शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची वृत्ती चुकीची! दानवेंकडून बिहार पराभवाचे विश्लेषण; महाविकास आघाडीत खदखद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:48 IST

'काँग्रेसची जास्त मागणी, कमी विजय'; अंबादास दानवेंनी बिहारच्या निकालावरून फटकारले, बिहार निकालानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत खदखद उघड

छत्रपती संभाजीनगर: बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनच्या झालेल्या पराभवानंतर याचे खापर फोडण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी बिहार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या पराभवास थेट काँग्रेस पक्षाच्या जागावाटपाच्या मानसिकतेवर बोट ठेवले. दानवे यांनी खदखद जाहीरपणे व्यक्त केल्याने याचे परिणाम राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये एनडीएला २०० जागांवर स्पष्ट बहुमत मिळाल्याचे निश्चित झाल्यानंतर दानवे यांनी वृत्तवाहिनीवर  बोलताना काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. दानवे यांनी बिहारमधील पराभवाचे खापर काँग्रेस आणि आरजेडीच्या चुकांवर फोडले. "पराभव झालेला मान्य आहे, भाजपने सत्तेचा गैरवापर केला हे खरं आहे. पण, त्याचबरोबर तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला खूप उशीर झाला," अशी कबुली त्यांनी दिली.

काँग्रेसच्या वृत्तीमुळेच इतर मित्रपक्षांचे नुकसानकाँग्रेसच्या मानसिकतेवर टीका करताना दानवे म्हणाले, "काँग्रेसचं असंच आहे; जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा, मोठा वाटा हवा असतो, पण प्रत्यक्षात विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं." काँग्रेसच्या या वृत्तीमुळेच इतर मित्रपक्षांचे नुकसान होते, असे मत त्यांनी परखडपणे मांडले. बिहारमधील जागावाटपाचा घोळ आणि महाराष्ट्रातील मागील निवडणुकीतील धोरणांवर त्यांनी थेट तुलना केली. दानवे म्हणाले, "महाराष्ट्रात निवडणुकीवेळी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केले असते आणि जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते. जी चूक महाराष्ट्रामध्ये झाली तीच चूक बिहारमध्येही झाली आहे. काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी."

जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत नको!महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी टिकून राहावी, अशी इच्छा व्यक्त करत असतानाच त्यांनी जागावाटपाच्या वेळकाढूपणावर नाराजी व्यक्त केली. "छोट्या गावांमध्येही जर जागावाटपाची चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत चालत असेल तर निवडणुकीतली मजा निघून जाते आणि त्याचा परिणाम निकालावर होतो. काँग्रेसवाले मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना थेट 'पंजावर (काँग्रेसच्या चिन्हावर) लढा' सांगतात, हे योग्य नाही. जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत नसायला पाहिजे'', असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress's attitude wrong! Danve analyzes Bihar defeat; unrest in Maha Vikas Aghadi.

Web Summary : Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve blames Congress's seat-sharing attitude for Bihar defeat, creating unrest in Maharashtra's Maha Vikas Aghadi. He criticized Congress for demanding more seats while winning fewer, impacting allies. Danve urges Congress to change this attitude before local elections.
टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBiharबिहारAmbadas Danweyअंबादास दानवे