शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

कोरोना असो किंवा नसो अंत्यसंस्काराला नागरिकांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 20:16 IST

corona virus शहरात दररोज किमान पंधरा ते वीस नागरिकांचा वेगवेगळ्या कारणांमध्ये मृत्यू होत आहे. स्मशानभूमी आणि कब्रस्तानात अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देलग्नकार्य बंद करून उपयोग काय?

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रशासनाने लग्नकार्य करण्यास बंदी घातली आहे. मात्र, अंत्यसंस्काराला कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. एखाद्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला किंवा नाही याची खात्री न करता शेकडो नागरिक अंत्यसंस्काराला गर्दी करत आहेत. या प्रकाराकडे पोलीस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे हे विशेष.

शहरात दररोज किमान पंधरा ते वीस नागरिकांचा वेगवेगळ्या कारणांमध्ये मृत्यू होत आहे. स्मशानभूमी आणि कब्रस्तानात अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. याठिकाणी कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. अंत्यसंस्काराला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमके कशामुळे झाला हे सुद्धा माहीत नसते. मागील वर्षी कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर एखादा नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबातील दोन किंवा चार मंडळींनाच कब्रस्तान, स्मशानभूमीत हजर राहण्याची परवानगी होती. दुसऱ्या कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला असेल तर किमान ५० नागरिकांनाच उपस्थिती याची मुभा होती. सध्या शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, नागरिक स्वतःची काळजी घ्यायला तयार नाही. आजही कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास पोलिसांची परवानगी लागते. यामध्ये अंत्यसंस्काराला कितीजण हजर राहावे याचा उल्लेख नाही. ज्यांना परवानगी दिली त्यांच्या अंत्यसंस्काराला किती गर्दी आहे याची खात्री ही आजपर्यंत पोलिसांनी केलेली नाही.

रुग्णालयातून मृतदेह स्मशानभूमीतचएखाद्या नागरिकाचा कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास मृतदेह महापालिकेने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत थेट स्मशानभूमीत नेण्यात येतो. पुढील सर्व कारवाई महापालिकेकडून करण्यात येते. ज्यांच्याकडे पिवळे कार्ड आहे त्यांना अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा खर्चही महापालिका देते.

पोलिसांनी लक्ष देण्याची गरजकोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना पोलीस अंत्यसंस्काराची परवानगी देतात. महापालिका फक्त अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण करते. याठिकाणी नेमकी गर्दी किती होत आहे याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद