शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

शेतकऱ्यांना दिलासा ! रबी हंगामासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ७०० क्युसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 6:54 PM

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत सोमवारी सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय

ठळक मुद्देसिंचन क्षेत्रासाठी १७०  दलघमी पाणी सोडण्यास मान्यतापहिले आवर्तन २० ते २२ दिवस सुरू राहणार

पैठण : जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. ७०० क्युसेक क्षमतेने डाव्या कालव्यातून विसर्ग करण्यात येत आहे. 

मराडवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत सोमवारी सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जायकवाडीच्या डाव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील १२०००० हे. सिंचन क्षेत्रासाठी १७०  दलघमी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली असून पहिले आवर्तन २० ते २२ दिवस सुरू राहणार आहे. डाव्या कालव्या प्रमाणे जायकवाडीच्या उजव्या कालव्यावरील लाभक्षेत्रासाठी मागणी आल्यास पाणी सोडण्यास मान्यता मिळाली असल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. सध्या रब्बी हंगामातील गहू , बाजरी , तूर , हरभरा या पिकांसाठी पाणी लाभदायक ठरणार असल्याने जायकवाडी लाभक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे. 

धरणातील पाणी ३१ जुलै २०२१ पर्यंत पुरेल असे नियोजन....या वर्षी  खरीप हंगामा अखेर दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजीपर्यंत धरणात १००% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक  पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२०  अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले असल्याचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

रब्बी हंगामात तीन तर उन्हाळ्यात पाच आवर्तने......धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यातून रब्बी हंगामात तिन तर  उन्हाळी हंगामात पाच आवर्तने देणे प्रस्तावित असून जलाशयासह डावा आणि उजवा कालव्यावर १४६९०० हे.  क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे.  त्याकरिता अनुक्रमे   ६१८ दलघमी व ५३० दलघमी असे एकूण ११४८ दलघमी पाणीवापर  होईल असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीagricultureशेती