शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

जयभवानीनगरात दीडशे घरांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:09 AM

जयभवानीनगर येथील तब्बल १५० घरांचा शनिवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले, तर बाहेरील व्यक्ती घरात जाऊ शकत नाही, अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगर येथील तब्बल १५० घरांचा शनिवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले, तर बाहेरील व्यक्ती घरात जाऊ शकत नाही, अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. नागरिकांना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. एवढे होऊनही शनिवारी फक्त सहा कर्मचारी नाल्यात काम करताना दिसून आले.११ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर जयभवानीनगर परिसर पाण्यात बुडाला होता. या घटनेनंतर वसाहतीमधील नाल्यात असलेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने चिरीमिरी न देणाऱ्यांच्या इमारतींवर हतोडा चालविला. अतिक्रमणे पाडल्यानंतर काही महिने मलबा तसाच पडून होता. दीड महिन्यापूर्वी महापालिकेने नाला १५ फूट रुंद आणि आठ ते दहा फूट खोल केला. या नाल्यात भूमिगत गटार योजनेचे पाईप, मेनहोल तयार करण्यात आले आहेत.पहिलाच पाऊसशनिवारी सायंकाळी झालेला वादळी वारा आणि त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसानंतर जयभवानीनगर पुन्हा एकदा मागील वर्षीप्रमाणेच जलमय झाला. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. घरगुती सामानासह धान्यही खराब झाले. ठिकठिकाणी असलेले ड्रेनेजचे चेम्बर ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. प्रत्येक रस्त्यावर किमान गुडघ्यापर्यंत येईल एवढे पाणी साचले. महापालिकेने ज्या दीडशे घरांसमोर नाला रुंद आणि खोल करून ठेवला त्या नागरिकांचे सर्वात जास्त हाल सुरू झाले. त्यांना घरातून बाहेर येता येईना.त्रस्त नागरिकांचा जनआक्रोशजयभवानीनगर येथे नाल्याच्या दोन्ही बाजूला राहणा-या १५० पेक्षा अधिक घरांमधील एक हजारांपेक्षा अधिक नागरिक मागील २४ तासांपासून ताटकळत बसले आहेत. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड, संताप आणि आक्रोश पाहायला मिळत आहे. योग्य नियोजनच नव्हते तर नाला कशासाठी रुंद केला, असा संतप्त सवालही नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी महापौरांसमोरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.जयभवानीनगरातील शंभू सहानी यांच्या घरात पॅरालिसिस झालेली व्यक्ती आहे. त्यांना उपचारासाठी घरातून बाहेर आणणे अवघड आहे. सुभाष टाळकर, रेवजीनाथ पवार, भगवान साळुंके यांच्या घरात ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही. लता पवार या महिलेच्या घरातील धान्य पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले. शारदा पातळक यांनी पंधरा दिवसांपासून पाण्याचे टँकर आले नसल्याचे नमूद केले.

टॅग्स :floodपूरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका