शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

‘नीट’शिवाय मेडिकल प्रवेशावर मतमतांतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:02 IST

--- औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट’ (नीट) पूर्वपरीक्षा तमिळनाडू सरकारने रद्द करून ...

---

औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट’ (नीट) पूर्वपरीक्षा तमिळनाडू सरकारने रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यावर बोर्डाच्या परीक्षेतून अचूक मूल्यांकन होण्याबद्दल साशंकता व्यक्त करीत तार्किक ज्ञान, क्षमता कशी मोजणार असे सवाल तज्ज्ञ, विद्यार्थ्यांतून उपस्थित केले जात आहेत; तर ‘नीट’च्या तयारीसाठी क्लासेसचा होणारा खर्च टळेल, अकरावी-बारावीकडे दुर्लक्ष होणार नाही, असाही मतप्रवाह आहे.

नीट परीक्षेआधी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने तमिळनाडूतील नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तमिळनाडू विधानसभेत ठराव मंजूर झाला. त्यामुळे बारावी गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले जाणार आहेत, तर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जागाही राखीव केल्या गेल्या आहेत. नीटची काठिण्यता दिवसेंदिवस वाढत असून ती कमी होण्यावर विचार व्हावा. मात्र, नीट रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर या निर्णयामुळे ‘नीट’च्या तयारीत विद्यार्थ्यांचे अकरावी-बारावीकडे दुर्लक्ष होते. बारावीच्या शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यांकनाकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधत शासकीय शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही कमी खर्चात वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकण्याला स्थान मिळू शकेल, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.

--

तज्ज्ञ म्हणतात....

पूर्वीची सीईटी परीक्षा पद्धती नीटपेक्षा चांगली होती. नीट परीक्षेची काठिन्यपातळी वाढल्याने विद्यार्थ्यांचा ताणतणाव अधिक वाढला. तो कमी व्हायला पाहिजे. मात्र, कोणतीही पूर्वप्रवेश परीक्षा न घेता वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश देणे सयुक्तिक नाही.

- डॉ. शिराझ बेग, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

----

यापूर्वीही तमिळनाडू राष्ट्रीय प्रवेशप्रक्रियेत सहभागी होत नव्हते. तेथील मुले बाहेर वैद्यकीय शिक्षणाला येत नाहीत. तिथे ते बाहेर राज्यातील मुलांना प्रवेश देत नाही. तमिळनाडूचा निर्णय विद्यार्थिहिताचा वाटत नाही.

- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार

--

विद्यार्थी म्हणतात....

बोर्डाच्या परीक्षेतून गुणवत्तेचे अचूक मोजमाप होतेच असे नाही, तर नीटसारखी परीक्षा वैद्यकीय क्षेत्रात येणाची पात्रता, क्षमता, तार्किक ज्ञानही मोजण्यास उपयुक्त ठरते. तसे न झाल्यास परिणाम बाहेर पडणाऱ्या डाॅक्टरांवर होईल.

-विशाल मुळे, एमबीबीएस विद्यार्थी

-

बारावीच्या परीक्षेत केवळ रट्टा मारणारेही चांगले गुण मिळवू शकतात. मात्र, नीट परीक्षेत आठवी ते बारावीपर्यंतचा पाया पक्का असावा लागतो. सीबीएसई, एनसीआरटीच्या अभ्यासक्रमही अभ्यासावा लागतो. नीटशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश सयुक्तिक नाही.

- शिवानी पावडे, एमबीबीएस, विद्यार्थिनी