शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या कनेक्टिव्हिटीत भर; बंगळुरू विमानसेवेला मिळाला उत्तम प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:15 IST

बंगळुरूसह दिल्लीसाठी नव्या विमानाचे ‘उड्डाण’

ठळक मुद्दे पहिल्या विमानात ७१ प्रवासी  

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्ली, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केल्यानंतर स्पाईस जेटने सोमवारी (दि.२५) बंगळुरू-औरंगाबाद-बंगळुरू विमान सुरू करून शहराच्या कनेक्टिव्हिटीत भर टाकली. 

बंगळुरूहून ७१ प्रवाशांना घेऊन स्पाईस जेटचे विमान औरंगाबादेत दाखल झाले. यावेळी विमानतळ प्राधिकरणातर्फे वैमानिकांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, औरंगाबाद क्लॉथ मर्चंटचे अध्यक्ष विनोद लोया, डॉ. विनोद तोतला, डॉ. शिल्पा तोतला, आनंद अग्रवाल, स्पाईस जेटचे स्टेशन मॅनेजर आर. एच. मुजावर, मनोज गुप्ता आदींसह विमानतळावरील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. दुपारी १२.२० वाजता या विमानाने बंगळुरूसाठी उड्डाण घेतले. औरंगाबादहून ४० प्रवासी रवाना झाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनी दिली.

हैदराबादपाठोपाठ आता बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराची दक्षिण भारताबरोबरची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली आहे. दक्षिण भारतातून धार्मिक आणि पर्यटनस्थळांना भेट देणाºयांची मोठी संख्या आहे. या विमानसेवेच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्पाईस जेटने ९० आसन क्षमतेच्या बम्बार्डियर विमानाद्वारे ही सेवा सुरू केली आहे. उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, बंगळुरू साठी सुरू केलेल्या विमानाला प्रवाशांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. या विमानसेवेची अनेक दिवसांपासून मागणी होत होती. त्यासाठी पाठपुरावा केला आणि अखेर ही सेवा सुरू झाली. दिल्लीसाठीही आणखी एक विमान सुरू केले. मुंबईसाठी विमान सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. शिर्डी विमानतळावरील विमाने सध्या औरंगाबादहून उड्डाण घेत आहेत. या सगळ्यात पहिल्याच दिवशी ४० प्रवासी बंगळुरूला रवाना झाले.

दीडशे प्रवासी दिल्लीला रवाना८ आॅक्टोबर रोजी स्पाईस जेटच्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेला सुरुवात केली. अवघ्या काही दिवसांतच या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मार्गावर मोठे विमान सुरू केले. प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या कंपनीने बंगळुरूबरोबर सोमवारी दिल्लीसाठी आणखी एक विमान सुरू केले. या विमानाने पहिल्याच दिवशी जवळपास शंभर प्रवासी औरंगाबादेत आले आणि दीडशे प्रवासी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती विमानतळाच्या अधिका-यांनी दिली.

मुंबई विमानाकडे लक्षऔरंगाबादहून मुंबईसाठी नवीन विमान सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केला जात आहे. ‘इंडिगो’च्या माध्यमातून ही विमानसेवा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनspicejetस्पाइस जेटBengaluruबेंगळूरAurangabadऔरंगाबाद