शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

भरमसाठ शुल्क वसूल करून शिकविण्यात कुचराई; शिकवणी चालकाला ग्राहक मंचाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 11:37 IST

शुल्कापोटी भरलेले ८० हजार रुपये ३० दिवसांत तिला परत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने गुरुकुल या खाजगी शिकवणी वर्गचालकास दिला आहे.

ठळक मुद्देवर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच काही विषयांचे प्रमुख शिक्षक वर्ग सोडून निघून गेले१२ वीच्या परीक्षेपर्यंत केवळ ३२ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला होता.

औरंगाबाद : गायत्री काकडे या विद्यार्थिनीने शुल्कापोटी भरलेले ८० हजार रुपये ३० दिवसांत तिला परत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने गुरुकुल या खाजगी शिकवणी वर्गचालकास दिला आहे. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी ३ हजार रुपये देण्याचेही आदेशात म्हटले आहे.‘भरमसाठ शुल्क वसूल करून विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या सेवेत कुचराई केल्याचा तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे’ निरीक्षण नोंदवून, मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी आणि सदस्या संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला.

गायत्री अनिल काकडे ही विद्यार्थिनी दहावीमध्ये ९३ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. ‘नीट’ परीक्षेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तिने अकरावी-बारावीसाठी जालना रस्त्यावरील गुरुकुल शिकवणी वर्गामध्ये प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन त्यांच्याकडून भरपूर अभ्यास करून घेण्यात येईल, असे आश्वासन प्रवेशाच्या वेळी शिकवणी वर्गचालकांनी दिले होते. तसेच अकरावी, बारावीची टिपणे आणि पुस्तके देण्याचेही सांगण्यात आले होते. दीड लाख रुपये शुल्क सांगण्यात आले, मात्र त्यात सवलत देऊन ८० हजार रुपये घेऊन प्रवेश दिला.

वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच काही विषयांचे प्रमुख शिक्षक वर्ग सोडून निघून गेले, त्यामुळे अभ्यासक्रम मागे पडला. नियोजित टिपणे देण्यात आली नाहीत. १२ वीच्या परीक्षेपर्यंत केवळ ३२ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. वर्गचालकांकडे तक्रार केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले गेले नाही. त्यामुळे अनिल काकडे यांनी मुलीला दुस-या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी शुल्क परत मागितले असता दिले नाही म्हणून काकडे यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. सदर विद्यार्थिनीला अभ्यासक्रम झेपला नाही म्हणून ती वर्ग सोडून गेली, असा युक्तिवाद वर्गचालकांतर्फे करण्यात आला. सुनावणीअंती मंचाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

टॅग्स :Courtन्यायालयconsumerग्राहकStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र