शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
3
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
4
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
5
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
6
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
7
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
9
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
10
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
11
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
12
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
13
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
14
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
15
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
16
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
17
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
18
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
19
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
20
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण औरंगाबाद जिल्हा चिंब; बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:45 IST

जिल्ह्यात जवळपास दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजा मेहेरबान झाला. यामुळे माना टाकणाऱ्या पिकांना तूर्तास दिलासा मिळाला असून, या पावसामुळे बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. गुरुवारी फुलंब्री, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, सोयगाव, खुलताबाद, कन्नडसह औरंगाबाद तालुक्यात पावसाने दिवसभर कधी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना पाणी वाहिले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले.

औरंगाबाद : जिल्ह्यात जवळपास दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजा मेहेरबान झाला. यामुळे माना टाकणाऱ्या पिकांना तूर्तास दिलासा मिळाला असून, या पावसामुळे बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. गुरुवारी फुलंब्री, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, सोयगाव, खुलताबाद, कन्नडसह औरंगाबाद तालुक्यात पावसाने दिवसभर कधी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना पाणी वाहिले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. रात्री उशिरा कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथे गांधारी नदीला तर वासडीजवळील अंजना नदीला मोठा पूर आला होता.वैजापूरमध्ये रिमझिमवैजापूर : मागील दोन महिन्यांपासून पावसाने तालुक्यात पाठ फिरवली होती. मात्र, गुरुवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.गुरुवारी पहाटेपासून वैजापूर शहर आणि परिसरासह शिऊर, खंडाळा, महालगाव, लाडगाव, लासूरगाव, गारज, नागमठाण, लोणी खुर्द, बोरसर मंडळात सर्व दूर पावसाने रिमझिम हजेरी लावली आहे. त्यामुळे खरीप पिकांना आधार मिळाला असून पिके तरतील अशी अपेक्षा आहे. बुधवारी रात्रीतून तालुक्यात सरासरी ६.९० मि.मी.पाऊस झाला आहे. तालुक्यातील सर्वच मंडळात भीज पावसाने हजेरी लावली आहे.तालुक्यात सरासरी ६.९० मि.मी. पाऊस झाला असून, वैजापूरमध्ये १.०० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर शिऊर २४.००, खंडाळा १०.००, महालगाव २.००, लाडगाव ०.००, लासूरगाव ११.००, गारज ५.००, नागमठाण ०.००, लोणी खुर्द १४.००, बोरसर २.०० मि.मी. पावसाची नोंद झाली. गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसाने खंडाळा येथील आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांसह ग्रामीण भागातून आलेले नागरिक, महिलांची तारांबळ उडाली. यावेळी भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री करून गावी जाणे पसंत केले. यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.फुलंब्रीत दमदारफुलंब्री : तालुक्यात गुरुवारी (दि.१६) दिवसभर संततधार पाऊस झाला. २० दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर हास्य दिसून आले.गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. दुपारी काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाने जोर धरला. तालुक्यात २२ दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. यामुळे मका पिकाला पाणी देण्याची वेळ आली होती, तर डोंगराळ भागातील व हलक्या जमिनीतील मका पिके वाया गेली; पण काळ्या जमिनीतील तग धरून असलेली मका जाण्याच्या मार्गावर असताना पाऊस पडला. यामुळे मकाला तूर्त जीवदान मिळाले.येथील धानोरा, रिधोरा, पीरबावडा, मारसावळी, गेवराई गुंगी, टाकळी कोलते या भागातील मका पिके वाया गेली. मात्र, कपाशी पिकाला पावसाची गरज असताना पाऊस झाल्याने कपाशी तरली आहे. या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होईल, असे जाणकारांनी सांगितले.सिल्लोड तालुक्यात भीज पाऊससिल्लोड : तालुक्यातील सिल्लोड, भराडी, अंभई, अजिंठा, आमठाणा, गोळेगाव, निल्लोड, बोरगाव बाजार या आठ मंडळात शेतीसाठी उपयोगी, रिमझिम तर कुठे समाधानकारक भीज पाऊस झाला.येथील ७६ गावांतील शेतकºयांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे, तर ५७ गावांतील पूर्ण पिके सुकली असून, गुरुवारी झालेल्या पावसामुळे सुकलेल्या पिकांना फायदा होण्याची शक्यता नसल्याचे शेतकºयांनी सांगितले.तालुक्यात काही ठिकाणी भीज पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस झाला आहे.भीज पावसामुळे जमिनीखालील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. तसेच कपाशी पिकालाही या पावसामुळे फायदा होईल, असे असले तरी अद्यापही येथील शेतकरी आणखी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.पैठणमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊसपैठण : शहर व तालुक्यात बुधवार सायंकाळपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांपासून सूर्यदर्शन झाले नसून वातावरणातील गारवा वाढला आहे.पैठण शहरात दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. छत्री, रेनकोट या पावसामुळे घराबाहेर आले. पैठण शहरातील सकल भागात कुठे-कुठे आजच्या पावसामुळे पाणी साचले.महिनाभराच्या खंडानंतर तालुक्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.पैठण तालुक्यात रिमझिम पाऊस पडण्यास प्रारंभ झाला. अधूनमधून या पावसाचे हलक्या स्वरूपात रूपांतर होत होते. चितेगाव, दावरवाडी, बालानगर, बिडकीन, ढोरकीन, पिंपळवाडी, आपेगाव, विहामांडवा, जायकवाडी आदी परिसरात पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपात सुरू होता.गंगापुरात सूर्यदर्शन झालेच नाहीगंगापूर तालुक्यात ठिकठिकाणी गुरुवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले.सकाळी ८ वा. पावसाला सुरुवात झाली. यानंतर दिवसभर रिमझिम कधी जोरदार सरी कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाळी वातावरणामुळे ग्रामीण भागातील नागरिक गंगापूर शहरात फिरकलेच नसल्याचे चित्र दिसून आले.खुलताबादेत पिकांना जीवदानखुलताबाद : खुलताबाद तालुक्यात दोन महिन्यांनंतर सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण पसरले असून पिकांना जीवदान मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट सध्या तरी टळले आहे.बुधवारी रात्रीपासून पावसाने तालुक्याच्या सर्व भागात हजेरी लावली व दिवसभरही पावसाची बॅटिंग सुरूच असल्याने पिकांना या पावसाचा फायदा झाला. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शेतकºयांची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.तालुक्यातील खुलताबाद, वेरूळ, गल्लेबोरगाव, गदाना, सुलतानपूर, बाजारसावंगी परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांअभावी बंद होते, तर बाजारातही ग्राहक नसल्याने व्यापारी बसून होते.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद