शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

काँग्रेसने तत्त्वांचा त्याग करून दिलदारीने शरद पवार यांना नेता निवडावे : संयज राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 13:00 IST

राज्य सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने, पण आमच्याकडे टेकू आणि शरद पवार आहेत

ठळक मुद्देराज्यपाल भगतसिह कोश्यारी यांचीही आपल्या विचाराचे सरकार राज्यात यावे, यासाठी तडफड सुरू आहे.तीनही पक्षातील नेत्यांनी पडेल ती किंमत देऊन महाराष्ट्रातील सरकार टिकवायचे असे ठरवले आहे

औरंगाबाद : देशात एनडीए आणि यूपीए अस्तित्वात राहिलेली नाही. देशभरात भाजपविरोधी आघाडीसाठी काँग्रेसने दिलदारी दाखवून शरद पवार यांना नेता निवडावे, प्रसंगी तत्त्वांचा त्याग करावा, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी रविवारी येथे एका मुलाखतीत व्यक्त केले. राज्य सरकारला डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहेत. मात्र, आमच्याकडे असणारे टेकू आणि शरद पवार ते पडू देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारला डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहे. सरकारचे जे टेकू आहेत, खांब आहेत. त्यांच्यात दशहत निर्माण करण्याचे हातखंडे वापरून प्रयोग सुरू आहेत, परंतु जोपर्यंत आमच्यासारखे, खा.शरद पवारांसारखे, काँग्रेसमधील काही प्रमुख लोक आहेत, त्यांनी ठरविले आहे, पडेल ती किंमत देऊन महाराष्ट्रातील सरकार टिकवायचे आहे, असे ठाम मत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी रविवारी सायंकाळी एका प्रकट मुलाखतीत व्यक्त केले. जय भीम फेस्टिवल, २०२१च्या निमित्ताने जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी खा.राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी आयोजक चेतन कांबळे आदींची उपस्थिती होती.

खा.राऊत यांनी सरकार कालावधी पूर्ण करील काय, या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले, सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षातील लोक विरोधी म्हणून नव्हतेच, महिनाभरात आपण पुन्हा शपथ घेणार, असेच त्यांना वाटत होते. आता तर दीड वर्ष झाले आहे. राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांचीही आपल्या विचाराचे सरकार राज्यात यावे, यासाठी तडफड सुरू आहे. १२ आमदारांची नावे देऊन आठ महिने झाली, परंतु अजून त्यांनी मंजुरी दिली नाही, हे घटनाबाह्य आहे. अशा पांढऱ्या हत्तीप्रमाणे असलेल्या पदांची देशाला गरज नसल्याची टीकाही त्यांनी केली.

राठोड यांच्या राजीनाम्याची गरज नव्हतीसंजय राठोड यांचा वनमंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती. अद्याप तपास संपून निष्कर्ष आलेला नाही. नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये ज्या घटना घडल्या, त्यात किती जणांनी राजीनामे दिले. गुजतरामधील भाजप खा.मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली, किमान मृत्यूची चौकशी मुंबईत होईल, या हेतूने तर त्यांनी आत्महत्या केली नसावी ना, असा प्रश्न आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात तपास करतील, कारण डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये अनेक भाजप नेत्यांची नावे लिहिली आहेत.

दलितांचे नुकसान त्यांच्याच नेत्यांनी केलेदलितांचे नुकसान त्यांच्याच राजकारण्यांनी केले आहे. जे संसदेत आहेत, त्यांनीच (केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता) नुकसान केले, आजच्या राजकारण्यांनी केलेले नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारAurangabadऔरंगाबाद