शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

दिलासादायक ! नवीन पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के वाढीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 14:28 IST

New Water Pipeline For Aurangabad महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियोजन करणार नवीन पाणीपुरवठा योजनेत ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार त्यातील २५ टाक्या तातडीने उभारण्यात येणार आहेत

औरंगाबाद : नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आणखी तीन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत शहराला दिलासा देण्यासाठी पाणी पुरवठ्यात २० टक्के वाढ करता येऊ शकते का, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे तज्ज्ञ अधिकारी यासंबंधीचा आराखडा तयार करून महापालिकेला सादर करणार असल्याची माहिती बुधवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. त्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजनेत ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यातील २५ टाक्या तातडीने उभारण्यात येणार असून, टाक्या उभ्या करण्यासाठी जागा निश्चित केलेली नाही. या टाक्यांसाठी जागेची तपासणी करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथक तयार केले आहे. यामध्ये शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि प्रभाग अभियंता यांचा समावेश आहे. सध्या महापालिका ६० टक्के पाणीपुरवठा थेट टाक्यांवरून न करता, पाईपलाईनमधून करत आहे. त्यामुळे असंख्य नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे उपस्थित होते.

पाणी वाढविणे शक्‍यजायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत महापालिकेच्या जलवाहिन्या काही ठिकाणी अत्यंत कमकुवत झाल्या आहेत. या कमकुवत जलवाहिनीच्या बाजूने आणखी एक जलवाहिनी टाकून बायपास पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल. या प्रक्रियेमुळे शहरात २० टक्के पाण्याची वाढ होऊ शकते, असा प्रस्ताव अजय सिंग यांनी महापालिकेला दिला. यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक लवकरच प्राधिकरणकडून सादर करण्यात येईल.

सौर विजेचा वापरसध्या महापालिकेला पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाचा खर्च ५० ते ६० कोटी रुपये होत आहे. नवीन पाणीपुरवठा योजना आल्यानंतर हा खर्च किमान १२० ते १२५ कोटींपर्यंत जाईल. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर दहा हेक्‍टर जागा वन विभागाकडून घेऊन सौर पॅनलचा प्रकल्प उभारण्याबाबतचा विचारही आजच्या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी