शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी व अंतर्गत शक्तीचे देश खिळखिळा करण्याचे षडयंत्र - किरेन रिजिजू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 20:08 IST

देशाला मजबूत करण्यासाठी भाजप आवश्यक 

ठळक मुद्दे धोक्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाहीपुढच्यावेळी भाजप स्वबळावर सत्तेत येईल

औरंगाबाद : देश सुरक्षित व मजबूत भाजपच ठेवू शकतो. त्यामुळे देशाला भाजपचीच आवश्यकता आहे, असा दावा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) किरेन रिजिजू यांनी गुरुवारी येथे केला. तसेच काही विदेशी व अंतर्गत शक्ती देश खिळखिळा करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ते एक दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयास धावती भेट दिली. उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी औरंगाबादमध्ये क्रीडा खात्यातर्फे विविध प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे सांगितले. औरंगाबादला आल्यानंतर मला विशेष ऊर्जा मिळते. यापूर्वी मी २०१८ साली औरंगाबादला आलो होतो, याची आठवण करून देत किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये आपण कमळ फुलविण्यासाठी कसा संघर्ष केला, हे सांगितले. पहाडी भागात कमळ फुलत नसते, असे काँग्रेसवाले म्हणत असत. त्यांचे हे म्हणणे खोटे ठरविले. (टाळ्या) आज अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार आहे. ६० पैकी ५१ आमदार भाजपचे निवडून आले. मी स्वत: खासदार म्हणून निवडून आलो असे ते म्हणाले. 

महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येऊ शिवसेनेने धोका दिला, नसता महाराष्ट्रातही भाजपचेच सरकार असते, अशी खंत रिजिजू यांनी व्यक्त केली. मात्र, पुढच्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे स्वबळावर सरकार येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबाद