शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस-सेनेत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:44 IST

चालू आर्थिक वर्षात प्राप्त निधीचे सर्व सदस्यांना समन्यायी वाटप केले जावे, या मुद्यावरून जिल्हा परिषदेत सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस-सेनेत जुंपली आहे.

औरंगाबाद : चालू आर्थिक वर्षात प्राप्त निधीचे सर्व सदस्यांना समन्यायी वाटप केले जावे, या मुद्यावरून जिल्हा परिषदेत सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस-सेनेत जुंपली आहे. बांधकाम व सिंचन विभागांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्याचे नियोजन अवघ्या दोनच तालुक्यांसाठी केल्यामुळे काँग्रेसने यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला. 

जिल्हा परिषदेत काँग्रेस व सेनेची आघाडी आहे; मात्र मागील वर्षापासून निधी वाटपामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस व भाजपला डावलण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी (५०५४ लेखाशीर्ष अंतर्गत) २७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. किमान यंदा तरी जिल्हा परिषदेतील सर्वपक्षीय सदस्यांना निधीचे समान वाटप व्हावे, ज्यामुळे सदस्यांना सर्कलमध्ये विकासकामांना न्याय देता येईल, अशी भूमिका काँग्रेसचे जि.प. सदस्य तथा उपाध्यक्ष केशव तायडे यांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांना पत्र दिले. 

तथापि, जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांचे म्हणणे आहे की, निधीच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेतील काँग्रेस, भाजप, शिवसेना व अन्य पक्षांच्या गटनेत्यांकडून त्यांच्या पक्षाच्या सदस्यांच्या यादीची सातत्याने मागणी करण्यात आली. काँग्रेसने अद्यापही त्यांच्या सदस्यांची यादी दिलेली नाही. यापूर्वी उपाध्यक्ष केशव तायडे व काँग्रेसच्या सदस्यांसोबत निधीच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. सर्वपक्षीय सदस्यांना निधी मिळेल, या हिशेबाने काँग्रेसला निधी देण्याचे ठरले; परंतु अलीकडे त्यांनी ठरलेल्या वाट्यामध्ये आणखी वाढ सुचविली आहे. काँग्रेसच्या मागणीनुसार निधी देऊन जमणार नाही. आम्हाला अन्य पक्षांच्या सदस्यांचाही विचार करावा लागेल, असे अध्यक्षा म्हणाल्या. 

निधीची पळवापळवीजिल्हा परिषदेतील काँग्रेस व भाजप सदस्यांचे म्हणणे आहे की, जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीचे अद्याप नियोजन झालेले नसल्यामुळे किमान सर्व सदस्यांना समन्यायी वाटप झाले पाहिजे, अशी मागणी रेटण्यात आली आहे; परंतु जिल्हा परिषदेच्या उपकराच्या निधीचे पैठण व गंगापूर या दोनच तालुक्यांत नियोजन करण्यात आले. प्रशासकीय मान्यताही काढण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे होते. दरम्यान, निधीच्या नियोजनावरून सध्या जिल्हा परिषदेत सर्वच पक्षांच्या सदस्यांमध्ये मोठी खदखद दिसून येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस