शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

‘आरएसएस’सोबत वैचारिक मतभेद कायम : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:45 IST

‘आरएसएस’सोबत आमचे वैचारिक मतभेद कायम असले, तरी भाजपसोबत आमची राजकीय मैत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला साधी आठवणही नव्हती; परंतु जनता दल आणि भाजपच्या राजवटीत बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आरएसएस’सोबत आमचे वैचारिक मतभेद कायम असले, तरी भाजपसोबत आमची राजकीय मैत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला साधी आठवणही नव्हती; परंतु जनता दल आणि भाजपच्या राजवटीत बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.एका संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त आठवले मंगळवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचे तैलचित्र उभारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. लंडन येथे बाबासाहेबांचे स्मारक केले; परंतु काँग्रेस राज्यकर्त्यांना बाबासाहेबांचा विसर पडला होता. दलित अत्याचाराच्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेधले असता आठवले म्हणाले, दलितांवर अत्याचार होत आहेत, ही गंभीर बाब आहे. याला ज्या प्रमाणे सरकार जबाबदार आहे, तेवढेच सर्व समाजही जबाबदार आहेत. अत्याचाराचे गुन्हे नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी तैनात केले पाहिजेत.सन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील. त्यामुळे राहुल गांधींचा प्रश्नच येत नाही. सत्ता पाहिजे असेल, तर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी आपसातील वाद मिटवून आगामी निवडणुकांमध्ये युती केली पाहिजे. हे दोघे सोबत येत नसतील, तर रिपाइं भाजपसोबत राहील. कर्नाटक निवडणुकीत रिपाइं १९४ मतदारसंघांत भाजपसोबत आहे.दक्षिण मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. अगोदर आपण याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलो होतो. सेना-भाजप युती झाली, तर आपण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहोत. युती नाही झाली, तर विदर्भातील रामटेक मतदारसंघातून प्रयत्न करू, असेही रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, किशोर थोरात, विजय मगरे, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल, सिद्धार्थ दाभाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आंबेडकरवादाला नक्षलवाद मान्य नाहीरामदास आठवले म्हणाले, आंबेडकरवाद हा नक्षलवाद मान्य करीत नाही. सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्ता नक्षलवादी असूच शकत नाही; मात्र बाबासाहेबांचे नाव घेत नक्षलवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही कमी नाही. पोलिसांनी नक्षलवादी चळवळीच्या नावाखाली आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नयेत.ऐक्याच्या बाजूने सातत्याने मी एकटाच बोलत आहे. ऐक्य झाले तर ते वैचारिक मुद्यांवर व्हावे, भावनिक ऐक्य दीर्घकाळ टिकणारे नाही.एकजातीय ऐक्य राजकीय फायद्याचे नाही. ऐक्यामध्ये सर्वच समाजाचे प्रतिनिधित्व असावे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ