शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:55 IST

औरंगाबाद : थकीत बिलांसाठी मनपातील कंत्राटदारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दोन दिवसात देयके अदा करण्याची कार्यवाही झाली ...

ठळक मुद्देरोजेदार बांधव : कडक उन्हात मनपासमोर आंदोलन

औरंगाबाद : थकीत बिलांसाठी मनपातील कंत्राटदारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दोन दिवसात देयके अदा करण्याची कार्यवाही झाली नाहीत तर पाणीपुरवठा, विद्युत आदी अत्यावश्यक कामेही थांबविण्यात येतील, असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे. उपोषणात अनेक रोजेदार बांधवांचाही समावेश आहे.महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा सर्वाधिक फटका विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना बसला आहे. तिजोरीत सध्या खडखडाट असल्यामुळे ठेकेदारांची जवळपास ३०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. उधारीवर साहित्य आणून कंत्राटदारांनी विकासकामे केली आहेत. थकीत बिले मिळावीत यासाठी एक वर्षापासून कंत्राटदार पाठपुरावा करीत आहेत. तिजोरीत पैसे नसल्यामुळे कंत्राटदारांच्या पदरी केवळ आश्वासने पडत आहेत. कंत्राटदारांनी आयुक्त, महापौरांना घेराव, मनपा मुख्यालयासमोर निदर्शने, उपोषण अशा प्रकारे अनेक वेळा आंदोलने केली. तरीही बिले न मिळाल्याने ठेकेदार आक्रमक झाले आहेत. सोमवारपासून या ठेकेदारांनी पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु पहिल्या दिवशी प्रशासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक हे सोमवारी मनपा मुख्यालयात आले; परंतु त्यांनी ठेकेदारांची भेट घेतली नाही. त्यामुळे ठेकेदार आणखी संतप्त झाले आहेत. आता दोन दिवसांत बिले मिळाली नाही तर विद्युत आणि पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक कामेही बंद करण्यात येतील, असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.विकासकामे ठप्पथकीत बिले मिळत नसल्यामुळे बहुसंख्य कंत्राटदारांनी पालिकेच्या कामांवर याआधीच अघोषित बहिष्कार टाकला आहे. विकासकामांच्या वारंवार निविदा मागवूनही ठेकेदार पुढे येण्यास तयार नाहीत. त्यामुळे किती तरी विकासकामे रखडली आहेत. आतापर्यंत विद्युत आणि पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक कामे सुरू आहेत. मात्र, आता तीही बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.आयुक्तांचे खाजगीत फोनवॉर्डांमधील विकासकामे ठप्प झाल्याने नगरसेवक थेट आयुक्तांकडे कामांसाठी तगादा लावत आहेत. आयुक्त ज्या कंत्राटदारांनी कामे घेतली आहेत, त्यांना काम सुरू करा म्हणून खाजगीत फोन करीत आहेत. कंत्राटदारांना २ लाख रुपये देतो, काम करा असे आश्वासन देत आहेत. यानंतरही कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत.-----------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका