शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

बायपासचे काम पूर्ण, मेहनत केल्याचे समाधान - क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:19 IST

बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येडशी ते औरंगाबाद हा चार पदरी रस्ता करण्याचा प्रस्ताव तत्कालीन सरकारच्या काळात सादर करण्यात आला होता. त्यानंतर लगेच डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. १९० किलोमिटर लांबीचा आणि १८०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आपल्या कार्यकाळात मार्गी लावत असताना अनेक अडचणी पार करून हे काम पूर्णत्वास जात आहे. बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कामासाठी केलेले प्रयत्न आणि मेहनत याबाबत आज आपण समाधानी असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.शुक्र वारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी कामाची पाहणी केली. यावेळी आय.आर.बी.चे प्रकल्प संचालक चौरे आणि नॅशनल हायवेचे घोटकर , तसेच दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, डॉ. योगेश क्षीरसागर, अ‍ॅड.शेख शिफक, अ‍ॅड.सय्यद खाजा, विलास विधाते, वैजनाथ तांदळे, राजेंद्र पवार, अशोक हिंगे, अरूण डाके, बबन गोरे, विलास बोबडे, अरूण बोंगाणी, धनंजय वाघमारे, दत्ता गायकवाड, अ‍ॅड.महेश धांडे आदि उपस्थित होते.पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आ. क्षीरसागर यांनी या बायपासच्या कामाच्या बाबतीत संपूर्ण माहिती पत्रकारांना दिली. शहरापासून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग २११ वर सातत्याने अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण गेले. यासाठी शहराच्या बाहेरून बायपास रस्ता करणे आवश्यक झाले त्यामुळे याबाबतीत आपण प्रयत्न करण्यास सुरवात केली. बायपास करत असताना शहराच्या पुर्वेला करावा की पश्चिमेला याबाबत वेगवेगळी मत मतांतरे आली. हा निर्णय घेण्यासाठी बीड येथील स्व.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात तत्कालीन प्रकल्प संचालक चामल गोरे यांनी जनसुनावणी घेऊन हा बायपास पूर्व बाजूने करण्याचा निर्णय झाला. या रस्त्याचा प्रस्ताव परिपूर्ण करून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला तेंव्हा केंद्रीय पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक होते. यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्याशी भेटून या प्रकल्पाला सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानंतर नाहरकरत प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले. येडशी ते औरंगाबाद हा रस्ता चौपदरी करण्यात यावा अशी मागणी त्याच वेळी आपण तत्कालीन केंद्रीय रस्ते विकास मंत्री कमलनाथ व सि.पी. जोशी यांची अनेक वेळा भेट घेऊन या प्रकल्पास मंजूरी मिळवून घेतली. बीड शहरातून वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते त्यामुळे भूसंपादनाचे काम तात्काळ करून घेण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी नविलकशोर राम यांच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास आले. आज बीड बायपासचे काम पूर्ण होऊन तो जनतेसाठी वाहतुकीला खुला होत आहे यात आपण केलेल्या प्रयत्नाला आणि मेहनतीला यश आल्याचा आनंद माझ्यासह संपूर्ण बीडकरांना झाला आहे, असेही आ. क्षीरसागर यांनी सांगितले.