शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

‘नीट’शिवाय मेडिकल प्रवेशावर मतमतांतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:02 IST

--- औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट’ (नीट) पूर्वपरीक्षा तमिळनाडू सरकारने रद्द करून ...

---

औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट’ (नीट) पूर्वपरीक्षा तमिळनाडू सरकारने रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यावर बोर्डाच्या परीक्षेतून अचूक मूल्यांकन होण्याबद्दल साशंकता व्यक्त करीत तार्किक ज्ञान, क्षमता कशी मोजणार असे सवाल तज्ज्ञ, विद्यार्थ्यांतून उपस्थित केले जात आहेत; तर ‘नीट’च्या तयारीसाठी क्लासेसचा होणारा खर्च टळेल, अकरावी-बारावीकडे दुर्लक्ष होणार नाही, असाही मतप्रवाह आहे.

नीट परीक्षेआधी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने तमिळनाडूतील नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तमिळनाडू विधानसभेत ठराव मंजूर झाला. त्यामुळे बारावी गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले जाणार आहेत, तर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जागाही राखीव केल्या गेल्या आहेत. नीटची काठिण्यता दिवसेंदिवस वाढत असून ती कमी होण्यावर विचार व्हावा. मात्र, नीट रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर या निर्णयामुळे ‘नीट’च्या तयारीत विद्यार्थ्यांचे अकरावी-बारावीकडे दुर्लक्ष होते. बारावीच्या शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यांकनाकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधत शासकीय शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही कमी खर्चात वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकण्याला स्थान मिळू शकेल, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.

--

तज्ज्ञ म्हणतात....

पूर्वीची सीईटी परीक्षा पद्धती नीटपेक्षा चांगली होती. नीट परीक्षेची काठिन्यपातळी वाढल्याने विद्यार्थ्यांचा ताणतणाव अधिक वाढला. तो कमी व्हायला पाहिजे. मात्र, कोणतीही पूर्वप्रवेश परीक्षा न घेता वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश देणे सयुक्तिक नाही.

- डॉ. शिराझ बेग, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

----

यापूर्वीही तमिळनाडू राष्ट्रीय प्रवेशप्रक्रियेत सहभागी होत नव्हते. तेथील मुले बाहेर वैद्यकीय शिक्षणाला येत नाहीत. तिथे ते बाहेर राज्यातील मुलांना प्रवेश देत नाही. तमिळनाडूचा निर्णय विद्यार्थिहिताचा वाटत नाही.

- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार

--

विद्यार्थी म्हणतात....

बोर्डाच्या परीक्षेतून गुणवत्तेचे अचूक मोजमाप होतेच असे नाही, तर नीटसारखी परीक्षा वैद्यकीय क्षेत्रात येणाची पात्रता, क्षमता, तार्किक ज्ञानही मोजण्यास उपयुक्त ठरते. तसे न झाल्यास परिणाम बाहेर पडणाऱ्या डाॅक्टरांवर होईल.

-विशाल मुळे, एमबीबीएस विद्यार्थी

-

बारावीच्या परीक्षेत केवळ रट्टा मारणारेही चांगले गुण मिळवू शकतात. मात्र, नीट परीक्षेत आठवी ते बारावीपर्यंतचा पाया पक्का असावा लागतो. सीबीएसई, एनसीआरटीच्या अभ्यासक्रमही अभ्यासावा लागतो. नीटशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश सयुक्तिक नाही.

- शिवानी पावडे, एमबीबीएस, विद्यार्थिनी