंस्काराला नागरिकांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 20:16 IST

corona virus शहरात दररोज किमान पंधरा ते वीस नागरिकांचा वेगवेगळ्या कारणांमध्ये मृत्यू होत आहे. स्मशानभूमी आणि कब्रस्तानात अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देलग्नकार्य बंद करून उपयोग काय?

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रशासनाने लग्नकार्य करण्यास बंदी घातली आहे. मात्र, अंत्यसंस्काराला कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. एखाद्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला किंवा नाही याची खात्री न करता शेकडो नागरिक अंत्यसंस्काराला गर्दी करत आहेत. या प्रकाराकडे पोलीस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे हे विशेष.

शहरात दररोज किमान पंधरा ते वीस नागरिकांचा वेगवेगळ्या कारणांमध्ये मृत्यू होत आहे. स्मशानभूमी आणि कब्रस्तानात अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. याठिकाणी कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. अंत्यसंस्काराला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमके कशामुळे झाला हे सुद्धा माहीत नसते. मागील वर्षी कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर एखादा नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबातील दोन किंवा चार मंडळींनाच कब्रस्तान, स्मशानभूमीत हजर राहण्याची परवानगी होती. दुसऱ्या कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला असेल तर किमान ५० नागरिकांनाच उपस्थिती याची मुभा होती. सध्या शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, नागरिक स्वतःची काळजी घ्यायला तयार नाही. आजही कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास पोलिसांची परवानगी लागते. यामध्ये अंत्यसंस्काराला कितीजण हजर राहावे याचा उल्लेख नाही. ज्यांना परवानगी दिली त्यांच्या अंत्यसंस्काराला किती गर्दी आहे याची खात्री ही आजपर्यंत पोलिसांनी केलेली नाही.

रुग्णालयातून मृतदेह स्मशानभूमीतचएखाद्या नागरिकाचा कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास मृतदेह महापालिकेने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत थेट स्मशानभूमीत नेण्यात येतो. पुढील सर्व कारवाई महापालिकेकडून करण्यात येते. ज्यांच्याकडे पिवळे कार्ड आहे त्यांना अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा खर्चही महापालिका देते.

पोलिसांनी लक्ष देण्याची गरजकोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना पोलीस अंत्यसंस्काराची परवानगी देतात. महापालिका फक्त अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण करते. याठिकाणी नेमकी गर्दी किती होत आहे याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद