शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

दिलासादायक ! औट्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 14:05 IST

Autram Ghat Tunnel and Road Work : राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) यावर आतापर्यंत हायवे क्रॉसिंगवर ३५ ते ४० अपघात झाले असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

ठळक मुद्देमाजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वाखाली केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींना शिष्टमंडळ भेटलेपाच हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार म्हणून काम रद्द करण्यात आले, या अफवा चुकीच्या आहेत

औरंगाबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ( NH Dhule -Solapur )औट्रम घाटात बोगदा ( Autram Ghat Tunnel ) व रस्त्याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांची भेट घेतली. तेव्हा या कामाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच या कामाला मंजुरी मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी सेनेच्या शिष्टमंडळाला दिला. (  Central Government is positive about tunnels and roads in Autram Ghat) 

दरम्यान, संघर्ष समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाने कळविले की, औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला आता गती मिळणार असून त्याबाबत सकारात्मक हालचाली वाढल्या आहेत. केंद्र सरकारकडून या कामाला लवकरच मंजुरी मिळेल. यापूर्वी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केंद्रीय दळणवळण विभागाचे सचिव तथा राष्ट्रीय महामार्गाचे प्रभारी अध्यक्ष गिरिधर अरमाने यांच्याशीही याबाबत सविस्तर चर्चा केली.

खैरे यांनी गडकरींच्या निदर्शनास आणून दिले की, या बोगद्याच्या कामासाठी पाच हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याने हे काम रद्द करण्यात आले, अशा चुकीच्या अफवा पसरविण्यात आल्या. त्यामुळे परिसरात गैरसमज निर्माण होत आहे. मात्र, या कामाच्या खर्चामध्ये थोडीफार कपात करून हे काम पूर्ण केल्यास मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा बोगदा महत्त्वाचा ठरेल. गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ बाबत लोकसभेत अनेकदा प्रश्न उपस्थित केला असून, बोगद्याचा विकास आराखडाही तयार करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम सध्या ८० टक्के पूर्ण झाले आहे. बोगदा पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा कायम होत राहील.

राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) यावर आतापर्यंत हायवे क्रॉसिंगवर ३५ ते ४० अपघात झाले असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गल्लेबोरगाव ते देवगाव राज्य महामार्गावरील (क्रमांक ३९) लासूर स्टेशनचा रस्ता ओलांडताना अपघातांची संख्या वाढली आहे. बोरगाव, टाकळी, चापानेर आदी ३५ ते ४० गावांसाठी ही समस्या असून, याबाबतही प्राधिकरणाला योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देण्यात यावी, कन्नड बायपास, अंधानेर येथेही सर्विस रोडची गरज असून ती तत्काळ मान्य करावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, ॲड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख गणू पांडे, माजी उपसभापती तथा सरपंच अशोक दाबके, माजी उपनगर अध्यक्ष डॉ. सदाशिव पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Gadkariनितीन गडकरीChandrakant Khaireचंद्रकांत खैरेhighwayमहामार्ग