शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

दिलासादायक ! औट्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 14:05 IST

Autram Ghat Tunnel and Road Work : राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) यावर आतापर्यंत हायवे क्रॉसिंगवर ३५ ते ४० अपघात झाले असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

ठळक मुद्देमाजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वाखाली केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींना शिष्टमंडळ भेटलेपाच हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार म्हणून काम रद्द करण्यात आले, या अफवा चुकीच्या आहेत

औरंगाबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ( NH Dhule -Solapur )औट्रम घाटात बोगदा ( Autram Ghat Tunnel ) व रस्त्याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांची भेट घेतली. तेव्हा या कामाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच या कामाला मंजुरी मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी सेनेच्या शिष्टमंडळाला दिला. (  Central Government is positive about tunnels and roads in Autram Ghat) 

दरम्यान, संघर्ष समिती सदस्यांच्या शिष्टमंडळाने कळविले की, औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला आता गती मिळणार असून त्याबाबत सकारात्मक हालचाली वाढल्या आहेत. केंद्र सरकारकडून या कामाला लवकरच मंजुरी मिळेल. यापूर्वी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केंद्रीय दळणवळण विभागाचे सचिव तथा राष्ट्रीय महामार्गाचे प्रभारी अध्यक्ष गिरिधर अरमाने यांच्याशीही याबाबत सविस्तर चर्चा केली.

खैरे यांनी गडकरींच्या निदर्शनास आणून दिले की, या बोगद्याच्या कामासाठी पाच हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याने हे काम रद्द करण्यात आले, अशा चुकीच्या अफवा पसरविण्यात आल्या. त्यामुळे परिसरात गैरसमज निर्माण होत आहे. मात्र, या कामाच्या खर्चामध्ये थोडीफार कपात करून हे काम पूर्ण केल्यास मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा बोगदा महत्त्वाचा ठरेल. गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ बाबत लोकसभेत अनेकदा प्रश्न उपस्थित केला असून, बोगद्याचा विकास आराखडाही तयार करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम सध्या ८० टक्के पूर्ण झाले आहे. बोगदा पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा कायम होत राहील.

राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) यावर आतापर्यंत हायवे क्रॉसिंगवर ३५ ते ४० अपघात झाले असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गल्लेबोरगाव ते देवगाव राज्य महामार्गावरील (क्रमांक ३९) लासूर स्टेशनचा रस्ता ओलांडताना अपघातांची संख्या वाढली आहे. बोरगाव, टाकळी, चापानेर आदी ३५ ते ४० गावांसाठी ही समस्या असून, याबाबतही प्राधिकरणाला योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देण्यात यावी, कन्नड बायपास, अंधानेर येथेही सर्विस रोडची गरज असून ती तत्काळ मान्य करावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, ॲड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख गणू पांडे, माजी उपसभापती तथा सरपंच अशोक दाबके, माजी उपनगर अध्यक्ष डॉ. सदाशिव पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Gadkariनितीन गडकरीChandrakant Khaireचंद्रकांत खैरेhighwayमहामार्ग