शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

काँग्रेस-राष्ट्रवादीची १९१ मते फुटली; एमआयएमची मतेही शिवसेनेच्या पारड्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 12:38 IST

भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत दगाफटका करण्याची रणनीती आखली असती तरीही कुलकर्णींना २९० च्या पुढे जाता आले नसते.

ठळक मुद्देकुलकर्णी यांना १०६ मते ४ मते अवैध ठरविण्यात आली. 

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी ५२४ मते घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव केला. कुलकर्णी यांना १०६ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार शाहनवाज खान यांना ३ मते मिळाली. एकूण ६५७ पैकी ६४७ मतदान झाले होते. मतमोजणीअंती ६३३ मते वैध ठरली. १० मतपत्रिका कोऱ्याच होत्या, तर ४ मते अवैध ठरविण्यात आली. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलेली १९१ मते आणि कुलकर्णी यांना मिळालेली १०६ मते मिळून २९७ मते होतात. सुमारे २५० मते आघाडीची होती. त्यातील फक्त १०६ मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली. उर्वरित मतांमध्ये एमआयएमच्या सुमारे २८ पैकी बहुतांश मते आणि अपक्षांची ९ मते शिवसेनेला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मातोश्रीच्या आदेशाने आखलेल्या रणनीतीमुळे दानवे यांचा विक्रमी विजय झाला; त्या तुलनेत आघाडीच्या नेत्यांनी कुलकर्णी यांच्या विजयासाठी परिश्रम घेतल्याचे दिसले नाही. दरम्यान दानवे यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडून स्वीकारले. यावेळी राज्यमंत्री अतुल सावे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर,  महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. भागवत कराड, जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, आ. संतोष दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.

भाजपची मते बोनस महायुतीकडे शिवसेना-भाजप मिळून २९२ आणि ४० पुरस्कृत अशी ३३२ मते होती. यात भाजपचा आकडा १८० च्या आसपास होता. भाजपची जेवढी मते होती, तेवढीच मते राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी व एमआयएम, अपक्षांची फोडण्याचे शिवसेनेचे नियोजन यशस्वी ठरले. भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत दगाफटका करण्याची रणनीती आखली असती तरीही कुलकर्णींना २९० च्या पुढे जाता आले नसते. दानवेंना ३४४ मते पहिल्या पसंतीची मिळतील हे निश्चित होते. त्यामुळे भाजपची शिवसेनेला मिळालेली मते बोनसच असल्याचे दिसते. 

तीन दशकांनंतर मराठा नेतृत्व१९९० नंतर पहिल्यांदाच शिवसेनेने शहरात मराठा उमेदवाराला विजयी करण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न केले. दानवे यांच्या रूपाने समाजाला नेतृत्व मिळाले. मराठा समाजाच्या उमेदवाराचे गटबाजीतून नुकसान होत असल्याचे आरोप वारंवार आजवर होत आले आहेत. त्या आरोपांवर दानवे यांचा विजय हा उतारा असल्याचे मानले जात आहे.

एक तासातच लागला निकालचिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन या कंपनीच्या सभागृहात मतमोजणीला सकाळी ८ वा. प्रारंभ झाला. पाच टेबलांवर प्रत्येकी १२५ मतांची मोजणी झाली. एका तासातच निकालाचे चित्र स्पष्ट झाले. ५५ कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविला. 

दुसऱ्या पसंतीची कमी मतेएकूण ६३३ वैध मतांच्या ५० टक्के अधिक १ म्हणजेच ३१७ मतांचा कोटा विजयासाठी होता. पाच टेबलांवर प्रत्येकी १२५ मतांसाठी पहिल्याच फेरीत मतमोजणी झाल्यानंतर त्यात दानवे यांना ५२४ मते मिळाली. विशेष म्हणजे युतीच्या मतदारांनी दुसऱ्या पसंतीसाठी मतदानच केले नाही. आघाडी व एमआयएममधील जी मते शिवसेनेने फोडली होती, त्यांनीच दुसऱ्या पसंतीचे मतदान केले.  

प्रामाणिकपणाचा विजयसंघटना, पक्षाशी प्रामाणिक राहिलो, त्याचे फळ मिळाले. संघटनेमुळेच विजयी झाल्याचे आ. अंबादास दानवे यांनी सांगितले, तर पराभूत उमेदवार भवानीदास कुलकर्णी म्हणाले, हा प्रामाणिकपणाचा पराभव आहे. अर्ध्या तासात निकालाची दिशा लक्षात येताच कुलकर्णी यांनी मतमोजणी केंद्र सोडले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाJalanaजालनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा