शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

तयारीला लागा! मनोज जरांगेंनी जाहीर केला मराठा आरक्षण दिंडीचा मार्ग

By बापू सोळुंके | Updated: December 28, 2023 14:25 IST

लाखों समाजबांधवांसह मुंबईत धडकणार, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी लाखो समाजबांधवांसह मुंबईला जाण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार आज त्यांनी मुंबईला जाण्याचा रूट(मार्ग) त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. समाजबांधवांनी दररोज लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह मराठा आरक्षण दिंडीत सहभागी होण्यासाठी तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी  मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलन करीत आहेत. मराठा समाजाला टीकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यसरकारने दिलेली २४ डिसेंबरची मुदत संपल्याने मनोज जरांगे पाटील यांनी कोट्यवधी समाजबांधवासह मुंबईला जाण्याची घोषणा केली. गुरूवारी त्यांनी शहरातील खाजगी रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना मुंबईला जाण्याचा मार्ग कसा असेल, याविषयी सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले की, २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटी(जि. जालना)येथून मुंबईला जाण्याचा प्रवास सुरू होईल. तेथून शहागड, गेवराई (जि. बीड), पाडळसिंग, अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करून पाथर्डी, तीसगाव, करंजी फाटा मार्गे अहमदनगर, केडगाव, सूपा,शिरूर, शिक्रापूर मार्गे रांजणगाव मार्गे वाघोली, खराडी बायपास मार्गे, चंदननगर  पुणे, लोणावळा, पनवेल, वाशी ,चेम्बुर मार्गे मुंबईतील आझाद मैदान असा मार्ग असेल.

प्रवासाला किती दिवस लागतील, याप्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला काही विशिष्ट तारखेस मुंबईला पोहचायचे नाही, यामुळे कितीही दिवस लागले तरी आम्ही मुंबईत जाणारच आहोत. शिवाय प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपआपल्या तुकडीतील समाजबांधवाच्या जेवण, पाण्याची सोय करायची आहे. यासाठी एका वाहनातून मीठ,मिरची, तेल, ५० किलो बाजरी पीठ, ५० किलो गव्हाचे पीठ, ५० किलो तांदुळ, दाळी आणि छोटी चुल , पाण्याचे ड्रम, टँकर सोबत घ्यावी, जेथे रस्त्यात थांबाल तेथेच आपला स्वयंपाक करून खायचा आहे.

सुमारे सव्वादोन लाख स्वयंसेवककोट्यवधी समाजबांधव या मराठा आरक्षण पायी दिंडीत सहभागी होणार असल्याने कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी सुमारे दोन ते सव्वा दोन लाख स्वयंसेवक यासाठी तैनात असतील. विविध तुकड्यांमध्ये हा लाँगमार्च असेल. शिवाय मुंबईतील आणि राज्यातील मराठा बांधवांनी गट,तट सोडून या आंदोलनात सहभाग नोंदविण्याचे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद