अनुकंपाधारकांची भरती प्रक्रिया रखडली

By | Published: December 2, 2020 04:12 AM2020-12-02T04:12:45+5:302020-12-02T04:12:45+5:30

जिल्हा परिषद औरंगाबाद येथील अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून रखडली आहे. अनुकंपाधारकांची तात्काळ भरती करून ...

Compassionate recruitment process stalled | अनुकंपाधारकांची भरती प्रक्रिया रखडली

अनुकंपाधारकांची भरती प्रक्रिया रखडली

googlenewsNext

जिल्हा परिषद औरंगाबाद येथील अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून रखडली आहे. अनुकंपाधारकांची तात्काळ भरती करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात गेल्या महिन्यात करण्यात आली होती. मात्र, याकडे कुणी लक्ष देत नाहीत, असा आरोप अनुकंपाधारकांनी केला आहे. जिल्हा परिषद औरंगाबाद येथील अनुकंपाधारक उमेदवारांचे सर्व कागदपत्रे तपासणी १२ मार्च २०२० रोजी करण्यात आली. त्यानंतर कोविड महामारीमुळे सरळसेवा पदभरतीस शासनाने निर्बंध लावले असले तरी अनुकंपा भरतीवर निर्बंध लागू राहणार नसल्याचेे स्पष्ट केले होते. मात्र, भरती प्रक्रिया आठ महिने झाले तरी पूर्ण केली नसल्याने अनुकंपाधारक उमेदवार हवालदिल झाले आहेत. याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Compassionate recruitment process stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.