शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

बजाजनगरमध्ये पार्किंगच्या जागेवर बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 7:30 PM

वाळूज महानगर : बजाजनगरातील महावीर कॉम्पलेक्समधील काही गाळे धारकांनी पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. सदर बांधकाम ...

वाळूज महानगर : बजाजनगरातील महावीर कॉम्पलेक्समधील काही गाळे धारकांनी पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. सदर बांधकाम काढण्याची मागणी इतर गाळेधारकांकडून केली जात आहे. पण एमआयडीसी प्रशासन अतिक्रणधारकांना केवळ नोटिसा देवून थेट कारवाई करण्यास कुचराई करीत आहे. गाळेधारकांसह नागरिकांची वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

येथील महाराणा प्रताप चौकालगत एमआयडीसीच्या भूखंड क्रमांक पी- ११८ वर दोन मजली महावीर कॉम्पलेक्स बांधण्यात आले असून, एकूण ३३ गाळेधारक आहेत. कॉम्पलेक्सच्या चारही बाजूने पार्किंगसाठी तसेच काही दुर्घटना घडल्यास मोठ्या वाहनाला ये-जा करता यावी यासाठी जवळपास १० ते १२ फूट मोकळी जागा सोडण्यात आली आहे. काही गाळेधारकांनी मोकळ्या जागेवरच ५ ते ६ फूट अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. तसेच सेप्टी टँकवरही बांधकाम केल्याने हा रस्ताच बंद झाला आहे.

पार्किंगची जागा गायब झाल्याने वाहने रस्त्यावर उभी रहात आहेत. त्यामुळे रहादारीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीचा खोळंबा आहे. सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. पार्क केलेली वाहने वाहतूक पोलीस उचलून नेत असल्याने ग्राहकांची संख्या रोडावली आहे. दुसरीकडे व्यवसायावर परिणाम होत असल्याने काही गाळेधारक व्यवसायिकांनी सदरील अतिक्रमण काढण्याची एमआयडीसीकडे अनेकवेळा मागणी केली आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने एमआयडीसीने काही दिवसांपूर्वी राजकीय दबावापोटी ठोस कारवाई न करता केवळ थातूरमातूर कारवाई करुन अतिक्रमण हटविल्याचा देखावा केला. अतिक्रमण धारकांना नोटिसा देवून अवैध बांधकाम काढून घेण्यास सांगितले. परंतू अतिक्रमण धारकांनी नोटिशीला केराची टोपली दाखविली. एमआयडीसीने पुन्हा नोटिसा बजावल्या तरीही बांधकाम काढले गेले नाही.

तक्रार करुनही एमआयडीसी अतिक्रमण न काढता केवळ नोटिसा वर नोटिसा देवून अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप येथील अन्य गाळेधारकांडून केला जात आहे. या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

एमआयडीसीच्या भूमिकेविषयी शंकापार्किंगसाठी जागा नाही. रस्त्यावर उभी असलली ग्राहकांची वाहने पोलीस घेवून जातात. याचा धंद्यावर परिणाम होत आहे. एमआयडीसी कारवाई करण्याऐवजी नियम डावलून अतिक्रमणधारकांना मुदतवाढ देत असल्याने एमआयडीसीच्या भूमिकेविषयी शंका निर्माण होत आहे, असे तक्रारदार महावीर धुमाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद