शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दिलासादायक ! नवीन पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के वाढीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 14:28 IST

New Water Pipeline For Aurangabad महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियोजन करणार नवीन पाणीपुरवठा योजनेत ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार त्यातील २५ टाक्या तातडीने उभारण्यात येणार आहेत

औरंगाबाद : नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आणखी तीन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत शहराला दिलासा देण्यासाठी पाणी पुरवठ्यात २० टक्के वाढ करता येऊ शकते का, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे तज्ज्ञ अधिकारी यासंबंधीचा आराखडा तयार करून महापालिकेला सादर करणार असल्याची माहिती बुधवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. त्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजनेत ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यातील २५ टाक्या तातडीने उभारण्यात येणार असून, टाक्या उभ्या करण्यासाठी जागा निश्चित केलेली नाही. या टाक्यांसाठी जागेची तपासणी करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथक तयार केले आहे. यामध्ये शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि प्रभाग अभियंता यांचा समावेश आहे. सध्या महापालिका ६० टक्के पाणीपुरवठा थेट टाक्यांवरून न करता, पाईपलाईनमधून करत आहे. त्यामुळे असंख्य नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे उपस्थित होते.

पाणी वाढविणे शक्‍यजायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत महापालिकेच्या जलवाहिन्या काही ठिकाणी अत्यंत कमकुवत झाल्या आहेत. या कमकुवत जलवाहिनीच्या बाजूने आणखी एक जलवाहिनी टाकून बायपास पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल. या प्रक्रियेमुळे शहरात २० टक्के पाण्याची वाढ होऊ शकते, असा प्रस्ताव अजय सिंग यांनी महापालिकेला दिला. यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक लवकरच प्राधिकरणकडून सादर करण्यात येईल.

सौर विजेचा वापरसध्या महापालिकेला पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाचा खर्च ५० ते ६० कोटी रुपये होत आहे. नवीन पाणीपुरवठा योजना आल्यानंतर हा खर्च किमान १२० ते १२५ कोटींपर्यंत जाईल. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर दहा हेक्‍टर जागा वन विभागाकडून घेऊन सौर पॅनलचा प्रकल्प उभारण्याबाबतचा विचारही आजच्या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी