शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

विद्यादीप बालगृहातील छळाच्या मुलींकडून पलायनापूर्वीच तक्रारी; पोलिसांच्या चौकशीत उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:44 IST

बालगृह प्रशासनासह बालकल्याण समिती, बालविकास विभागाकडून दुर्लक्ष

छत्रपती संभाजीनगर : छावणीतील विद्यादीप बालगृहातून पलायन करण्यापूर्वी ‘त्या’ ९ मुलींच्या स्थानिक प्रशासनाकडून छळ करण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची बालगृहाच्या प्रशासनासह बालकल्याण समिती आणि जिल्हा बालविकास अधिकारी कार्यालयाने दखल घेतली नसल्याची माहिती महिला पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यादीप बालगृहातून नऊ अल्पवयीन मुलींनी दि. ३० जून रोजी पलायन केले होते. त्यातील सर्वच मुलींचा शोध शहर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. या समितीला मुलींनी पलायन करण्यापूर्वी स्वत:च्या सहीने लिहिलेली पत्रे मिळाली आहेत. त्याशिवाय समितीने सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे जमा केले आहेत. त्यात जिल्हा बालकल्याण समितीसमाेर हजर करण्यासह नाशिक येथील बालगृहात स्थलांतर करण्याविषयीची मागणी केलेली होती. मात्र, त्याविषयी बालकल्याण समितीने कोणताही निर्णय घेतला नाही. विद्यादीप बालगृहात होणाऱ्या छळाला कंटाळून मुलींनी पळून जाण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुलींचे तक्रार अर्जच बाल कल्याण समितीसमोर आलेले नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. बालगृहातील भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा बालविकास अधिकारी कार्यालयाची आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून आढावाबालगृहातुन मुलींनी पलायन केल्याच्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी घेतली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधत त्यांनी सविस्तर माहिती घेत नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधिमंडळाच्या अधिवेशनात पडसादबालगृहातून पळून गेलेल्या मुलींच्या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही पडले. महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितीकडूनही चौकशी करण्यात येत आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा बालकल्याण समिती ही अर्धन्यायिक समिती आहे. या समितीच्या समोर येणाऱ्या प्रकरणात बहुमताने निर्णय घेतला जातो. त्यानुसार संबंधितांना आदेश दिले जातात. मात्र, समिती बालगृहात मिळणाऱ्या सुविधाची पाहणी करीत नाही. मुलींनी सोयी-सुविधा, समुपदेशन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे.- ॲड. आशा शेरखाने, अध्यक्ष, जिल्हा बालकल्याण समिती

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी