शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

बायपासचे काम पूर्ण, मेहनत केल्याचे समाधान - क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:19 IST

बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येडशी ते औरंगाबाद हा चार पदरी रस्ता करण्याचा प्रस्ताव तत्कालीन सरकारच्या काळात सादर करण्यात आला होता. त्यानंतर लगेच डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. १९० किलोमिटर लांबीचा आणि १८०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आपल्या कार्यकाळात मार्गी लावत असताना अनेक अडचणी पार करून हे काम पूर्णत्वास जात आहे. बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कामासाठी केलेले प्रयत्न आणि मेहनत याबाबत आज आपण समाधानी असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.शुक्र वारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी कामाची पाहणी केली. यावेळी आय.आर.बी.चे प्रकल्प संचालक चौरे आणि नॅशनल हायवेचे घोटकर , तसेच दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, डॉ. योगेश क्षीरसागर, अ‍ॅड.शेख शिफक, अ‍ॅड.सय्यद खाजा, विलास विधाते, वैजनाथ तांदळे, राजेंद्र पवार, अशोक हिंगे, अरूण डाके, बबन गोरे, विलास बोबडे, अरूण बोंगाणी, धनंजय वाघमारे, दत्ता गायकवाड, अ‍ॅड.महेश धांडे आदि उपस्थित होते.पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आ. क्षीरसागर यांनी या बायपासच्या कामाच्या बाबतीत संपूर्ण माहिती पत्रकारांना दिली. शहरापासून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग २११ वर सातत्याने अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण गेले. यासाठी शहराच्या बाहेरून बायपास रस्ता करणे आवश्यक झाले त्यामुळे याबाबतीत आपण प्रयत्न करण्यास सुरवात केली. बायपास करत असताना शहराच्या पुर्वेला करावा की पश्चिमेला याबाबत वेगवेगळी मत मतांतरे आली. हा निर्णय घेण्यासाठी बीड येथील स्व.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात तत्कालीन प्रकल्प संचालक चामल गोरे यांनी जनसुनावणी घेऊन हा बायपास पूर्व बाजूने करण्याचा निर्णय झाला. या रस्त्याचा प्रस्ताव परिपूर्ण करून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला तेंव्हा केंद्रीय पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक होते. यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्याशी भेटून या प्रकल्पाला सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानंतर नाहरकरत प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले. येडशी ते औरंगाबाद हा रस्ता चौपदरी करण्यात यावा अशी मागणी त्याच वेळी आपण तत्कालीन केंद्रीय रस्ते विकास मंत्री कमलनाथ व सि.पी. जोशी यांची अनेक वेळा भेट घेऊन या प्रकल्पास मंजूरी मिळवून घेतली. बीड शहरातून वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते त्यामुळे भूसंपादनाचे काम तात्काळ करून घेण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी नविलकशोर राम यांच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास आले. आज बीड बायपासचे काम पूर्ण होऊन तो जनतेसाठी वाहतुकीला खुला होत आहे यात आपण केलेल्या प्रयत्नाला आणि मेहनतीला यश आल्याचा आनंद माझ्यासह संपूर्ण बीडकरांना झाला आहे, असेही आ. क्षीरसागर यांनी सांगितले.