शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

काँग्रेसने तत्त्वांचा त्याग करून दिलदारीने शरद पवार यांना नेता निवडावे : संयज राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 13:00 IST

राज्य सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने, पण आमच्याकडे टेकू आणि शरद पवार आहेत

ठळक मुद्देराज्यपाल भगतसिह कोश्यारी यांचीही आपल्या विचाराचे सरकार राज्यात यावे, यासाठी तडफड सुरू आहे.तीनही पक्षातील नेत्यांनी पडेल ती किंमत देऊन महाराष्ट्रातील सरकार टिकवायचे असे ठरवले आहे

औरंगाबाद : देशात एनडीए आणि यूपीए अस्तित्वात राहिलेली नाही. देशभरात भाजपविरोधी आघाडीसाठी काँग्रेसने दिलदारी दाखवून शरद पवार यांना नेता निवडावे, प्रसंगी तत्त्वांचा त्याग करावा, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी रविवारी येथे एका मुलाखतीत व्यक्त केले. राज्य सरकारला डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहेत. मात्र, आमच्याकडे असणारे टेकू आणि शरद पवार ते पडू देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारला डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहे. सरकारचे जे टेकू आहेत, खांब आहेत. त्यांच्यात दशहत निर्माण करण्याचे हातखंडे वापरून प्रयोग सुरू आहेत, परंतु जोपर्यंत आमच्यासारखे, खा.शरद पवारांसारखे, काँग्रेसमधील काही प्रमुख लोक आहेत, त्यांनी ठरविले आहे, पडेल ती किंमत देऊन महाराष्ट्रातील सरकार टिकवायचे आहे, असे ठाम मत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी रविवारी सायंकाळी एका प्रकट मुलाखतीत व्यक्त केले. जय भीम फेस्टिवल, २०२१च्या निमित्ताने जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी खा.राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी आयोजक चेतन कांबळे आदींची उपस्थिती होती.

खा.राऊत यांनी सरकार कालावधी पूर्ण करील काय, या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले, सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षातील लोक विरोधी म्हणून नव्हतेच, महिनाभरात आपण पुन्हा शपथ घेणार, असेच त्यांना वाटत होते. आता तर दीड वर्ष झाले आहे. राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांचीही आपल्या विचाराचे सरकार राज्यात यावे, यासाठी तडफड सुरू आहे. १२ आमदारांची नावे देऊन आठ महिने झाली, परंतु अजून त्यांनी मंजुरी दिली नाही, हे घटनाबाह्य आहे. अशा पांढऱ्या हत्तीप्रमाणे असलेल्या पदांची देशाला गरज नसल्याची टीकाही त्यांनी केली.

राठोड यांच्या राजीनाम्याची गरज नव्हतीसंजय राठोड यांचा वनमंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती. अद्याप तपास संपून निष्कर्ष आलेला नाही. नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये ज्या घटना घडल्या, त्यात किती जणांनी राजीनामे दिले. गुजतरामधील भाजप खा.मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली, किमान मृत्यूची चौकशी मुंबईत होईल, या हेतूने तर त्यांनी आत्महत्या केली नसावी ना, असा प्रश्न आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात तपास करतील, कारण डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये अनेक भाजप नेत्यांची नावे लिहिली आहेत.

दलितांचे नुकसान त्यांच्याच नेत्यांनी केलेदलितांचे नुकसान त्यांच्याच राजकारण्यांनी केले आहे. जे संसदेत आहेत, त्यांनीच (केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता) नुकसान केले, आजच्या राजकारण्यांनी केलेले नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारAurangabadऔरंगाबाद