शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक ! नवीन पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के वाढीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 14:28 IST

New Water Pipeline For Aurangabad महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियोजन करणार नवीन पाणीपुरवठा योजनेत ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार त्यातील २५ टाक्या तातडीने उभारण्यात येणार आहेत

औरंगाबाद : नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आणखी तीन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत शहराला दिलासा देण्यासाठी पाणी पुरवठ्यात २० टक्के वाढ करता येऊ शकते का, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे तज्ज्ञ अधिकारी यासंबंधीचा आराखडा तयार करून महापालिकेला सादर करणार असल्याची माहिती बुधवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. त्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजनेत ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यातील २५ टाक्या तातडीने उभारण्यात येणार असून, टाक्या उभ्या करण्यासाठी जागा निश्चित केलेली नाही. या टाक्यांसाठी जागेची तपासणी करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथक तयार केले आहे. यामध्ये शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि प्रभाग अभियंता यांचा समावेश आहे. सध्या महापालिका ६० टक्के पाणीपुरवठा थेट टाक्यांवरून न करता, पाईपलाईनमधून करत आहे. त्यामुळे असंख्य नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे उपस्थित होते.

पाणी वाढविणे शक्‍यजायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत महापालिकेच्या जलवाहिन्या काही ठिकाणी अत्यंत कमकुवत झाल्या आहेत. या कमकुवत जलवाहिनीच्या बाजूने आणखी एक जलवाहिनी टाकून बायपास पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल. या प्रक्रियेमुळे शहरात २० टक्के पाण्याची वाढ होऊ शकते, असा प्रस्ताव अजय सिंग यांनी महापालिकेला दिला. यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक लवकरच प्राधिकरणकडून सादर करण्यात येईल.

सौर विजेचा वापरसध्या महापालिकेला पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाचा खर्च ५० ते ६० कोटी रुपये होत आहे. नवीन पाणीपुरवठा योजना आल्यानंतर हा खर्च किमान १२० ते १२५ कोटींपर्यंत जाईल. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर दहा हेक्‍टर जागा वन विभागाकडून घेऊन सौर पॅनलचा प्रकल्प उभारण्याबाबतचा विचारही आजच्या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी