शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

चित्रपटातून प्रेरणा घेऊन कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 17:55 IST

आपला कचरा, आपली जबाबदारी!

ठळक मुद्देआतापर्यंत १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरे ‘वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल’मधील चित्रपटांमधून प्रेरणा

- अबोली कुलकर्णी

औरंगाबाद : घरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे? हा प्रश्न गृहिणींना रोजच पडतो. मग हा कचरा एकतर रस्त्यावर किंवा उकिरड्यावर नेऊन टाकला जातो, नाहीतर ओला-सुका, असे त्याचे वर्गीकरण करून कचरापेट्यांमध्ये त्या टाकतात. मात्र, या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करू शकतो, हा विचारच डोक्यात येत नाही. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून कॅनॉट परिसरातील एक जागरूक नागरिक स्वाती स्मार्त या घरच्या घरी कंपोस्ट खतनिर्मिती करतात. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ या एकाच ध्यासाने त्या कार्यरत आहेत. 

 गत ५ वर्षांपूर्वी स्वाती स्मार्त यांनी ‘वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दाखविण्यात आलेल्या चित्रपटांमधून कचऱ्याचे योग्य संकलन करून त्यापासून खतनिर्मितीचे वेगवेगळे प्रयोग पाहिले. यापासून प्रेरणा घेत त्यांनी घरच्या घरी ओला कचरा एकत्र करून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली. ‘स्मार्ट कम्पोस्टिंग ड्रम’च्या माध्यमातून त्या घरच्या घरी खत बनवतात. कंपोस्ट खतनिर्मितीबाबत त्या कन्नड, बीड, औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील महिलांशी संवाद साधत जागरूकता करतात. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत.

घरच्या घरी अशी करावी कंपोस्ट खतनिर्मिती साधा पाण्याचा माठ, मोठ्या ड्रमपासून सुरुवात करावी. ड्रमला छिदे्र पाडून खाली मातीचा बेस तयार करून घ्यावा. त्यावर पाणी शिंपडून सर्व ओला कचरा पसरवून टाकावा. ओला कचरा म्हणजे भाज्या, फळांच्या साली, देठ, चहाचा चोथा, उरलेले अन्न, खरकटे, कुंड्यांमधला कचरा, निर्माल्य, असे सर्व पसरवून टाकावे. साधारणपणे ५, ६ इंच ओल्या कचऱ्यावर २ इंच मातीचा थर पसरवावा, असे दररोज करावे. यास खालीपर्यंत हवा (आॅक्सिजन) मिळावी म्हणून ८-१० दिवसांनी काठीने थोडे-थोडे हलवावे. साधारणपणे ३-४ महिन्यांत खत तयार होते. नंतर हे खत आपण झाडांना वापरू शकतो. नर्सरीतही देऊ शकतो किंवा हेच खत ओल्या कचऱ्यावर मातीसारखे टाकू शकतो. हेच खत आणि थोडी माती टाकून सिमेंटच्या पोत्यात भरल्यास यात पालेभाज्या, मिरची, इतर वेली, भाज्या लावता येतात. गच्चीवर तर सुंदर बाग करता येते. खत तयार करायची घाई असेल, तर ओल्या कचऱ्यावर चिमूटभर बायो कल्चर टाकले; अथवा आंबट ताक शिंपडले तरी चालते. यात फार पाणी राहू देऊ नये. नाहीतर हवा मिळत नाही. मिश्रण सडले तर वास येऊ शकतो. या प्रक्रियेत फक्त कुजणे अपेक्षित आहे. 

उत्तम पर्याय   स्वाती स्मार्त म्हणाल्या, ‘अनेक नागरिकांची तक्रार असते की, आम्हाला खतनिर्मितीची आवड तर आहे; पण आमच्याकडे जागाच नाही. अशा नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही ड्रम, पाण्याची बादली, जुने माठ यांच्यामध्येही ही खतनिर्मितीची प्रक्रिया करू शकता. या प्रकल्पाला जास्त जागाही लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्येही हा प्रकल्प करू शकता, जेणेकरून हवाही खेळती राहील आणि वासही येणार नाही.’

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न