शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यादीप बालगृहातील छळाच्या मुलींकडून पलायनापूर्वीच तक्रारी; पोलिसांच्या चौकशीत उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:44 IST

बालगृह प्रशासनासह बालकल्याण समिती, बालविकास विभागाकडून दुर्लक्ष

छत्रपती संभाजीनगर : छावणीतील विद्यादीप बालगृहातून पलायन करण्यापूर्वी ‘त्या’ ९ मुलींच्या स्थानिक प्रशासनाकडून छळ करण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची बालगृहाच्या प्रशासनासह बालकल्याण समिती आणि जिल्हा बालविकास अधिकारी कार्यालयाने दखल घेतली नसल्याची माहिती महिला पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यादीप बालगृहातून नऊ अल्पवयीन मुलींनी दि. ३० जून रोजी पलायन केले होते. त्यातील सर्वच मुलींचा शोध शहर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. या समितीला मुलींनी पलायन करण्यापूर्वी स्वत:च्या सहीने लिहिलेली पत्रे मिळाली आहेत. त्याशिवाय समितीने सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे जमा केले आहेत. त्यात जिल्हा बालकल्याण समितीसमाेर हजर करण्यासह नाशिक येथील बालगृहात स्थलांतर करण्याविषयीची मागणी केलेली होती. मात्र, त्याविषयी बालकल्याण समितीने कोणताही निर्णय घेतला नाही. विद्यादीप बालगृहात होणाऱ्या छळाला कंटाळून मुलींनी पळून जाण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुलींचे तक्रार अर्जच बाल कल्याण समितीसमोर आलेले नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. बालगृहातील भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा बालविकास अधिकारी कार्यालयाची आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून आढावाबालगृहातुन मुलींनी पलायन केल्याच्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी घेतली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधत त्यांनी सविस्तर माहिती घेत नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधिमंडळाच्या अधिवेशनात पडसादबालगृहातून पळून गेलेल्या मुलींच्या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही पडले. महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितीकडूनही चौकशी करण्यात येत आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा बालकल्याण समिती ही अर्धन्यायिक समिती आहे. या समितीच्या समोर येणाऱ्या प्रकरणात बहुमताने निर्णय घेतला जातो. त्यानुसार संबंधितांना आदेश दिले जातात. मात्र, समिती बालगृहात मिळणाऱ्या सुविधाची पाहणी करीत नाही. मुलींनी सोयी-सुविधा, समुपदेशन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे.- ॲड. आशा शेरखाने, अध्यक्ष, जिल्हा बालकल्याण समिती

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी