शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिलासादायक ! अतिवृष्टीमुळे नादुरुस्त रस्ते, पुलांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ टक्के निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:47 IST

राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या ५ टक्के निधी विशेष बाब म्हणून तातडीच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात ९०८ किलोमीटर रस्ते व ४१० पुलांच्या दुरुस्तीची गरज

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे ९०८ किलोमीटर रस्ते व ४१० पूल आणि एक संरक्षक भिंत वाहून गेले आहेत. बुधवारी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या ५ टक्के निधी विशेष बाब म्हणून तातडीच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्ते व पुलांच्या प्रलंबित दुरुस्तीचा मार्ग सुकर झाला आहे, अशी माहीती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जफर अहमद काझी यांनी दिली.

जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात ६ हजार ६५५ किलोमीटरचे ग्रामीण मार्ग व जिल्हा मार्ग आहेत. आधीच चाळणी झालेल्या रस्त्यांचा पावसाळ्यात काही भाग वाहून गेल्याने रस्त्यावर चालणेही अवघड बनले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सांगितले की, ४ सप्टेंबर २०१९ मध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ मध्ये जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड व सोयगाव या तालुक्यांतील ९९ पूल अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाले होते. त्यासाठी २७ कोटी ७६ लाख १० हजार रुपयांची मागणी ग्रामविकास विभागाकडे निधीची मागणी केली. तर जिल्ह्यातील यंदाच्या अतिवृष्टीमुळे ९०८ किलोमीटर रस्ते वाहून गेले. तर ४१० पूल व एक संरक्षक भिंत नादुरुस्त झाली. त्यासाठी १३४ कोटींची मागणी नोव्हेंबर मध्ये राज्य शासनाकडे केली. 

गेल्या चार-पाच वर्षांपासून दुरुस्तीला निधी मिळत नव्हता. मात्र, राज्य शासनाने बुधवारी नियोजन विभागातर्फे जिल्हा नियोजनाच्या मंजूर निधीच्या १० टक्के रक्कम मुख्यमंत्री रस्ते विकास योजनेला तर विषेश बाब म्हणून ग्रामीण रस्ते दुरुस्तीला ५ टक्के निधी देण्याचा आदेश काढला आहे. आता निधी नेमका किती मिळतो याकडे बांधकाम विभागाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी