शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, महाविकास आघाडी, की ‘एकला चलो रे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 15:55 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार तीन नंबरवर राहिला. एमआयएमने शिवसेनेचा पराभव केला.

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागविला आहे. प्रत्यक्षात काय घडते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रत्येक पक्ष स्वबळाचीच तयारी करीत असतो; परंतु निवडणुका जिंकण्यासाठी तडजोडी कराव्याच लागतात, हा नेहमीचा अनुभव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळ आजमावून नंतरही आघाडी करून सत्ता संपादण्याचे प्रयत्न होत असतात.

जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाहीजिल्ह्यातील नऊ आमदारांपैकी सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही. पैठण, कन्नड, वैजापूर, सिल्लोड-सोयगाव आणि औरंगाबाद मध्य व पश्चिममधून शिवसेनेचे आमदार विजयी झाले. गंगापूर- खुलताबाद, फुलंब्री व औरंगाबाद पूर्वमधून भाजपला कौल मिळाला आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा विधान परिषदेचा एकही सदस्य नाही. अत्यंत वाईट परिस्थिती आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेसचीच सत्ताऔरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मीना शेळके यांच्या रूपाने काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्या महाविकास आघाडीच्या बळावर. एकूण ६२ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत शिवसेना २४, काँग्रेस १०, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि भाजपचे २३ व अपक्ष ३ सदस्य असे बलाबल आहे. तसे तर काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आले होते; परंतु अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर सहा सदस्य गेले; परंतु महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे काँग्रेसच्या वाट्याला अध्यक्षपद आले आहे.

पंचायत समित्यांत दोन नंबरवरजिल्ह्यातील एकही पंचायत समिती सध्या काँग्रेसच्या ताब्यात नाही. जी होती, त्या औरंगाबाद पंचायत समितीत मध्यंतरी राजकारण घडले आणि आता ही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे. भाजपकडे फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड पंचायत समित्या आहेत. सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि वैजापूर पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे.

लोकसभेला तीन नंबरवर२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार तीन नंबरवर राहिला. एमआयएमने शिवसेनेचा पराभव केला. मागील चार वेळा शिवसेनेने हा गड राखला होता. काँग्रेसच्या वाट्याला सतत अपयशच येत गेले आहे.

लवकरच निवडणुकाजिल्ह्यात आगामी काळात जिल्हा परिषद, सोबतच पंचायत समित्या, नगर परिषदांच्या आणि औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. फक्त अधिकृत तारखांची प्रतीक्षा सुरू आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणतात...जो आदेश येईल, तो पाळला जाईल. स्वबळाचा नारा दिला गेला आहेच. त्यादृष्टीनेही चाचपणी सुरू आहे.- डॉ. कल्याण काळे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका