शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

‘नीट’शिवाय मेडिकल प्रवेशावर मतमतांतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:02 IST

--- औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट’ (नीट) पूर्वपरीक्षा तमिळनाडू सरकारने रद्द करून ...

---

औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट’ (नीट) पूर्वपरीक्षा तमिळनाडू सरकारने रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यावर बोर्डाच्या परीक्षेतून अचूक मूल्यांकन होण्याबद्दल साशंकता व्यक्त करीत तार्किक ज्ञान, क्षमता कशी मोजणार असे सवाल तज्ज्ञ, विद्यार्थ्यांतून उपस्थित केले जात आहेत; तर ‘नीट’च्या तयारीसाठी क्लासेसचा होणारा खर्च टळेल, अकरावी-बारावीकडे दुर्लक्ष होणार नाही, असाही मतप्रवाह आहे.

नीट परीक्षेआधी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने तमिळनाडूतील नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तमिळनाडू विधानसभेत ठराव मंजूर झाला. त्यामुळे बारावी गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले जाणार आहेत, तर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जागाही राखीव केल्या गेल्या आहेत. नीटची काठिण्यता दिवसेंदिवस वाढत असून ती कमी होण्यावर विचार व्हावा. मात्र, नीट रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर या निर्णयामुळे ‘नीट’च्या तयारीत विद्यार्थ्यांचे अकरावी-बारावीकडे दुर्लक्ष होते. बारावीच्या शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यांकनाकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधत शासकीय शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही कमी खर्चात वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकण्याला स्थान मिळू शकेल, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.

--

तज्ज्ञ म्हणतात....

पूर्वीची सीईटी परीक्षा पद्धती नीटपेक्षा चांगली होती. नीट परीक्षेची काठिन्यपातळी वाढल्याने विद्यार्थ्यांचा ताणतणाव अधिक वाढला. तो कमी व्हायला पाहिजे. मात्र, कोणतीही पूर्वप्रवेश परीक्षा न घेता वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश देणे सयुक्तिक नाही.

- डॉ. शिराझ बेग, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

----

यापूर्वीही तमिळनाडू राष्ट्रीय प्रवेशप्रक्रियेत सहभागी होत नव्हते. तेथील मुले बाहेर वैद्यकीय शिक्षणाला येत नाहीत. तिथे ते बाहेर राज्यातील मुलांना प्रवेश देत नाही. तमिळनाडूचा निर्णय विद्यार्थिहिताचा वाटत नाही.

- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार

--

विद्यार्थी म्हणतात....

बोर्डाच्या परीक्षेतून गुणवत्तेचे अचूक मोजमाप होतेच असे नाही, तर नीटसारखी परीक्षा वैद्यकीय क्षेत्रात येणाची पात्रता, क्षमता, तार्किक ज्ञानही मोजण्यास उपयुक्त ठरते. तसे न झाल्यास परिणाम बाहेर पडणाऱ्या डाॅक्टरांवर होईल.

-विशाल मुळे, एमबीबीएस विद्यार्थी

-

बारावीच्या परीक्षेत केवळ रट्टा मारणारेही चांगले गुण मिळवू शकतात. मात्र, नीट परीक्षेत आठवी ते बारावीपर्यंतचा पाया पक्का असावा लागतो. सीबीएसई, एनसीआरटीच्या अभ्यासक्रमही अभ्यासावा लागतो. नीटशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश सयुक्तिक नाही.

- शिवानी पावडे, एमबीबीएस, विद्यार्थिनी