शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दिलासादायक ! औट्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 14:05 IST

Autram Ghat Tunnel and Road Work : राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) यावर आतापर्यंत हायवे क्रॉसिंगवर ३५ ते ४० अपघात झाले असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

ठळक मुद्देमाजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वाखाली केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींना शिष्टमंडळ भेटलेपाच हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार म्हणून काम रद्द करण्यात आले, या अफवा चुकीच्या आहेत

औरंगाबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ( NH Dhule -Solapur )औट्रम घाटात बोगदा ( Autram Ghat Tunnel ) व रस्त्याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांची भेट घेतली. तेव्हा या कामाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच या कामाला मंजुरी मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी सेनेच्या शिष्टमंडळाला दिला. (  Central Government is positive about tunnels and roads in Autram Ghat) 

दरम्यान, संघर्ष समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाने कळविले की, औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला आता गती मिळणार असून त्याबाबत सकारात्मक हालचाली वाढल्या आहेत. केंद्र सरकारकडून या कामाला लवकरच मंजुरी मिळेल. यापूर्वी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केंद्रीय दळणवळण विभागाचे सचिव तथा राष्ट्रीय महामार्गाचे प्रभारी अध्यक्ष गिरिधर अरमाने यांच्याशीही याबाबत सविस्तर चर्चा केली.

खैरे यांनी गडकरींच्या निदर्शनास आणून दिले की, या बोगद्याच्या कामासाठी पाच हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याने हे काम रद्द करण्यात आले, अशा चुकीच्या अफवा पसरविण्यात आल्या. त्यामुळे परिसरात गैरसमज निर्माण होत आहे. मात्र, या कामाच्या खर्चामध्ये थोडीफार कपात करून हे काम पूर्ण केल्यास मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा बोगदा महत्त्वाचा ठरेल. गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ बाबत लोकसभेत अनेकदा प्रश्न उपस्थित केला असून, बोगद्याचा विकास आराखडाही तयार करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम सध्या ८० टक्के पूर्ण झाले आहे. बोगदा पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा कायम होत राहील.

राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) यावर आतापर्यंत हायवे क्रॉसिंगवर ३५ ते ४० अपघात झाले असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गल्लेबोरगाव ते देवगाव राज्य महामार्गावरील (क्रमांक ३९) लासूर स्टेशनचा रस्ता ओलांडताना अपघातांची संख्या वाढली आहे. बोरगाव, टाकळी, चापानेर आदी ३५ ते ४० गावांसाठी ही समस्या असून, याबाबतही प्राधिकरणाला योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देण्यात यावी, कन्नड बायपास, अंधानेर येथेही सर्विस रोडची गरज असून ती तत्काळ मान्य करावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, ॲड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख गणू पांडे, माजी उपसभापती तथा सरपंच अशोक दाबके, माजी उपनगर अध्यक्ष डॉ. सदाशिव पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Gadkariनितीन गडकरीChandrakant Khaireचंद्रकांत खैरेhighwayमहामार्ग