शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘आरएसएस’सोबत वैचारिक मतभेद कायम : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:45 IST

‘आरएसएस’सोबत आमचे वैचारिक मतभेद कायम असले, तरी भाजपसोबत आमची राजकीय मैत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला साधी आठवणही नव्हती; परंतु जनता दल आणि भाजपच्या राजवटीत बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आरएसएस’सोबत आमचे वैचारिक मतभेद कायम असले, तरी भाजपसोबत आमची राजकीय मैत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला साधी आठवणही नव्हती; परंतु जनता दल आणि भाजपच्या राजवटीत बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.एका संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त आठवले मंगळवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचे तैलचित्र उभारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. लंडन येथे बाबासाहेबांचे स्मारक केले; परंतु काँग्रेस राज्यकर्त्यांना बाबासाहेबांचा विसर पडला होता. दलित अत्याचाराच्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेधले असता आठवले म्हणाले, दलितांवर अत्याचार होत आहेत, ही गंभीर बाब आहे. याला ज्या प्रमाणे सरकार जबाबदार आहे, तेवढेच सर्व समाजही जबाबदार आहेत. अत्याचाराचे गुन्हे नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी तैनात केले पाहिजेत.सन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील. त्यामुळे राहुल गांधींचा प्रश्नच येत नाही. सत्ता पाहिजे असेल, तर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी आपसातील वाद मिटवून आगामी निवडणुकांमध्ये युती केली पाहिजे. हे दोघे सोबत येत नसतील, तर रिपाइं भाजपसोबत राहील. कर्नाटक निवडणुकीत रिपाइं १९४ मतदारसंघांत भाजपसोबत आहे.दक्षिण मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. अगोदर आपण याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलो होतो. सेना-भाजप युती झाली, तर आपण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहोत. युती नाही झाली, तर विदर्भातील रामटेक मतदारसंघातून प्रयत्न करू, असेही रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, किशोर थोरात, विजय मगरे, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल, सिद्धार्थ दाभाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आंबेडकरवादाला नक्षलवाद मान्य नाहीरामदास आठवले म्हणाले, आंबेडकरवाद हा नक्षलवाद मान्य करीत नाही. सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्ता नक्षलवादी असूच शकत नाही; मात्र बाबासाहेबांचे नाव घेत नक्षलवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही कमी नाही. पोलिसांनी नक्षलवादी चळवळीच्या नावाखाली आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नयेत.ऐक्याच्या बाजूने सातत्याने मी एकटाच बोलत आहे. ऐक्य झाले तर ते वैचारिक मुद्यांवर व्हावे, भावनिक ऐक्य दीर्घकाळ टिकणारे नाही.एकजातीय ऐक्य राजकीय फायद्याचे नाही. ऐक्यामध्ये सर्वच समाजाचे प्रतिनिधित्व असावे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ