शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

‘आरएसएस’सोबत वैचारिक मतभेद कायम : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:45 IST

‘आरएसएस’सोबत आमचे वैचारिक मतभेद कायम असले, तरी भाजपसोबत आमची राजकीय मैत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला साधी आठवणही नव्हती; परंतु जनता दल आणि भाजपच्या राजवटीत बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आरएसएस’सोबत आमचे वैचारिक मतभेद कायम असले, तरी भाजपसोबत आमची राजकीय मैत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला साधी आठवणही नव्हती; परंतु जनता दल आणि भाजपच्या राजवटीत बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.एका संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त आठवले मंगळवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचे तैलचित्र उभारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. लंडन येथे बाबासाहेबांचे स्मारक केले; परंतु काँग्रेस राज्यकर्त्यांना बाबासाहेबांचा विसर पडला होता. दलित अत्याचाराच्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेधले असता आठवले म्हणाले, दलितांवर अत्याचार होत आहेत, ही गंभीर बाब आहे. याला ज्या प्रमाणे सरकार जबाबदार आहे, तेवढेच सर्व समाजही जबाबदार आहेत. अत्याचाराचे गुन्हे नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी तैनात केले पाहिजेत.सन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील. त्यामुळे राहुल गांधींचा प्रश्नच येत नाही. सत्ता पाहिजे असेल, तर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी आपसातील वाद मिटवून आगामी निवडणुकांमध्ये युती केली पाहिजे. हे दोघे सोबत येत नसतील, तर रिपाइं भाजपसोबत राहील. कर्नाटक निवडणुकीत रिपाइं १९४ मतदारसंघांत भाजपसोबत आहे.दक्षिण मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. अगोदर आपण याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलो होतो. सेना-भाजप युती झाली, तर आपण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहोत. युती नाही झाली, तर विदर्भातील रामटेक मतदारसंघातून प्रयत्न करू, असेही रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, किशोर थोरात, विजय मगरे, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल, सिद्धार्थ दाभाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आंबेडकरवादाला नक्षलवाद मान्य नाहीरामदास आठवले म्हणाले, आंबेडकरवाद हा नक्षलवाद मान्य करीत नाही. सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्ता नक्षलवादी असूच शकत नाही; मात्र बाबासाहेबांचे नाव घेत नक्षलवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही कमी नाही. पोलिसांनी नक्षलवादी चळवळीच्या नावाखाली आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नयेत.ऐक्याच्या बाजूने सातत्याने मी एकटाच बोलत आहे. ऐक्य झाले तर ते वैचारिक मुद्यांवर व्हावे, भावनिक ऐक्य दीर्घकाळ टिकणारे नाही.एकजातीय ऐक्य राजकीय फायद्याचे नाही. ऐक्यामध्ये सर्वच समाजाचे प्रतिनिधित्व असावे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ