शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, महाविकास आघाडी, की ‘एकला चलो रे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 15:55 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार तीन नंबरवर राहिला. एमआयएमने शिवसेनेचा पराभव केला.

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागविला आहे. प्रत्यक्षात काय घडते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रत्येक पक्ष स्वबळाचीच तयारी करीत असतो; परंतु निवडणुका जिंकण्यासाठी तडजोडी कराव्याच लागतात, हा नेहमीचा अनुभव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळ आजमावून नंतरही आघाडी करून सत्ता संपादण्याचे प्रयत्न होत असतात.

जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाहीजिल्ह्यातील नऊ आमदारांपैकी सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही. पैठण, कन्नड, वैजापूर, सिल्लोड-सोयगाव आणि औरंगाबाद मध्य व पश्चिममधून शिवसेनेचे आमदार विजयी झाले. गंगापूर- खुलताबाद, फुलंब्री व औरंगाबाद पूर्वमधून भाजपला कौल मिळाला आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा विधान परिषदेचा एकही सदस्य नाही. अत्यंत वाईट परिस्थिती आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेसचीच सत्ताऔरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मीना शेळके यांच्या रूपाने काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्या महाविकास आघाडीच्या बळावर. एकूण ६२ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत शिवसेना २४, काँग्रेस १०, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि भाजपचे २३ व अपक्ष ३ सदस्य असे बलाबल आहे. तसे तर काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आले होते; परंतु अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर सहा सदस्य गेले; परंतु महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे काँग्रेसच्या वाट्याला अध्यक्षपद आले आहे.

पंचायत समित्यांत दोन नंबरवरजिल्ह्यातील एकही पंचायत समिती सध्या काँग्रेसच्या ताब्यात नाही. जी होती, त्या औरंगाबाद पंचायत समितीत मध्यंतरी राजकारण घडले आणि आता ही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे. भाजपकडे फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड पंचायत समित्या आहेत. सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि वैजापूर पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे.

लोकसभेला तीन नंबरवर२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार तीन नंबरवर राहिला. एमआयएमने शिवसेनेचा पराभव केला. मागील चार वेळा शिवसेनेने हा गड राखला होता. काँग्रेसच्या वाट्याला सतत अपयशच येत गेले आहे.

लवकरच निवडणुकाजिल्ह्यात आगामी काळात जिल्हा परिषद, सोबतच पंचायत समित्या, नगर परिषदांच्या आणि औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. फक्त अधिकृत तारखांची प्रतीक्षा सुरू आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणतात...जो आदेश येईल, तो पाळला जाईल. स्वबळाचा नारा दिला गेला आहेच. त्यादृष्टीनेही चाचपणी सुरू आहे.- डॉ. कल्याण काळे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका