शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

चित्रपटातून प्रेरणा घेऊन कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 17:55 IST

आपला कचरा, आपली जबाबदारी!

ठळक मुद्देआतापर्यंत १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरे ‘वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल’मधील चित्रपटांमधून प्रेरणा

- अबोली कुलकर्णी

औरंगाबाद : घरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे? हा प्रश्न गृहिणींना रोजच पडतो. मग हा कचरा एकतर रस्त्यावर किंवा उकिरड्यावर नेऊन टाकला जातो, नाहीतर ओला-सुका, असे त्याचे वर्गीकरण करून कचरापेट्यांमध्ये त्या टाकतात. मात्र, या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करू शकतो, हा विचारच डोक्यात येत नाही. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून कॅनॉट परिसरातील एक जागरूक नागरिक स्वाती स्मार्त या घरच्या घरी कंपोस्ट खतनिर्मिती करतात. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ या एकाच ध्यासाने त्या कार्यरत आहेत. 

 गत ५ वर्षांपूर्वी स्वाती स्मार्त यांनी ‘वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दाखविण्यात आलेल्या चित्रपटांमधून कचऱ्याचे योग्य संकलन करून त्यापासून खतनिर्मितीचे वेगवेगळे प्रयोग पाहिले. यापासून प्रेरणा घेत त्यांनी घरच्या घरी ओला कचरा एकत्र करून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली. ‘स्मार्ट कम्पोस्टिंग ड्रम’च्या माध्यमातून त्या घरच्या घरी खत बनवतात. कंपोस्ट खतनिर्मितीबाबत त्या कन्नड, बीड, औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील महिलांशी संवाद साधत जागरूकता करतात. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत.

घरच्या घरी अशी करावी कंपोस्ट खतनिर्मिती साधा पाण्याचा माठ, मोठ्या ड्रमपासून सुरुवात करावी. ड्रमला छिदे्र पाडून खाली मातीचा बेस तयार करून घ्यावा. त्यावर पाणी शिंपडून सर्व ओला कचरा पसरवून टाकावा. ओला कचरा म्हणजे भाज्या, फळांच्या साली, देठ, चहाचा चोथा, उरलेले अन्न, खरकटे, कुंड्यांमधला कचरा, निर्माल्य, असे सर्व पसरवून टाकावे. साधारणपणे ५, ६ इंच ओल्या कचऱ्यावर २ इंच मातीचा थर पसरवावा, असे दररोज करावे. यास खालीपर्यंत हवा (आॅक्सिजन) मिळावी म्हणून ८-१० दिवसांनी काठीने थोडे-थोडे हलवावे. साधारणपणे ३-४ महिन्यांत खत तयार होते. नंतर हे खत आपण झाडांना वापरू शकतो. नर्सरीतही देऊ शकतो किंवा हेच खत ओल्या कचऱ्यावर मातीसारखे टाकू शकतो. हेच खत आणि थोडी माती टाकून सिमेंटच्या पोत्यात भरल्यास यात पालेभाज्या, मिरची, इतर वेली, भाज्या लावता येतात. गच्चीवर तर सुंदर बाग करता येते. खत तयार करायची घाई असेल, तर ओल्या कचऱ्यावर चिमूटभर बायो कल्चर टाकले; अथवा आंबट ताक शिंपडले तरी चालते. यात फार पाणी राहू देऊ नये. नाहीतर हवा मिळत नाही. मिश्रण सडले तर वास येऊ शकतो. या प्रक्रियेत फक्त कुजणे अपेक्षित आहे. 

उत्तम पर्याय   स्वाती स्मार्त म्हणाल्या, ‘अनेक नागरिकांची तक्रार असते की, आम्हाला खतनिर्मितीची आवड तर आहे; पण आमच्याकडे जागाच नाही. अशा नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही ड्रम, पाण्याची बादली, जुने माठ यांच्यामध्येही ही खतनिर्मितीची प्रक्रिया करू शकता. या प्रकल्पाला जास्त जागाही लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्येही हा प्रकल्प करू शकता, जेणेकरून हवाही खेळती राहील आणि वासही येणार नाही.’

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न