शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

संकट गडद होतेय; मराठवाड्यात ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 14:00 IST

मराठवाड्यात आजवर १७९९ जणांचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्यामुळे झाला असून, यामध्ये ९६८ जण ग्रामीण भागातील आहेत.

ठळक मुद्दे५९ हजारांपैकी ३६ हजार रुग्ण ग्रामीण भागातउपचाराच्या सुविधा मात्र अपूर्णच

औरंगाबाद : कोरोना आता ग्रामीण भागात वाढतो आहे. मराठवाड्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात ६० टक्के रुग्ण असून, संकट अधिक गडद होत आहे.  लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मिशन बिगिनच्या चौथ्या टप्प्यात सर्व व्यवहारांना परवानगी मिळाल्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे मत आहे. 

मराठवाड्यात आजवर १७९९ जणांचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्यामुळे झाला असून, यामध्ये ९६८ जण ग्रामीण भागातील आहेत. शहरी भागातील ८३१ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. मृत्यूचे प्रमाणदेखील ग्रामीण भागात जास्त आहे.ग्रामीण आरोग्य व्यवस्था तोकडी आहे. आरोग्य सेवेतील कर्मचारी, क्वारंटाईन सेंटर्स, सीसीसीबाबत प्रशासनाने वारंवार बैठक, पाहणी व सूचना करून यंत्रणा अद्ययावत करण्याचे प्रयत्न केले असले तरी औरंगाबादला रुग्ण येत आहेत. त्यामुळे येथे आयसीयू बेडस् उपलब्ध होत नसल्याची ओरड होत आहे. डॉक्टर्स स्वेच्छानिवृती मिळावी यासाठी प्रशासनाकडे अर्ज करू लागले आहेत. औषधी तुटवड्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी डॉक्टर्स नाहीत. गेल्या महिन्यात घाटीतून डॉक्टरांची टीम मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाठविण्यात आली होती. यासारखी अनेक प्रकरणे असून, प्रशासन हवालदिल होत चालले आहे. विभागात मृत्यूचे प्रमाण ३.५ टक्क्यांवर आले आहे. ७१.५१ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. १०.८८ टक्के कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण आहे. 

आकडे बोलतात...जिल्हा     शहरी रुग्ण    ग्रामीण रुग्ण      एकूणऔरंगाबाद    १५५०५     ८४९४    २३९९९नांदेड    २८७२     ३८६६    ६७३८परभणी     १३४८    १३०८    २६५६लातूर    ३३६८    ५०६४    ८४३२जालना    ००    ४९३८    ४९३८बीड    ००     ४७०५     ४७०५हिंगोली    ००    १५१३    १५१३उस्मानाबाद    ००     ५९२५     ५९२५ एकूण    २३०९३    ३५८१३    ५८९०६ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद